शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोदावरीला पावसाळ्यातील पहिला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:32 IST

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाठा दुपारी ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात एक हजार क्यूसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले.

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाठा दुपारी ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात एक हजार क्यूसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे सायंकाळपर्यंत पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत बुडाली. रात्री आठ वाजेपर्यंत ७ हजार ८३३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला या हंगामातील पहिला पूर आला.यावर्षी उशिराने पावसाला राज्यासह जिल्ह्यात सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये जुलैअखेर पावसाने जोर धरल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून नव्या स्वरूपात पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली. गंगापूर धरणाचा साठा २० टक्क्यांपर्यंत खाली गेल्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेत अंमलबजावणीही केली, मात्र जुलैअखेर पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर, अंबोली या भागात वरुणराजा जोरदार बरसल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली.पंधरवड्यात धरणसाठा निम्म्यावर पोहोचला, मात्र या १४ दिवसांत पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सोमवारी (दि.२९) सायंकाळी गंगापूर धरण ८३.४३ टक्के इतके भरले. दुपारी बारा वाजेपर्यंत धरणाची पाण्याची पातळी ८० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने जलसंपदा विभागाकडून विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गोदावरीच्या पातळीत सायंकाळपर्यंत मोठी वाढ झाली. सायंकाळी दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला, तर गंगा-गोदावरी मंदिरासह वस्त्रांतरगृहातही पाणी शिरले. गोदाघाटावरील लहान पूल, मंदिरे पाण्याखाली गेली. देवमामलेदार मंदिर, नीळकंठेश्वर मंदिरासह नारोशंकर मंदिराच्या पायऱ्याही पुराच्या पाण्यात बुडाल्या. तसेच रात्री ९ वाजता कपालेश्वर पोलीस चौकीसमोरील पाणपोयीला पुराचे पाणी लागले.दुपारपासूनच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशामक दलाच्या जवानांकडून गोदाकाठावर धरणातून केल्या जाणाºया विसर्गाची पूर्वसूचना दिली जात होती. यामुळे विक्रेत्यांनी तत्काळ नदीकाठापासून आपली दुकाने सुरक्षितस्थळी हलविली. नागरिकांनी गोदाकाठालगत असलेली वाहने काढून घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नाही, तसेच दुर्घटनेलाही निमंत्रण मिळाले नाही. गंगापूर धरणातून होणाºया विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्याने गोदाकाठावरील रहिवाशांसह विक्रेतेही सतर्क झाले होते. गोदावरी दुथडी भरून वाहू लागल्याने पुलाला पुराचे पाणी लागले होते.पूर पाहण्यासाठी गर्दीगोदावरीला आलेला या हंगामातील पहिला पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गोदाकाठावरील अहिल्यादेवी होळकर, संत गाडगे महाराज, टाळकुटेश्वर या मोठ्या पुलांवर गर्दी केली होती. त्यामुळे मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजा मार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी निर्माण झाली होती.विसर्ग वाढण्याची शक्यतागंगापूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाण्याचा जोर टिकून राहिल्यास रात्रीतून विसर्गात पुन्हा वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदाकाठालगत हाय अलट देण्यात आला आहे. निफाड तालुक्यात गोदाकाठी राहणाºया नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोदावरी नदीपात्रात गंगापूर धरणातून रात्री ८ वाजता ७ हजार ८३३ क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविला गेला. दर दोन तासांनी हजार ते दीड हजार क्यूसेकने विसर्गामध्ये वाढ करण्यात आली.होळकर पुलाखालून ९ हजार ४७० द.ल.घ.फू. पाणी प्रवाहित४गंगापूर धरणातून सोडण्यात आलेले ६ हजार ५०० क्यूसेक पाणी तसेच दिवसभर शहरात सुरू असलेल्या पावसाच्या मध्यम सरींमुळे शहरातील पावसाचे पाणी असे एकूण गोदावरीच्या होळकर पुलाखालून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ९ हजार ४६७० द.ल.घ.फू.पर्यंत पाणी पुढे रामकुंडात प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. त्यामुळे तपोवनामधील लोखंडी पुलावरून पाणी गेले.सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूपधरणातून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला. गोदापात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली असतानाही नागरिक धबधब्याजवळ धोकादायक पद्धतीने उभे राहून सेल्फी काढताना दिसून आले.

टॅग्स :Rainपाऊसgodavariगोदावरीfloodपूर