शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

जिल्ह्यातील  २८ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:35 IST

कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण व त्यामुळे उत्पादक शेतकºयांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केल्यानुसार त्याचा लाभ जिल्ह्यातील २८ हजार ३५३ शेतकºयांना होणार आहे.

नाशिक : कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण व त्यामुळे उत्पादक शेतकºयांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केल्यानुसार त्याचा लाभ जिल्ह्यातील २८ हजार ३५३ शेतकºयांना होणार आहे. १७  बाजार समित्यांमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर या एका महिन्याच्या कालावधीत सुमारे ३५ लाख क्विंटलहून अधिक कांद्याची विक्री करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  नाशिक जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळ कांद्याचे भाव सातत्याने घसरू लागले असून, ५० पैसे ते एक रुपये दराने कांदा विक्री झाल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना आहे. त्यातून बाजार समित्यांचे कामकाज बंद पाडणे, रस्त्यावर कांदा ओतणे, सरकारच्या विरोधात रास्ता रोको अशा स्वरूपाचे आंदोलने केली जात आहे. भाव कोसळल्यामुळे शेतकºयांनी कांदा बाजार समितीत आणणे बंद केले, परिणामी चाळीतही कांदा सडू लागला आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थिती असताना त्यात कांदा उत्पादक शेतकºयांचा रोष सरकारला महागात पडू शकतो हे हेरून शासनाने दि. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला असून, शासनाने सहकार खात्याकडून प्रत्येक जिल्ह्णाची माहिती मागविली आहे. नाशिक जिल्ह्णातील १७ बाजार समित्यांमध्ये गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत २८ हजार ३५३ शेतकºयांनी ३५ लाख ८८ हजार १९१ क्विंटल कांद्याची पडत्या भावात विक्री केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकºयांना पाच कोटी ६ लाख ७० हजार ६०० रुपये अनुदान अदा केले जाणार आहे. जिल्ह्णाच्या बाजार समित्यांमध्ये लगतच्या कोपरगाव, श्रीरामपूर आदी ठिकाणच्या शेतकºयांनीही कांदा विक्री केलेला असल्यामुळे आकडेवारीत कमी अधीक होण्याची शक्यता जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाGovernmentसरकारMarket Yardमार्केट यार्ड