शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कांद्याचे दर पाडून सरकार साधते स्वार्थ : ललित बहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2022 01:59 IST

गेल्या काही वर्षांपासून कांदा हा केवळ जीवनावश्यक राहिला नसून, त्याच्या दराबाबत राजकारण सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांवर उत्पादन शुल्क आणि ईडीकडून कारवाई करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार न करता सरकार स्वार्थ साधत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी केला. असेच सुरू राहिले तर शेतकरी संघटना सरकारला वठणीवर आणण्याचे काम करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

ठळक मुद्दे येवल्यातील कांदा परिषदेत सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

येवला (जि. नाशिक) : गेल्या काही वर्षांपासून कांदा हा केवळ जीवनावश्यक राहिला नसून, त्याच्या दराबाबत राजकारण सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांवर उत्पादन शुल्क आणि ईडीकडून कारवाई करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार न करता सरकार स्वार्थ साधत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी केला. असेच सुरू राहिले तर शेतकरी संघटना सरकारला वठणीवर आणण्याचे काम करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित कांदा परिषदेत बहाळे बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात कमालीची घसरण झाली आहे. कांदा दराच्या घसरणीमागे केवळ परिस्थितीच नाही, तर मोठे राजकारण आहे. कांद्याचे दर घसरले असताना राज्यभर नाफेडकडून कवडीमोल दरात खरेदी केली जात आहे. उद्या शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याला चांगला दर मिळाला तर नाफेडचेच कांदे बाजारात आणून दर आवाक्यात आणले जातात. असा प्रकार निदर्शनास आला तर नाफेडचा कांदा बाजारपेठेत येऊ दिला जाणार नसल्याचे बहाळे यांनी सांगितले.

परिषदेत राजाभाऊ पुसदेकर, सीमा नरोडे, शशिकांत भदाणे, देवीदास पवार, सुधीर बिंदू, अनिल घनवट, माजी आमदार वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, संतू पा. झांबरे, जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांची भाषणे झाली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन बापूसाहेब पगारे यांनी केले.

------------------

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदाagricultureशेती