शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कांद्याचे दर पाडून सरकार साधते स्वार्थ : ललित बहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2022 01:59 IST

गेल्या काही वर्षांपासून कांदा हा केवळ जीवनावश्यक राहिला नसून, त्याच्या दराबाबत राजकारण सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांवर उत्पादन शुल्क आणि ईडीकडून कारवाई करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार न करता सरकार स्वार्थ साधत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी केला. असेच सुरू राहिले तर शेतकरी संघटना सरकारला वठणीवर आणण्याचे काम करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

ठळक मुद्दे येवल्यातील कांदा परिषदेत सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

येवला (जि. नाशिक) : गेल्या काही वर्षांपासून कांदा हा केवळ जीवनावश्यक राहिला नसून, त्याच्या दराबाबत राजकारण सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांवर उत्पादन शुल्क आणि ईडीकडून कारवाई करून कांद्याचे दर पाडले जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार न करता सरकार स्वार्थ साधत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी केला. असेच सुरू राहिले तर शेतकरी संघटना सरकारला वठणीवर आणण्याचे काम करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित कांदा परिषदेत बहाळे बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात कमालीची घसरण झाली आहे. कांदा दराच्या घसरणीमागे केवळ परिस्थितीच नाही, तर मोठे राजकारण आहे. कांद्याचे दर घसरले असताना राज्यभर नाफेडकडून कवडीमोल दरात खरेदी केली जात आहे. उद्या शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याला चांगला दर मिळाला तर नाफेडचेच कांदे बाजारात आणून दर आवाक्यात आणले जातात. असा प्रकार निदर्शनास आला तर नाफेडचा कांदा बाजारपेठेत येऊ दिला जाणार नसल्याचे बहाळे यांनी सांगितले.

परिषदेत राजाभाऊ पुसदेकर, सीमा नरोडे, शशिकांत भदाणे, देवीदास पवार, सुधीर बिंदू, अनिल घनवट, माजी आमदार वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, संतू पा. झांबरे, जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांची भाषणे झाली. प्रास्ताविक, सूत्रसंचालन बापूसाहेब पगारे यांनी केले.

------------------

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदाagricultureशेती