शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

रानभाज्यांची शहरी खवय्येगिरी जंगल, आदिवासींच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:33 IST

दुर्गम भागामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यात सहजतेने उगवणाऱ्या पोषक, अस्सल रानभाज्यांची शहरी खवय्यांना चटक लागली आहे. पण दोन पैशांच्या मोबदल्यात शहरवासीयांची ही खवय्येगिरी मूळ आदिवासींच्या कुपोषणाला कारणीभूत तर ठरणार नाही ना? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

नाशिक : दुर्गम भागामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यात सहजतेने उगवणाऱ्या पोषक, अस्सल रानभाज्यांची शहरी खवय्यांना चटक लागली आहे. पण दोन पैशांच्या मोबदल्यात शहरवासीयांची ही खवय्येगिरी मूळ आदिवासींच्या कुपोषणाला कारणीभूत तर ठरणार नाही ना? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. याशिवाय या रानभाज्यांच्या अतिरिक्त तोडणीमुळे जंगलांना हानी पोहोचण्याचीही भीती निर्माण झाली आहे. याविषयी पर्यावरण अभ्यासक जुई पेठे यांनी पाहणी केली असून, त्यांना या पाहणीत धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून जुई या रानभाज्यांचा अभ्यास करत आहेत. राज्यभरात हजारो तर नाशिक जिल्ह्यात सव्वाशेच्यावर रानभाज्यांचे प्रकार आढळत असून, त्यातले बरेचसे प्रकार आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री येत आहेत. पैशांच्या हव्यासापायी आदिवासींना चुकीचे मार्गदर्शन करून या रानभाज्यांचे व्यावसायिकीकरण केले जात आहे. त्यामुळे आदिवासींची नैसर्गिक संसाधने कमी होणे, त्यांना पैशाची चटक लागणे, शहरी लोकांकडून जंगलांचा ºहास होणे हे परिणाम पाहणीत ठळकपणे दिसून आले.पाहणीत आढळलेल्या गोष्टीसध्या शहरी भागातून रानभाज्यांना मागणी वाढली आहे. शहरांमध्ये रानभाज्यांची प्रदर्शने भरवली जात आहेत. शहरी खवय्यांना रानभाज्यांविषयीचे आकर्षण वाढलेले आहे. जंगले नष्ट होत असून, रानभाज्यांच्या वेली कमी होत चालल्या आहेत. महामार्गांवर रानभाज्या विकणाºया आदिवासींच्या जागी आता शहरी मध्यस्थही दिसू लागले आहेत. मूळ आदिवासींचे जगणे अवघड बनत चालले आहे. दर वीक एंडला मध्यस्थ शहरी नागरिकांचे जथ्थे जंगलात आणत आहेत. या जथ्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाज्या तोडल्या जात असून स्थानिक आदिवासींना त्या शिजवून देण्यास सांगितले जात आहे. एकावेळी जवळपास ५०० लोक जंगलात जाऊन कर्टुले, कोवळे बांबू, फोडशी, काळे वेल, निळे वेल, रुखाळू व इतर रानभाज्या तोडून जंगले रिकामी करत आहेत. रानभाज्यांबरोबर इतरही वनस्पती उपटल्या जात आहेत. मूळ आदिवासींसाठीच असणाºया रानभाज्यांना शहरी भागातून मागणी वाढत असल्याने आदिवासी लोक महामार्गांवर, शहरांमध्ये हा रानमेवा आणून विकत आहेत. बºयाचदा आदिवासी बांधवांना टाळून शहरी भागातले मध्यस्थ, व्यावसायिकही या व्यवसायात उतरले आहेत. वृक्षारोपणाचे प्रमाण कमी होत चालले आहे. हा रानमेवा आदिवासी विकत सुटले असून स्वत: मात्र उपाशी राहात आहेत आणि कुपोषणाची शिकार होत आहेत. हल्ली ग्रामीण पर्यटनाच्या नावाखाली शहरी भागातील मंडळी रानावनात फिरताना जंगलांचे नुकसानही करत आहेत. या प्रकारात शहरी भागातल्या मध्यस्थांची भूमिका संशयास्पद आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने आपण हे करत असल्याचे ते सांगत असले तरी कृती मात्र त्याच्या अगदी विरुद्ध असल्याचे दिसून येत आहे.आजकाल शहरी नागरिकांचे रानभाज्यांविषयीचे बेगडी प्रेम वाढले आहे. मुळात जंगल कमी होत चालले आहे. जंगली भाज्या संपुष्टात आल्या आहेत. शहरी लोकांना भाज्यांविषयी प्रेम नाही. त्यांना सुटीच्या दिवशी केवळ चवीत बदल हवा असतो. ते जंगलात जातात, भाज्यांबरोबर दिसेल ते ओरबाडून काढतात. नाजूक रानवेली पायदळी तुडवतात. निसर्गाचे नुकसान करतात. खरे तर या निसर्गात फारसा मानवी हस्तक्षेप नको, पण दुर्दैवाने तो वाढत चालला आहे. तो थांबला पाहिजे.- शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमीशहरी भागातील लोक जंगलात येऊन रानभाज्या तोडून, विकत घेऊन जातात. घरी गेल्यावर त्या भाज्या कशा करायच्या तेही बºयाचदा त्यांना समजत नसते. शिजवतात, वाफावतात, चव आवडली नाही तर फेकून देतात. सोशल मीडियावर माहिती वाचून भाज्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यात निसर्गाचे नुकसान होत आहे. शासनाचा जैवविविधता विभाग याविषयी कोणतेही धोरण आखत नसल्याने शहरी खवय्यांना रान मोकळे झाले आहे. जंगलाचे अस्तित्व यामुळे धोक्यात आले.

टॅग्स :forestजंगलenvironmentवातावरण