शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शासनाचे खासगी कंपन्यांना झुकते माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:24 IST

: केंद्रशासनाची डिजिटल इंडियाची भिस्त ज्या बीएसएनएलवर आहे. त्याच बीएसएनएल कंपनीला सापत्नभावाची वागणूक दिली जात असून, डिजिटल इंडियाच्या स्पर्धेत अत्याधुनिक सामग्री न देता लाकडी तलवार हाती देत बीएसएनएल जीवघेणी स्पर्धा करू शकत नाही हे वास्तव आहे. प्रलंबित असलेला वेतन करार लागू करण्यासह मोबाइल टॉवरची स्वतंत्र उपकंपनी करण्याच्या निर्णयाला बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी विरोध करत दोन दिवस संप पुकारला होता. या देशव्यापी संपास पाठिंबा देत येवल्यातील बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी बीएसएनएल कर्मचाºयांच्या युनियन्स, असोसिएशन्सतर्फे १२ व १३ डिसेंबर रोजी संपात सहभागी झाले होते.

येवला : केंद्रशासनाची डिजिटल इंडियाची भिस्त ज्या बीएसएनएलवर आहे. त्याच बीएसएनएल कंपनीला सापत्नभावाची वागणूक दिली जात असून, डिजिटल इंडियाच्या स्पर्धेत अत्याधुनिक सामग्री न देता लाकडी तलवार हाती देत बीएसएनएल जीवघेणी स्पर्धा करू शकत नाही हे वास्तव आहे. प्रलंबित असलेला वेतन करार लागू करण्यासह मोबाइल टॉवरची स्वतंत्र उपकंपनी करण्याच्या निर्णयाला बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी विरोध करत दोन दिवस संप पुकारला होता. या देशव्यापी संपास पाठिंबा देत येवल्यातील बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी बीएसएनएल कर्मचाºयांच्या युनियन्स, असोसिएशन्सतर्फे १२ व १३ डिसेंबर रोजी संपात सहभागी झाले होते. खासगी कंपन्याना झुकते माप देत शासन बीएसएनएलकडे पाठ फिरवित असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कामगारविरोधी व खासगी कंपनी धार्जिण्या शासनाच्या धोरणामुळे बीएसएनएलचे उपयुक्तता मूल्य कमी झाल्याची भावना कर्मचारी बोलून दाखवित आहेत. बँक अथवा एसटी कर्मचाºयांच्या संपाची झळ तत्काळ परिणामकारकता सिद्ध करते व कामगार हिताचे निर्णयदेखील तत्काळ घेतले जातात. बीएसएनएल कर्मचाºयांच्या दृष्टीने संप यशस्वी झाला असला तरी संपाच्या दोन दिवसांच्या काळात कर्मचाºयांनी सामाजिक बांधीलकी दाखवित आपले उपद्रवमूल्य शासनाला दाखविले नाही. वेतनवाढीचा संबंध कंपनीच्या नफ्याशी जोडणे   अन्यायकारक असून, बीएसएनएल कंपनी सामाजिक उद्दिष्टांसाठी स्थापन झाली आहे. कोट्यवधीचा तोटा सहन करून खेड्यापाड्यांत, दुर्गम भागात ही कंपनी सेवा पुरविते. अनेक वर्षे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या कंपनीचा विकास होऊ शकलेला नाही. सर्व आर्थिक सवलती काढून घेतल्याने गुंतवणुकीसाठी भांडवल नाही. नवीन तंत्रज्ञान व साधनसामग्री नाही. कंपनीच्या हजारो कोटींचा राखीव निधी सरकारने शून्यावर आणला. खासगी कंपन्यांना प्रोत्साहन देऊन बीएसएनएलला तोट्यात ढकलल्याचे धोरण सरकार अवलंबत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांत बीएसएनएलच्या कर्मचाºयांनी विविध सेवा खासगी कंपनीप्रमाणे सुरू करून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी, बीएसएनएल कंपनी नफ्यात आली आहे. वेतन आयोगाच्या खर्चाची तरतूद करण्याची कंपनीची क्षमता असून-देखील वेतन निश्चितीकरण करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.  असे असताना कालबाह्य होत असलेले टूजीचे साहित्य खरेदी करण्याच्या धोरणालादेखील कर्मचारी विरोध करीत आहे. सध्या बीएसएनएलची इंटरनेट, ब्रॉडबँड व मोबाइल सेवा एकत्रितरीत्या काम करत आहे. देशभरातील तब्बल ६५ हजार मोबाइल टॉवरची स्वतंत्र उपकंपनी करण्याच्या विचारात शासन आहे. टॉवरची स्वतंत्र उपकंपनी करून खासगी मोबाइल कंपन्यांचे हित जोपासत बीएसएनएलचे कंबरडे मोडण्याचा घाट घातला जात असल्याचाही आरोप कर्मचाºयांनी केला आहे. टॉवरची उपकंपनी करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा व तिसरा वेतन करार लागू करावा, अशी मागणीही आंदोलक कर्मचाºयांनी केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलNashikनाशिक