शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

बचतीचा मंत्र देणाऱ्या गेडामांच्या हवाईवाऱ्या

By admin | Updated: September 9, 2016 01:32 IST

नऊ वेळा विमान प्रवास : माहिती अधिकारातून ‘असाही’ प्रवास समोर

नाशिक : महापालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना बचतीचा मंत्र देणारे माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या उण्यापुऱ्या वीस महिन्यांच्या कालावधीत मनपाच्या खर्चातून तब्बल नऊ वेळा हवाईवाऱ्या केल्याचे माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून समोर आले आहे. स्मार्ट आयुक्तांचा हा स्मार्ट प्रवास इथवरच थांबलेला नाही तर गेडाम यांनी मनपाच्या वाहनातून ३६ हजार कि.मी.चा प्रवासदेखील केला आहे. गेडाम यांनी कार्यालयीन कामकाजासाठीच हा हवाई प्रवास केला असला तरी सदस्यांना उपदेशाचे डोस पाजणाऱ्या गेडाम यांना रेल्वे अथवा रस्ते मार्गानेही प्रवास करून आदर्श प्रस्थापित करता येऊ शकला असता. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार डॉ. प्रवीण गेडाम यांनी १० नोव्हेंबर २०१४ रोजी स्वीकारला आणि तीन वर्षांच्या मुदतीची वाट न पाहता राज्य सरकारने २० महिन्यांच्या कारकीर्दीनंतर ८ जुलै २०१६ रोजी त्यांची उचलबांगडी केली. गेडाम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीबद्दल विविध उपाययोजना करत शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला. नगरसेवकांच्या विकास निधीत कपात केली. अनेक विकासकामांना कात्री लावली. दरवेळी होणाऱ्या महासभांमध्ये गेडाम यांनी सदस्यांना आर्थिक गणित समजावून सांगत बचतीचा मंत्रही दिला. मात्र, याच गेडाम यांनी आपल्या वीस महिन्यांच्या उण्यापुऱ्या कालावधीत दिल्ली, हैदराबाद आणि नागपूर येथे जाण्यासाठी हवाई मार्गाला पसंती दिल्याचे माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार समोर आले आहे. नागपूर येथे कुंभमेळ्याची शिखर समितीची बैठक असो अथवा विधानमंडळाचे कामकाज यासाठी विमान प्रवासाचा वापर करण्यात आला आहे. तसेच स्मार्ट सिटीसंदर्भात दिल्ली आणि हैदराबाद याठिकाणी झालेल्या बैठका, कार्यशाळांनाही हवाई मार्गाने जात उपस्थिती लावलेली आहे. या विमानवाऱ्यांवर १ लाख ११ हजार रुपये खर्ची पडले आहेत. विमान प्रवासाबरोबरच गेडाम यांनी मनपाच्या वाहनातून ३६ हजार ७६३ कि.मी. प्रवास केला आहे. त्यासाठी ३४१८ लिटर इंधनावर महापालिकेचा खर्च झालेला आहे. गेडाम हे नाशिकला कमी आणि जळगाव, धुळे, सोलापूर या ठिकाणीच जास्त जात असल्याची टीका स्थायी समिती व महासभांतून सदस्यांनी वेळोवेळी केली होती. माहितीच्या अधिकारान्वये गेडाम यांच्याप्रमाणेच आजवर राहिलेल्या आयुक्तांचाही वाहन खर्च समोर आला आहे. त्यात बी. डी. सानप यांनी आपल्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत ६४ हजार २८५ कि.मी. प्रवास केल्याचे तर त्यावर ७२२० लिटर्स इंधन वापरल्याचीही माहिती उघड झाली आहे. म्हणजे सानप हे प्रतिदिन सुमारे ६० ते ६५ कि.मी. वाहनातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास येते. त्याखालोखाल विलास ठाकूर यांनी ५१ हजार ९५० कि.मी. प्रवास केला असून ६१८९ लिटर्स इंधनाचा वापर झालेला आहे. (प्रतिनिधी)