शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

गोदाघाट पुन्हा बिबट्याच्या दहशतीखाली

By admin | Updated: August 9, 2015 23:39 IST

बळींची संख्या वाढली : वनविभागाचे होत आहे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष

लासलगाव : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील दहावर्षीय विकी शांताराम पिठे या चौथीतील विद्यार्थ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. तालुक्यातील नांदूरमधमेश्वर परिसरात तीन बिबट्यांचा मुक्तसंचार असूनही याकडे वन विभागाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजून किती लोकांच्या बळींची वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी वाट पाहणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.आठ महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यातील पिठे हा सहावा बळी असून, यापूर्वी सायखेडा येथील ऊसतोड कामगाराच्या मुलाला बिबट्याने शिकार बनविले. शिवरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू झाला. भुसे येथील शुभम पोटे याचा, तर म्हाळसाकोरे येथील ढोबळे या इसमाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सध्या बिबट्याच्या भीतीने शेतमजूर कामावर जाण्यास घाबरत असून, शेतीची कामेही ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. एकप्रकारे कोणतीही संचारबंदी नसताना हा परिसर बिबट्याच्या दहशतीने अघोषित संचारबंदीचा अनुभव घेत आहे.तालुक्यातील मांजरगाव, भुसे, चाटोरी, बेरवाडी, करंजगाव, सोनगाव, शिंगवे, चापडगाव, कुरडगाव, कोठुरे, सुंदरपूर, जळगाव, काथरगाव व नांदूरमधमेश्वर परिसरात महिनाभरापासून बिबट्याचा पुन्हा मुक्तसंचार सुरू आहे. नैसर्गिक भक्ष्य मिळणे दुरापास्त झाल्याने भुकेपोटी ही जंगली श्वापदे आता रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांनाही लक्ष्य करू लागली आहेत. तीन ते चार वर्षांपासून सातत्याने उन्हाळ्यात एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत या भागातील काही गावांना बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. अडीच-तीन वर्षांपूर्वी शिवरे गावातील दोन लहान बालकांना एकाच महिन्यात बिबट्याने शिकार केले होते. उकाड्यापासून सुटका मिळावी म्हणून पल्लवी सानप ही लहान मुलगी व आजोबा सायंकाळी घराच्या अंगणात बसले होते. आठ-साडेआठ वाजेची वेळ होती. अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या भुकेल्या बिबट्याने लहान पल्लवीला तिच्या आजोबादेखत हल्ला करून पळवून नेले. तेव्हा काही अंतरावर उसाच्या शेतात शिकार झालेल्या अवस्थेत पल्लवीचा मृतदेह आढळून आला होता, तर ही घटना घडण्याच्या पंधरा दिवस अगोदर याच गावातील दुर्गेश गोसावी या अवघ्या एकवर्षीय बाळाला बिबट्याने ठार केले होते. या नरभक्षक बनलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शिवरे येथील दोघा लहानग्यांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शिवरे फाटा येथे नाशिक-औरंगाबाद महामार्ग पावणेदोन तास रोखून धरला होता. वन खात्यानेही ठिकठिकाणी पिंजरे लावले. मात्र दरवेळी या बिबट्याने हुलकावणी देत महिनाभर परिसरात आपली दहशत कायम ठेवली.