शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

रानभाज्यांची शहरी खवय्येगिरी जंगल, आदिवासींच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:33 IST

दुर्गम भागामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यात सहजतेने उगवणाऱ्या पोषक, अस्सल रानभाज्यांची शहरी खवय्यांना चटक लागली आहे. पण दोन पैशांच्या मोबदल्यात शहरवासीयांची ही खवय्येगिरी मूळ आदिवासींच्या कुपोषणाला कारणीभूत तर ठरणार नाही ना? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

नाशिक : दुर्गम भागामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यात सहजतेने उगवणाऱ्या पोषक, अस्सल रानभाज्यांची शहरी खवय्यांना चटक लागली आहे. पण दोन पैशांच्या मोबदल्यात शहरवासीयांची ही खवय्येगिरी मूळ आदिवासींच्या कुपोषणाला कारणीभूत तर ठरणार नाही ना? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याशिवाय या रानभाज्यांच्या अतिरिक्त तोडणीमुळे जंगलांना हानी पोहोचण्याचीही भीती निर्माण झाली आहे. याविषयी पर्यावरण अभ्यासक जुई पेठे यांनी पाहणी केली असून, त्यांना या पाहणीत धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून जुई या रानभाज्यांचा अभ्यास करत आहेत. राज्यभरात हजारो तर नाशिक जिल्ह्यात सव्वाशेच्यावर रानभाज्यांचे प्रकार आढळत असून, त्यातले बरेचसे प्रकार आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री येत आहेत. पैशांच्या हव्यासापायी आदिवासींना चुकीचे मार्गदर्शन करून या रानभाज्यांचे व्यावसायिकीकरण केले जात आहे. त्यामुळे आदिवासींची नैसर्गिक संसाधने कमी होणे, त्यांना पैशाची चटक लागणे, शहरी लोकांकडून जंगलांचा ºहास होणे हे परिणाम पाहणीत ठळकपणे दिसून आले.पाहणीत आढळलेल्या गोष्टीसध्या शहरी भागातून रानभाज्यांना मागणी वाढली आहे. शहरांमध्ये रानभाज्यांची प्रदर्शने भरवली जात आहेत. शहरी खवय्यांना रानभाज्यांविषयीचे आकर्षण वाढलेले आहे. जंगले नष्ट होत असून, रानभाज्यांच्या वेली कमी होत चालल्या आहेत. महामार्गांवर रानभाज्या विकणाºया आदिवासींच्या जागी आता शहरी मध्यस्थही दिसू लागले आहेत. मूळ आदिवासींचे जगणे अवघड बनत चालले आहे. दर वीक एंडला मध्यस्थ शहरी नागरिकांचे जथ्थे जंगलात आणत आहेत. या जथ्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाज्या तोडल्या जात असून स्थानिक आदिवासींना त्या शिजवून देण्यास सांगितले जात आहे. एकावेळी जवळपास ५०० लोक जंगलात जाऊन कर्टुले, कोवळे बांबू, फोडशी, काळे वेल, निळे वेल, रुखाळू व इतर रानभाज्या तोडून जंगले रिकामी करत आहेत. रानभाज्यांबरोबर इतरही वनस्पती उपटल्या जात आहेत. मूळ आदिवासींसाठीच असणाºया रानभाज्यांना शहरी भागातून मागणी वाढत असल्याने आदिवासी लोक महामार्गांवर, शहरांमध्ये हा रानमेवा आणून विकत आहेत. बºयाचदा आदिवासी बांधवांना टाळून शहरी भागातले मध्यस्थ, व्यावसायिकही या व्यवसायात उतरले आहेत. वृक्षारोपणाचे प्रमाण कमी होत चालले आहे. हा रानमेवा आदिवासी विकत सुटले असून स्वत: मात्र उपाशी राहात आहेत आणि कुपोषणाची शिकार होत आहेत. हल्ली ग्रामीण पर्यटनाच्या नावाखाली शहरी भागातील मंडळी रानावनात फिरताना जंगलांचे नुकसानही करत आहेत. या प्रकारात शहरी भागातल्या मध्यस्थांची भूमिका संशयास्पद आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने आपण हे करत असल्याचे ते सांगत असले तरी कृती मात्र त्याच्या अगदी विरुद्ध असल्याचे दिसून येत आहे.आजकाल शहरी नागरिकांचे रानभाज्यांविषयीचे बेगडी प्रेम वाढले आहे. मुळात जंगल कमी होत चालले आहे. जंगली भाज्या संपुष्टात आल्या आहेत. शहरी लोकांना भाज्यांविषयी प्रेम नाही. त्यांना सुटीच्या दिवशी केवळ चवीत बदल हवा असतो. ते जंगलात जातात, भाज्यांबरोबर दिसेल ते ओरबाडून काढतात. नाजूक रानवेली पायदळी तुडवतात. निसर्गाचे नुकसान करतात. खरे तर या निसर्गात फारसा मानवी हस्तक्षेप नको, पण दुर्दैवाने तो वाढत चालला आहे. तो थांबला पाहिजे.- शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमीशहरी भागातील लोक जंगलात येऊन रानभाज्या तोडून, विकत घेऊन जातात. घरी गेल्यावर त्या भाज्या कशा करायच्या तेही बºयाचदा त्यांना समजत नसते. शिजवतात, वाफावतात, चव आवडली नाही तर फेकून देतात. सोशल मीडियावर माहिती वाचून भाज्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यात निसर्गाचे नुकसान होत आहे. शासनाचा जैवविविधता विभाग याविषयी कोणतेही धोरण आखत नसल्याने शहरी खवय्यांना रान मोकळे झाले आहे. जंगलाचे अस्तित्व यामुळे धोक्यात आले.

टॅग्स :forestजंगलenvironmentवातावरण