शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

गोदावरीच्या स्वच्छतेला प्राधान्याची गरज : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:18 IST

नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांयुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, त्याचप्रमाणे शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीच्या कामांचा मुंबईत घेतला आढावा

मुंबई येथे मंत्रालयात स्मार्ट सिटी योजनेच्या सादरीकरणानंतर बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत सीताराम कुंटे, प्रकाश थविल व मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे.मुंबई : नाशिक शहराला स्मार्ट शहर बनविण्यासाठी सर्व पायाभूत सुविधांयुक्त स्वच्छ, पर्यावरणपूरक, आधुनिक तंत्रज्ञानाने नियंत्रित शाश्वत विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, त्याचप्रमाणे शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीला स्वच्छ व सुंदर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सादरीकरण गुरुवारी (दि.१३) आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंत्रालयात केले त्यावेळी भुजबळ यांनी सूचना केल्या. नाशिक शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून, जुने गावठाण ही नाशिकची खरी ओळख आहे. त्यामुळे नाशिककरांच्या मागणीनुसार जुन्या क्षेत्राच्या विकासासाठी ५९८ एकरातील जुन्या गावठाणाची निवड करण्यात आली. स्काडा प्रणालीच्या सहाय्याने २४ तास पुरेशा दाबाने व शुद्ध पाणीपुरवठा गावठाणमध्ये करण्यात येणार आहे. स्वयंचलित पद्धतीने पुरेसा दाब, विविध ठिकाणी शुद्ध पाण्याची तपासणी, पाणीपुरवठा नलिकांमध्ये लिकेज डिटेक्शन स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवणुकीसाठी टाक्या बांधण्याचा खर्च, वॉटर फिल्टर उपकरणांवरील खर्च, तसेच पाणी साठवणुकीच्या प्रवृत्तीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय या गोष्टी टाळणे शक्य होणार आहे.गोदावरी नदी स्वच्छ झाल्याशिवाय स्मार्ट शहर होऊ शकत नाही. नदीमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी वेगळे करावे व त्यावर प्रक्रि या करण्यातयावी.नाशिक शहर स्मार्ट बनविताना शहराच्या मधून जाणारी गोदावरी नदी पर्यावरणाचे संरक्षण करून स्वच्छ व सुंदर बनविण्याचे निर्देश भुजबळ यांनी यावेळी दिले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा नाशिक स्मार्ट सिटीचे चेअरमन सीताराम कुंटे व स्मार्ट सिटी संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.पाण्याची होणार बचतयामुळे पाण्याची बचत होऊन सद्यस्थितीतील ४३ टक्क्यांवरील नॉन रेव्हेन्यू वॉटर १० टक्क्यांच्या खाली आणणे शक्य होणार आहे, तसेच स्वयंचलित प्रणालीमुळे कोठेही बिघाड झाल्याची माहिती आपोआप नियंत्रण कक्षात समजून ती दुरु स्ती तत्काळ करता येईल, असे विविध योजनांची माहिती घेतल्यानंतर भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळSmart Cityस्मार्ट सिटी