शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रानभाज्यांची शहरी खवय्येगिरी जंगल, आदिवासींच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:33 IST

दुर्गम भागामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यात सहजतेने उगवणाऱ्या पोषक, अस्सल रानभाज्यांची शहरी खवय्यांना चटक लागली आहे. पण दोन पैशांच्या मोबदल्यात शहरवासीयांची ही खवय्येगिरी मूळ आदिवासींच्या कुपोषणाला कारणीभूत तर ठरणार नाही ना? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

नाशिक : दुर्गम भागामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यात सहजतेने उगवणाऱ्या पोषक, अस्सल रानभाज्यांची शहरी खवय्यांना चटक लागली आहे. पण दोन पैशांच्या मोबदल्यात शहरवासीयांची ही खवय्येगिरी मूळ आदिवासींच्या कुपोषणाला कारणीभूत तर ठरणार नाही ना? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याशिवाय या रानभाज्यांच्या अतिरिक्त तोडणीमुळे जंगलांना हानी पोहोचण्याचीही भीती निर्माण झाली आहे. याविषयी पर्यावरण अभ्यासक जुई पेठे यांनी पाहणी केली असून, त्यांना या पाहणीत धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून जुई या रानभाज्यांचा अभ्यास करत आहेत. राज्यभरात हजारो तर नाशिक जिल्ह्यात सव्वाशेच्यावर रानभाज्यांचे प्रकार आढळत असून, त्यातले बरेचसे प्रकार आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री येत आहेत. पैशांच्या हव्यासापायी आदिवासींना चुकीचे मार्गदर्शन करून या रानभाज्यांचे व्यावसायिकीकरण केले जात आहे. त्यामुळे आदिवासींची नैसर्गिक संसाधने कमी होणे, त्यांना पैशाची चटक लागणे, शहरी लोकांकडून जंगलांचा ºहास होणे हे परिणाम पाहणीत ठळकपणे दिसून आले.पाहणीत आढळलेल्या गोष्टीसध्या शहरी भागातून रानभाज्यांना मागणी वाढली आहे. शहरांमध्ये रानभाज्यांची प्रदर्शने भरवली जात आहेत. शहरी खवय्यांना रानभाज्यांविषयीचे आकर्षण वाढलेले आहे. जंगले नष्ट होत असून, रानभाज्यांच्या वेली कमी होत चालल्या आहेत. महामार्गांवर रानभाज्या विकणाºया आदिवासींच्या जागी आता शहरी मध्यस्थही दिसू लागले आहेत. मूळ आदिवासींचे जगणे अवघड बनत चालले आहे. दर वीक एंडला मध्यस्थ शहरी नागरिकांचे जथ्थे जंगलात आणत आहेत. या जथ्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाज्या तोडल्या जात असून स्थानिक आदिवासींना त्या शिजवून देण्यास सांगितले जात आहे. एकावेळी जवळपास ५०० लोक जंगलात जाऊन कर्टुले, कोवळे बांबू, फोडशी, काळे वेल, निळे वेल, रुखाळू व इतर रानभाज्या तोडून जंगले रिकामी करत आहेत. रानभाज्यांबरोबर इतरही वनस्पती उपटल्या जात आहेत. मूळ आदिवासींसाठीच असणाºया रानभाज्यांना शहरी भागातून मागणी वाढत असल्याने आदिवासी लोक महामार्गांवर, शहरांमध्ये हा रानमेवा आणून विकत आहेत. बºयाचदा आदिवासी बांधवांना टाळून शहरी भागातले मध्यस्थ, व्यावसायिकही या व्यवसायात उतरले आहेत. वृक्षारोपणाचे प्रमाण कमी होत चालले आहे. हा रानमेवा आदिवासी विकत सुटले असून स्वत: मात्र उपाशी राहात आहेत आणि कुपोषणाची शिकार होत आहेत. हल्ली ग्रामीण पर्यटनाच्या नावाखाली शहरी भागातील मंडळी रानावनात फिरताना जंगलांचे नुकसानही करत आहेत. या प्रकारात शहरी भागातल्या मध्यस्थांची भूमिका संशयास्पद आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने आपण हे करत असल्याचे ते सांगत असले तरी कृती मात्र त्याच्या अगदी विरुद्ध असल्याचे दिसून येत आहे.आजकाल शहरी नागरिकांचे रानभाज्यांविषयीचे बेगडी प्रेम वाढले आहे. मुळात जंगल कमी होत चालले आहे. जंगली भाज्या संपुष्टात आल्या आहेत. शहरी लोकांना भाज्यांविषयी प्रेम नाही. त्यांना सुटीच्या दिवशी केवळ चवीत बदल हवा असतो. ते जंगलात जातात, भाज्यांबरोबर दिसेल ते ओरबाडून काढतात. नाजूक रानवेली पायदळी तुडवतात. निसर्गाचे नुकसान करतात. खरे तर या निसर्गात फारसा मानवी हस्तक्षेप नको, पण दुर्दैवाने तो वाढत चालला आहे. तो थांबला पाहिजे.- शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमीशहरी भागातील लोक जंगलात येऊन रानभाज्या तोडून, विकत घेऊन जातात. घरी गेल्यावर त्या भाज्या कशा करायच्या तेही बºयाचदा त्यांना समजत नसते. शिजवतात, वाफावतात, चव आवडली नाही तर फेकून देतात. सोशल मीडियावर माहिती वाचून भाज्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यात निसर्गाचे नुकसान होत आहे. शासनाचा जैवविविधता विभाग याविषयी कोणतेही धोरण आखत नसल्याने शहरी खवय्यांना रान मोकळे झाले आहे. जंगलाचे अस्तित्व यामुळे धोक्यात आले.

टॅग्स :forestजंगलenvironmentवातावरण