शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बालकुमार साहित्य संमेलनाचा पहिला मान लाभण्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:32 IST

नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे.

ठळक मुद्देसंमेलनातील बाल मेळाव्याला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपासनी यांनी केले.

नाशिक : नाशकात होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नऊ दशकांच्या कालावधीनंतर प्रथमच बाल साहित्य संमेलनाचा समावेश होणार आहे आणि तो मान शिरवाडकर आणि कानेटकर यांच्यासारख्या प्रतिभावान साहित्यिकांच्या कर्मभूमीला मिळाला आहे.

ही सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सांगितले.९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत बाल मेळाव्याबाबतीत नाशिकचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण संस्थांचे संचालक प्रतिनिधी यांच्या बैठकीत ते बोलत होते.

शिक्षण आणि साहित्याचा जवळचा संबंध असून, शिक्षण संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांवर साहित्यिक संस्कार व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या गुणांना व्यासपीठ मिळून देण्यासाठी संमेलनातील बाल मेळाव्याला सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपासनी यांनी केले.यावेळी व्यासपीठावर वैशाली झनकर-वीर, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, नीलेश पाटोळे, उपशिक्षणाधिकारी ए. एम. बागुल, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह संजय करंजकर, बाल मेळावा समिती प्रमुख संतोष हुदलीकर, गोखले एज्युकेशन संस्थेचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक संस्था व शाळा ज्याप्रमाणे शैक्षणिक भेटी व सहली यांचे आयोजन करतात, त्याप्रमाणे त्यांनी नाशिकला होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला भेट देण्याचा उपक्रम आवश्यक असल्याचे वैशाली झनकर-वीर यांनी सांगितले. बालकुमार मेळावा प्रमुख संतोष हुदलीकर यांनी प्रास्ताविकातून बाल मेळाव्याची माहिती दिली.

संमेलनाचे कार्यवाह संजय करंजकर यांनी आभार मानले. या बैठकीत रंजन ठाकरे, स्वप्नील पाटील, गीता बागुल, सविता कुशारे, अभिजीत साबळे आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक