शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भगूरला वाहतेय विकासाची गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:00 IST

भगूर शहरात विकासाची गंगा वाहत असली तरी काही समस्या गावाला भेडसावत आहेत. त्यामध्ये भगूर नगरपालिकेचा दवाखाना बंद झाला आहे.

विलास भालेराव

भगूर शहरात विकासाची गंगा वाहत असली तरी काही समस्या गावाला भेडसावत आहेत. त्यामध्ये भगूर नगरपालिकेचा दवाखाना बंद झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू, डेंग्यूसारखे आजार गावात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे. जनतेकडून अग्निशमन कर रूपाने गोळा केला जातो. अग्निशमन गाडी विकत घेतली. मात्र प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने अग्निशमन यंत्रणा ठप्प झालेली आहे. दुसऱ्याच्या भरवशावर आग विझवायची वेळ भगूरकरांवर आहे. भगूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांना सोयी-सुविधा मिळाली नाही. तरी कृषी उत्पन्न बाजार समिती येणे गरजेचे आहे. भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक आहे. पालिकेने, राजकीय नेत्यांनी पाठपुरावा करून ते राष्टÑीय स्मारक करणे गरजेचे असून, त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल. येत्या दशकात भगूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासगंगा वाहणार असून, शहराचा कायापालट होत आहे. भगूरला तालुक्याचा दर्जाही मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु भगूरचे मूळ व्यापारी, व्यावसायिक, नोकरी करणारे नावलौकिक बरेचशे नागरी कुटुंबे नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प आणि विशेषत: विजयनगर परिसरात कायमस्वरूपी राहाण्यास गेल्याने केवळ मुत्सदी, बलाढ्य राजकारणी नेत्यांनी भगूर नगरपालिकेचे अस्तित्व अबाधित ठेवून भगूरच्या वैभवात भर घालीत आहेत.१०० वर्षांपूर्वी चार गल्ल्यांचे आणि २ ते ३ हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या भगूर गावाला विकासाचा खरा आकार सन १९२५ मध्ये भगूर नगरपालिका स्थापन झाल्यावर आला. जसजशी भगूरची लोकसंख्या वाढत गेली तसा गावाचा विकास होत गेला. हळूहळू झोपड्या जाऊन कौलारू घरे आली. त्यानंतर सिमेंट, पत्र्याची वसाहती निर्माण होऊन चार गल्ल्यांच्या गावाचे आता १७ प्रभाग होऊन भगूर नगरपालिकेत विकासासाठी आपला वॉर्डाचा प्रभागाचा हक्काचा नगरसेवक असे १७ नगरसेवक शहराच्या विकासाचा विचार करू लागले. आता भगूर शहर हे संपूर्ण काँक्रीटीकरण झाले. एकेकाळी पिण्याच्या पाण्यासाठी भगूरचा नगराध्यक्षांना मोर्चाद्वारे बांगड्याचा आहेर देणाºया महिलांना मुबलक पाणी मिळते आहे, तर बहुतांश अत्यावश्यक सुविधा नागरिकांना मिळत असल्याने काहीसा विकास झाल्याचे वाटत आहे.तरीपण येत्या २०२० ते ३० या दशकात नाशिकरोड, देवळाली कॅम्प आणि परिसरातील गावामध्ये भगूरचा गावाचा आकर्षक विकास होण्याच्या मार्गावर असून, भगूरमध्ये मोठमोठे रोजगार निर्माण होऊन झोपडपट्टी मुक्त भगूर शहर नावारूपाला येऊन भगूर बाहेर गेलेले नागरिक, व्यापारी येत्या दशकात पुन्हा आपल्या भगूर नगरीत राहाण्यास येण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. भगूरच्या दळणवळण विकासाला हातभार लागला तो म्हणजे नुकताच नव्याने १५ कोटींचा भगूर रेल्वेगेट क्रॉसिंग उड्डाणपूल आणि चार कोटींचा जुना रेल्वे मोरी पूल यामुळे भगूरकरांचे दळण-वळण सुविधा वाढेल. शिवाय इतर गावांतील नागरिक खरेदी-विक्रीसाठी याच सुसज्ज मार्गाने येण्यास पसंत करतील आणि इगतपुरी, सिन्नर, नाशिक या तीन तालुक्याचे व्यापारी केंद्र म्हणून भगूर शहरात सुरुवात होणार आहे. यापूर्वी १५ खेड्यातील नागरिक भगूरमध्ये येत होते. परंतु रस्ते इतर सुविधांमुळे दुरावत चालले होते. परंतु त्यांना निश्चित दिशा मिळून वाटचाल सुरू होत आहे. तसेच भगूर नगरपालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांसाठी चार कोटी रुपयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केटच्या कामाला नुकतीच सुरूवात झाली आहे. २ ते ३ वर्षात छानपैकी होणार आहे. त्यामुळे परिसरातील विविध खेड्यातील शेतकरी येथे शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येणार. तसेच खरेदीसाठी इतर गावातील नागरिक निश्चित येणार त्यामुळे भाजी मार्केट समस्या संपणार त्याचा भगूर विकासाला हातभार लागणार. गेल्या चार-पाच वर्षापासून भगूरला स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर उद्यानाचे ५ ते ६ कोटीचे काम चालू आहे. जसजसे शासनाचे अनुदान येत राहील तसे त्यांचे काम पूर्णत्वास येईल म्हणजे भविष्यात हे सावरकर उद्यान पर्यटकांसाठी खुले राहील त्यामुळे वैभवात भर पडेलच.

टॅग्स :Nashikनाशिक