शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

गोदाघाट पुन्हा बिबट्याच्या दहशतीखाली

By admin | Updated: August 9, 2015 23:39 IST

बळींची संख्या वाढली : वनविभागाचे होत आहे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष

लासलगाव : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील दहावर्षीय विकी शांताराम पिठे या चौथीतील विद्यार्थ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. तालुक्यातील नांदूरमधमेश्वर परिसरात तीन बिबट्यांचा मुक्तसंचार असूनही याकडे वन विभागाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजून किती लोकांच्या बळींची वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी वाट पाहणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.आठ महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यातील पिठे हा सहावा बळी असून, यापूर्वी सायखेडा येथील ऊसतोड कामगाराच्या मुलाला बिबट्याने शिकार बनविले. शिवरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू झाला. भुसे येथील शुभम पोटे याचा, तर म्हाळसाकोरे येथील ढोबळे या इसमाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सध्या बिबट्याच्या भीतीने शेतमजूर कामावर जाण्यास घाबरत असून, शेतीची कामेही ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. एकप्रकारे कोणतीही संचारबंदी नसताना हा परिसर बिबट्याच्या दहशतीने अघोषित संचारबंदीचा अनुभव घेत आहे.तालुक्यातील मांजरगाव, भुसे, चाटोरी, बेरवाडी, करंजगाव, सोनगाव, शिंगवे, चापडगाव, कुरडगाव, कोठुरे, सुंदरपूर, जळगाव, काथरगाव व नांदूरमधमेश्वर परिसरात महिनाभरापासून बिबट्याचा पुन्हा मुक्तसंचार सुरू आहे. नैसर्गिक भक्ष्य मिळणे दुरापास्त झाल्याने भुकेपोटी ही जंगली श्वापदे आता रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांनाही लक्ष्य करू लागली आहेत. तीन ते चार वर्षांपासून सातत्याने उन्हाळ्यात एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत या भागातील काही गावांना बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. अडीच-तीन वर्षांपूर्वी शिवरे गावातील दोन लहान बालकांना एकाच महिन्यात बिबट्याने शिकार केले होते. उकाड्यापासून सुटका मिळावी म्हणून पल्लवी सानप ही लहान मुलगी व आजोबा सायंकाळी घराच्या अंगणात बसले होते. आठ-साडेआठ वाजेची वेळ होती. अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या भुकेल्या बिबट्याने लहान पल्लवीला तिच्या आजोबादेखत हल्ला करून पळवून नेले. तेव्हा काही अंतरावर उसाच्या शेतात शिकार झालेल्या अवस्थेत पल्लवीचा मृतदेह आढळून आला होता, तर ही घटना घडण्याच्या पंधरा दिवस अगोदर याच गावातील दुर्गेश गोसावी या अवघ्या एकवर्षीय बाळाला बिबट्याने ठार केले होते. या नरभक्षक बनलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शिवरे येथील दोघा लहानग्यांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शिवरे फाटा येथे नाशिक-औरंगाबाद महामार्ग पावणेदोन तास रोखून धरला होता. वन खात्यानेही ठिकठिकाणी पिंजरे लावले. मात्र दरवेळी या बिबट्याने हुलकावणी देत महिनाभर परिसरात आपली दहशत कायम ठेवली.