शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

करवाढीवरून महासभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:34 IST

गेल्यावर्षी करवाढ रद्द करण्याचे महासभेत तीन वेळा ठरवूनदेखील त्याची अंमलबजावणी आयुक्तकरीत नसल्याने त्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महापौरांनी बगल दिली.

नाशिक : गेल्यावर्षी करवाढ रद्द करण्याचे महासभेत तीन वेळा ठरवूनदेखील त्याची अंमलबजावणी आयुक्तकरीत नसल्याने त्यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महापौरांनी बगल दिली. आणि कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शुक्रवारी (दि. २२) झालेल्या महासभेत विरोधकांनी जाब विचारून गोंधळ घातला. हेच निमित्त करून महापौर रंजना भानसी यांनी क्षणार्थात सर्व विषय मंजूर करून महासभा गुंडाळली. यानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. नगरसचिवांनीदेखील पलायन केल्याने विरोधकांनी त्यांच्या दालनात जाऊन त्यांची खुर्ची उलटी करून त्यावर निषेधाचा मजकूर चिटकवला.पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गेल्या बुधवारी (दि.२०) महासभा विरोधकांच्या आग्रहामुळेच महापौर भानसी यांनी तहकूब केली होती. त्यामुळे करवाढ रद्दच्या ठरावाची अंमलबजावणी आयुक्त का करीत नाहीत याचा जाब विचारण्यासाठी दिलेल्या लक्षवेधीवर शुक्रवारी (दि. २२) आयोजित महासभेत चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु सभागृहाचे कामकाज सुरू होताच महापौरांनी सर्व प्रथम श्रद्धांजलीच्या प्रस्तावाचे वाचन केले. त्यानंतर अभिनंदनाचे प्रस्तावदेखील पारीत झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी विषय पत्रिकेवरील नियमित विषय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी त्यांना रोखले. बोरस्ते यांनी लक्षवेधीबाबत विचारल्यानंतर महापौरांनी लक्षवेधी दाखल नसल्याचे सांगितल्याने सर्वच विरोधी पक्ष संतप्त झाले आणि पीठासनासमोर जमा झाले. करवाढ रद्दच्या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, असे त्यांनी म्हणून बघितले. परंतु, महापौरांनी ऐकले नाही त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली.महासभेच्या आधी नियमानुसार तीन दिवस अगोदर लक्षवेधी सादर करूनदेखील ती दाखल का करून घेतली नाही म्हणून नगरसचिवांना जाब विचारला दरम्यान महापौरांनी वाढता गोंधळ घेऊन तातडीने विषय पत्रिकेवरील विषय  क्रमांक ३२४ (फेरीवाला उपविधी ठरवणे) वगळता सर्व विषय तातडीने मंजूर करून सभेचे कामकाज संपवले आणि राष्टÑगीत सुरू केले.नगरसचिवांच्या विरोधात घोषणाबाजीसभागृहातून बाहेर पडताच विरोधकांनी नगरसचिव यांचे दालन गाठले. परंतु नगरसचिव गोपीनाथ आव्हाळे हे तेथे नव्हते. त्यामुळे त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पळपुट्या नगरसचिवांचा धिक्कार असो, नियमानुसार कामकाज न करणाऱ्या नगरसचिवांचा निषेध असो, करवाढ रद्द झालीच पाहिजे, अशा घोषणा देत नगरसेवकांनी खुर्ची उलटी केली यावेळी अजय बोरस्ते, विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार, अपक्ष गटनेता गुरुमित बग्गा, राष्टÑवादीच्या सुषमा पगारे, सत्यभामा गाडेकर, किरण ताजणे, हर्षदा गायकर, पश्चिम प्रभाग समिती सभापती वैशाली भोसले, सीमा ताजणे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.महापालिकेच्या महासभेत विरोधकांची लक्षवेधी टाळण्यामागे राजकारण काहीच नव्हते. बुधवारी (दि.२०) महासभा तहकूब झाली ती तहकूब महासभा आज घेतली होती आणि तहकूब महासभेत कोणतीही लक्षवेधी घेता येत नाही. विरोधकांनी ती दाखल केली असली तरी सभा तहकूब असल्यानेच मी ती स्वीकारली नव्हती. सभागृहात विरोधकांनी प्रश्न विचारल्यानंतर मी हेच त्यांना सांगितले, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पीठासनासमोर गोंधळ घातला आणि पीठासनावर चढूनदेखील राजदंडाला हात लावला. हे बरोबर नाही. त्यामुळेच कामकाज तहकूब करावे लागले.  - रंजना भानसी, महापौर

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेना