शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

भाताला रास्त भाव मिळवा, शेतकरी प्रतीक्षेत

By admin | Updated: November 16, 2016 14:58 IST

मजूरांची अन पैशांची टंचाई यातून दिमाखाने मार्ग काढणाऱ्या बळीराजाला आता भाताला रास्त भाव मिळावा याची प्रतीक्षा लागली आहे. इगतपुरी येथील शेतक-याला भाताला रास्त भाव मिळावा, याची अपेक्षा

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 16 - इगतपुरी तालुक्यात भात हे आपले मुख्य पीक असून, या पिकावरही हवामान तसेच इतर सामाजिक घटकांचेही विविध परिणाम होत आहेत, त्यावर उपाय शोधण्यासाठी येत्या काळात गरजेनुसार पारंपरिक पद्धतीतील बदलांचा अवलंब करून उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. संपूर्ण जिल्ह्यात भात लागवडीत प्रगतीपथावर असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामात लागवड केलेल्या भातसोंगणीची लगबग आता सुरू झाली आहे. काही ठिकाणी भातसोंगणी होऊन शेतकऱ्यांनी खळ्यावर सुरक्षित भात नेऊन ठेवलेले आहेत. 
 
एकिकडे केंद्रशासनाने चलनातील 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याने मजुरांना देण्यासाठी पैसेच उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झालेली असताना इगतपुरी तालुक्यातील मौजे आधारवड येथील शेतकरी यंत्राच्या सहाय्याने भात कापणी करीत आहेत. मंडळ कृषि अधिकारी अरविंद पगारे, कृषी पर्यवेक्षक अशोक आल्हाट, कृषि सहाय्यक रणजित आंधळे त्यांना विशेष मार्गदर्शन करीत आहेत.
 
मजूरांची अन पैशांची टंचाई यातून दिमाखाने मार्ग काढणाऱ्या बळीराजाला आता भाताला रास्त भाव मिळावा याची प्रतीक्षा लागली आहे. तालुक्यात 126 महसुली गावांमध्ये वाड्या व वस्त्यांमधील शेतकरी प्रामुख्याने भात हे पिक घेतात. पावसाळ्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी एक हजार आठ या जातीची भातपिके घेतली होती. इगतपुरी तालुका कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या योगदानाने यावर्षी भातशेतीची उत्पादकता वाढण्यास मोठी मदत मिळाली असून ह्या भात पिकास आता अधिक भाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे.
 
तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात भातलागवड केलेले सर्वसाधारण क्षेत्र 23 हजार 332 हेक्टर होते तर खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य 31 हजार 171 एवढे होते. भाताला हमीभाव मिळण्यासाठी बळीराजा चक्क देवाला साकडे घालीत आहे.पण अजूनही त्याची प्रतीक्षा कुठे संपलेली नाही.गेल्या वर्षी खरीपपूर्व हंगामात अवकाळी पावसाने अनेक शेतक-यांच्या भातपिकाचे नुकसान झाले होते, उत्पादनात देखील मोठी घट निर्माण झाली होती. 
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन पद्धतीचा अवलंब करण्याच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषि विभागाकडून तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
 
जमिनीचे आरोग्य खालावतेय
रासायनिक खते, बदलते हवामान यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.  जमिनीचा गुणधर्म, स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी, पिकांना खत मात्राची शिफारस आदी मार्गदर्शन शेतकऱ्याना दिले गेल्याने भाताची उत्पादन क्षमता  देखील वाढली आहे. -अरविंद पगारे, मंडळ कृषि अधिकारी