शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
3
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
4
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
5
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
6
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
7
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
8
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
9
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
10
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
11
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
12
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
13
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
14
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
15
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
16
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
17
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
18
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
19
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
20
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत

द्राक्षावर आधारित उद्योग आले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 1:31 AM

संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे   पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत सापडलेल्या उत्पादकांमुळे द्राक्ष पिकांवर आधारित उद्योग-धंदे परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

ठळक मुद्देउत्पादक चिंतित : अस्मानी, सुलतानी संकटांची मालिका सुरूच

लखमापूर : संपूर्ण जिल्ह्यात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना तीन ते चार वर्षांपासून अनेक प्रकारच्या अस्मानी व सुलतानी संकटांनी जेरीस आणल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विविध बँका तसेच सोसायट्यांकडून कर्ज घेऊन उभ्या केलेल्या बागेतील द्राक्षांना कोराेनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात विकण्याची वेळ आल्यामुळे   पीकपद्धतीत बदल करावा की काय या विंवचनेत सापडलेल्या उत्पादकांमुळे द्राक्ष पिकांवर आधारित उद्योग-धंदे परतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील  तीन ते चार हंगामापासून द्राक्षे पिकांने बळीराजांला कोणत्याही स्वरूपाची साथ दिली नाही. जवळचे होते नव्हते ते भांडवल खर्च करूनही हातात एक नवा पैसाही मिळाला नाही. त्यात विविध बँका, सोसायटी, पतसंस्था व इतर ठिकाणाहून घेतलेल्या कर्जाची परत फेड करायची कशी? घरगाडा  हाकायचा  कसा ? कर्ज घ्यावे तरी किती? ज्या शेतीच्या जोरावर कर्ज घेतले, तीच शेती तोट्यात आल्यानंतर ते घेतलेले कर्ज फेडावे कसे अशा नानाविध  प्रकारच्या प्रश्नांनी  द्राक्ष पंढरीतील बळीराजा हतबल झाला आहे. आता या ग्रहणातून  मुक्त होण्यासाठी शेतकरी  शेती पद्धतीमध्ये बदल करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. जर शेतकरी वर्गाने शेतीपद्धतीमध्ये बदल केला तर द्राक्षे पिकांवर अवलंबून असणारे व्यवसाय त्यात बेदाणा, वाइन प्रकल्प आदींवर  मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गाला वाटत आहे.वाइन उद्योगाला उतरती कळा चार पाच वर्षांपूर्वी वाईन उद्योगाला सुगीचे दिवस होते. परंतु सध्या द्राक्षे पिकाला लागलेली घरघर पाहता फक्त बोटावर मोजण्याइतके वाईन प्रकल्प सध्या सुरु  आहेत. वाईन ग्रेप्सचा  माल पूर्णपणे उचलला जात नाही. काही माल तसाच शिल्लक राहतो व उरलेल्या मालाचे करायचे काय? त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागतो. यामुळे बरेच शेतकरी वाईन उद्योगाला माल देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे वाईन उद्योगाला सध्या उतरती कळा लागली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती