शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गंगापूर धरण ९६ टक्के भरले; दोन दिवसांपासून दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 16:03 IST

धरणक्षेत्रांत पर्जन्यवृष्टी वाढल्यास गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे नदीकाठाच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देधरणसाठा सुमारे ५ हजार ४२० दलघफू

नाशिक :गंगापूर धरण समुहाच्या क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. शनिवारी गंगापूर धरणाच्या क्षेत्रात ९५ तर काश्यपीच्या परिसरात ४६ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच रविवारी (दि.६) मध्यरात्री गौतमी धरणाच्या परिसरात ४६ मिमी पाऊस पडल्यामुळे धरणसाठ्यात पूरपाणी वाढल्याने गंगापूर धरण आता ९६.२५टक्के इतके भरले आहे.गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस शनिवारपासून होत आहे. यामुळे धरणाच्या जलसाठ्यात हळुहळु वाढ होऊ लागली आहे. गंगापूर धरणातून सध्या मागील चार ते पाच दिवसांपासून विसर्ग पुर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. धरणसाठा सुमारे ५ हजार ४२० दलघफू इतका झाला आहे. यामुळे धरण ९६.२५ टक्के इतके रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत भरले होते. गंगापूर समुहात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्यास पुन्हा विसर्ग सोडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शहरातसुध्दा रविवारी दुपारी अर्धा तास जोरदार पावसाने झोडपले. हवामान खात्याकडून सलग मागील दोन दिवसांपासून दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला जात आहे. यामुळे धरणक्षेत्रांत पर्जन्यवृष्टी वाढल्यास गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे नदीकाठाच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील धरणांची स्थिती अशी....नाशिक जिल्ह्यातील दारणा ९६.६८ टक्के, मुकणे ८३.२० टक्के, वाकी ८६.८८ टक्के,कडवा, भाम, भावली, भोजापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या प्रत्येकी १०० टक्के, काश्यपी ६७.६५ टक्के, गौतमी ७९.८० टक्के, आळंदी ७९.५४ टक्के, पालखेड ८८.४८ टक्के इतके भरले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरणgodavariगोदावरीRainपाऊस