शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गोदा, दारणाकाठी सतर्कतेचा इशारा; गणपती विसर्जन करताना घ्या खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 13:31 IST

तीन दिवसांपुर्वीच गणेश विसर्जनासाठी दारणा नदीत उतरलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्या युवकाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही.

ठळक मुद्देगंगापूर धरण १०० टक्के भरले सोमवारी दुपारी २ हजार २०० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस

नाशिक : सोमवारी पहाटेपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच दुपारी १ वाजेपासून पुन्हा जिल्ह्यातील घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने गंगापूर धरणातून सातत्याने विसर्गात वाढ केली जाऊ शकते. दुपारी साडेबारा वाजेपासून गंगापूर धरणातून २ हजार २८४ क्युसेक इतका विसर्ग गोदापात्रात तर दारणामधून ७ हजार ४१० क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. त्यामुळे गोदावरी व दारणा नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिला आहे. विशेषत: सात दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी जाताना नदीकाठापासून सुरक्षित अंतरावर थांबावे, गणेशमुर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करून दान करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तीन दिवसांपुर्वीच गणेश विसर्जनासाठी दारणा नदीत उतरलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्या युवकाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही.

सुमारे वीस दिवसांपासून पावसाने शहरासह जिल्ह्यात उघडीप दिली होती. मागील दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान कायम असून रविवारी रात्रपासून पावसाला सुरूवात झाली; मात्र सोमवारी पहाटेपासून शहरातदेखील पावसाच्या सरींनी जोर धरला. पहाटेपासून शहरात मध्यम स्वरूपाच्या सरींची संततधार सुरू झाली. तसेच जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने दारणा, गंगापूर धरण १०० टक्के भरले असल्यामुळे तत्काळ पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू केला गेला. दोन दिवसांपासून गंगापूर धरणातून ६०० क्युसेक इतके पाणी गोदापात्रात सोडले जात होते; मात्र सोमवारी दुपारी २ हजार २०० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला गेला आहे. कारण धरणसाठा १०० टक्के झाला असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.लाडक्या बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेला सात दिवस पूर्ण झाले आहे. ७ दिवसांकरिता विराजमान झालेल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी काही भाविकांची गोदाकाठ, दारणाकाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता या परिसरात अग्निशमन दल, जीवरक्षक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. जे भाविक सात दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीकाठावर जाणार आहे, त्यांनी लहान मुले, महिला यांना नदीकाठापासून सुरक्षित अंतरावर थांबवावे, तसेच पाण्यात खोलवर उतरणे टाळावे, गणेशमुर्ती नदीकाठावरूनच विसर्जित करावी, अन्यथा कृत्रिम तलावाचा पर्याय स्विकारावा. जेणेकरून पर्यावरणपुरक गणेशोत्सव आणि सुरक्षा जोपासण्यास मदत होईल, असे आवाहन महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीgangapur damगंगापूर धरणRainपाऊस