शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

वातावरणात गारठा : नाशिककरांना १२ वाजता घडले सुर्यदर्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 15:07 IST

थंडीचा कडाका वाढला असून बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देकमाल तापमानदेखील २८ अंशावरून शुक्रवारी थेट २६अंशापर्यंतसर्दी-पडसे, खोकल्याचे रूग्ण वाढले

नाशिक : ढगाळ हवामान...सुटलेला थंड वारा... घसरलेला किमान तापमानाचा पारा अशा वातावरणाचा सध्या नाशिककर आठवडाभरापासून अनुभव घेत आहे. शनिवारी (दि.४) चक्क नाशिककरांना सुर्योदय झाला की नाही, हे दुपारी १२ वाजेपर्यंत लक्षातच आले नाही, कारण पहाटेपासून दाटलेले मळभ हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास काहीसे हटले आणि सुर्यकिरणे जमिनीवर पडली. त्यामुळे नाशिककरांनी पहाटेपासून दुपारपर्यंत थंडीचा कडाका अनुभवला.नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि.१) थंडीच्या चालू हंगामातील सर्वाधिक कडाक्याची थंडी नाशिककरांनी अनुभवली. या हंगामातील निचांकी १०.३ अंशापर्यंत पारा घसरला. यामुळे नाशिक हे राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले. पहाटेपासून नाशिककरांना हुडहुडी भरली होती. तसेच दिवसभर नाशिककरांनी उबदार कपडे परिधान करण्यास पसंती दिली. बुधवारी तापमानाचा पारा ११.६ अंशापर्यंत मोजला गेला. शुक्रवारी किमान तापमान ११.२ अंश इतके होते. डिसेंबरअखेर १३ अंशापर्र्यंत किमान तापमानाचा पारा स्थिरावत होता; मात्र नवीन वर्ष उजाडताच पारा थेट १० अंशापर्यंत खाली घसरला. याबरोबरच कमाल तापमानदेखील २८ अंशावरून शुक्रवारी थेट २६अंशापर्यंत खाली आले. यामुळे नाशिककरांना सध्या दिवसाही वातावरणता कमालीचा गारवा जाणवू लागला आहे. नागरिक दिवसाही स्वेटर, हाफ जॅकेट परिधान करून दैनंदिन कामे आटोपताना दिसून येत आहे. चाकरमान्यांनी कार्यालयांमध्ये उबदार कपडे परिधान करूनच कामे उरकण्यास प्राधान्य दिले. दुपारी दोन वाजेपासून शहरात पुन्हा ढग दाटून येऊ लागले. सुर्यप्रकाश फारसा कडक पडत नसल्याने वातावरणात गारवा टिकून आहे. अधुनमधुन सुर्य ढगाआड जात असल्याने थंडीची तीव्रता कायम असल्याचे दिसून येत आहे.उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे. नव्या वर्षाचा पहिल्या आठवड्यात थंडीची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरमध्ये बफवृष्टी जोरदार सुरू असून तेथील धबधबेदेखील गोठले गेले असून किमान तापमान उणे झाले आहे. यामुळे उत्तर भारत गारठला आहे. परिणामी या वातावरणाचा परिणाम उत्तर महाराष्टÑासह विदर्भ, मराठवाड्यावरही होऊ लागला आहे. विदर्भात झालेला अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे उत्तर महाराष्टÑाच्या वातावरणावरही परिणाम होताना दिसून येत आहे.सर्दी-पडसे, खोकल्याचे रूग्ण वाढलेथंडीचा कडाका वाढला असून बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. परिणामी खासगी दवाखान्यांसह सार्वजनिक रूग्णालयांमध्येही रूग्णसंख्या वाढली आहे. नागरिकांनी बदलत्या हवामानाच्या त्रासापासून बचाव करताना पाणी उकळून प्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जात आहे. तसेच थंड गुणधर्माची फळे तसेच अन्य खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहाटे तसेच रात्री घराबाहेर पडताना नाका-तोंडावर रुमाल बांधावा किंवा उबदार कापड व डोक्यावरदेखील टोपी न विसरता परिधान करावी, असे डॉक्टर सांगतात.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान