शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

शासकीय वसाहती पडल्या ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:14 AM

नाशिकरोड येथील गांधीनगर, नेहरूनगर तसेच डिस्टीलरी येथील महसूल कर्मचारी वसाहत आणि नाशिकरोड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय वसाहतही सध्या ओस पडल्या आहेत.

नाशिक : नाशिकरोड येथील गांधीनगर, नेहरूनगर तसेच डिस्टीलरी येथील महसूल कर्मचारी वसाहत आणि नाशिकरोड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय वसाहतही सध्या ओस पडल्या आहेत. केंद्रीय प्रेस कामगारांची घटलेली संख्या, पोलीस आणि शासकीय कार्यालयांचे झालेले विभाजन यामुळे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वसाहतींचा वापर कमी झाल्याने या वसाहतही ओस पडल्या आणि कालांतराने भुरट्या चोरट्यांनी बंद वसाहतींमधील दरवाजे, खिडक्यांची चोरी केल्याने या वसाहतींनी अवकळा आली आहे.नेहरूनगर आणि गांधीनगर येथे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणारे छापखाने आहेत. गांधीनगर आणि नाशिकरोड येथे असलेल्या प्रेसमध्ये काम करणाºया कामगारांसाठी मोठी वसाहत उभारण्यात आली आहे. गांधीनगर येथे तीन ते चार हजार कर्मचारी राहू शकतील अशी शासकीय वसाहत आहे. नेहरूनगर येथे आठ ते दहा हजार कर्मचाºयांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकेल अशी शासकीय वसाहत अनेक वर्षांपासून आहेत. त्याचप्रमाणे महसूल कर्मचाºयांसाठी आणि पोलीस कर्मचाºयांसाठीदेखील नाशिकरोडमध्ये वसाहती उभी होती.नाशिकरोड परिसर हा कामगार वसाहतीचा परिसर म्हणून मानला जातो. तीन ठिकाणी असलेले केंद्र सरकारचे छापखाने, एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचाºयांसाठी असलेली वसाहत, रेल्वे कर्मचारी, साखर कारखाना, पोलीस वसाहत, महापालिका कर्मचाºयांसाठी असलेल्या शासकीय वसाहती असल्यामुळे कामगार वसाहत म्हणून नाशिकरोडची ओळख सांगितली जात होती. परंतु कालौघात ही ओळख आता मागे पडली आहे.केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी कपातीचे धोरण, कारखान्यांमध्ये कमी झालेले काम, नव्याने कामगार भरती न करण्याचे धोरण यामुळे शासकीय कार्यालयांमधील कर्मचाºयांची संख्या कमी झाल्याने शासकीय वसाहतींचा वापरही कमी झाला आहे.परिणाम म्हणून या वसाहती ओस पडल्याने शासकीय निवासस्थानांचा वापर कमी झाला. कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने किरकोळ कर्मचारीच शासकीय वसाहतींमध्ये राहत असल्याने कमी कुटुंबांमध्ये विस्तीर्ण परिसरातील शासकीय निवासस्थानांमध्ये राहण्याबाबत कर्मचाºयांचीही मानसिकता नसल्यामुळे शासकीय सदनिकेमध्ये राहाण्याबाबत फारसे कुणी उत्सुकही दिसत नाही.शासकीय वसाहतींची देखभाल दुरूस्ती होत नसल्याने अशा ठिकाणी राहणे कर्मचाºयांना त्रासदायक वाटत असल्यामुळे कर्मचाºयांनी वसाहतींकडे पाठ फिरविली आहे.देखभाल-दुरूस्तीचेकाम झाले खर्चिकशासकीय कर्मचाºयांच्या निवासाची सोय म्हणून कर्मचारी कल्याण उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाºयांना राहण्याची व्यवस्था केली जाते. मोठे उत्पादन, कर्मचाºयांची मोठी संख्या आणि शिफ्टमध्ये चालणारे काम यामुळे शासकीय क्वॉर्टरमध्ये अस्तित्वात आले. परंतु कर्मचारी कपात झाल्यापासून शासकीय वसाहतही ओस पडू लागल्या. वसाहतीमध्ये राहणाºयांची संख्या कमी होऊ लागल्याने देखभाल दुरूस्तीचा खर्चही वाढू लागला. रिकाम्या सदनिकांवर अशाप्रकारचा खर्च करणे आर्थिक तोट्याचे ठरू लागल्याने कर्मचाºयांअभीव ओसाड झालेल्या वसाहती लवकर लयास गेल्या. कुणी राहाणारच नसेल तर दुरूस्ती का करायची म्हणून या सदनिका पडून राहिल्या आणि त्यामुळे त्यांची अधिक दुरवस्था झाली.चोरीच्या घटनांमुळे अधिकच बकाल स्वरूपबंद पडलेल्या शासकीय वसाहतींमधील दरवाजे आणि खिडक्या चोरट्यांनी चोरून नेसल्याने इमारतीचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले आहेत. बांधकामामधील विटा, फरशादेखील चोरीस गेल्याने अशा इमारती दुरूस्ती करणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकHomeघर