शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:32 AM

पावसाळ्यात प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून, याकामी दुर्लक्ष केल्यास किंवा दूषित पाण्यामुळे गावात साथ उद्भवल्यास ग्रामसेवक व आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.

नाशिक : पावसाळ्यात प्रत्येक गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असून, याकामी दुर्लक्ष केल्यास किंवा दूषित पाण्यामुळे गावात साथ उद्भवल्यास ग्रामसेवक व आरोग्यसेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.  त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची आढावा बैठक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे व प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी डॉ. गिते यांनी मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. गिते म्हणाले की, जिल्ह्णात पहिल्यांदाच सर्व गावांतील, अंगणवाडी व शाळांमधील जलकुंभ व हातपंप यांची स्वच्छता करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर मोहिमेत गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तसेच टाक्यांची स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे सांगितले.  महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी ग्राम बालविकास केंद्र, तालुकास्तरीय प्रशिक्षण, आरोग्य व आहारसंहिता याबाबत आढावा घेतला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला.  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सिंचनविहीर, विहीर पुनर्भरण, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायतींमधील जनसुविधेची कामे, घरकुल इ. योजनांची अपूर्ण बांधकामे याबाबत आढावा घेऊन सर्व काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी दिले. आढावा बैठकीस जिल्हा व तालुका स्तरावरील खातेप्रमुख, तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद