शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

येवल्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:26 IST

पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

येवला : पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.  २५ जानेवारीपर्यंत तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. सध्या ५० दलघफू साठवण क्षमतेच्या साठवण तलावात केवळ ७.५ दलघफू पाणी शिल्लक आहे. त्यात १ ते १.५ दलघफू मृत पाण्याचा साठा गृहीत धरला जातो. पालखेड पाण्याचे आवर्तन २० मार्चदरम्यान मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साठवण तलावात शिल्लक सुमारे साडेसहा दलघफू पाणी २० मार्चपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीसंकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले आहे. याबाबत शहरवासियांना ध्वनी क्षेपकावरून माहिती देण्यात आली आहे.शहर व तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक योजना असूनही शहर वासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शहर पाणीपुरवठा साठवण तलावातील पाणी संपुष्टात येण्यास नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न शहरवासीयांनी अनेकदा उपस्थित केला आहे. कोट्यावधी रु पयांच्या चार पाणीपुरवठा योजनाराबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.साठवण तलावातील शिल्लक पाण्याची पाहणी येथील प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार रोहीदास वारु ळे, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्यासह पाणीपुरवठा प्रमुख एस. एस. फागनेकर यांनी केली. यावेळी अमर्याद उपसा सुरु असलेल्या विहिरीवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना दिले.पालखेड पाणी आवर्तनानेशहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफू पाणी मार्चअखेरपर्यंत पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायालाच हवे. पण नेमके गणित बिघडले ते कुठे हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी चार दिवस आड पाणी मिळण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र श्रोत नसल्याने पालिकेच्या साठवण तलावाच्या उद्भावातून चालणाऱ्या विहिरीतील पाण्याचा वापर संपूर्ण तालुक्यातील टंचाईच्या गावांना केला जातो. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा त्यामुळे शहरात अवेळीच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ वारंवार येते. हे नित्याचे पंचायत समितीने तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी . सारा भार येवला शहरवासियांच्या माथी पडतो. शहरवासीयांनी पाणीपट्टी १२ महीन्याची भरायची आणि वर्षातून सरासरी ४ ते ६ दिवसाआड पाणी घ्यायचे हा कुठला न्याय?शहर साठवण तलाव काही विहीर मालकांसाठी आहे का ? साठवण तलाव तालुक्यासाठी आहे का ? असा प्रश्न खुलेआम नागरीकानी उपस्थित केला आहे. या बाबत देखील पालिकेने गांभीर्याने विचार करण्याची गरज जाणकार व्यक्त करीत आहे.मोफत अथवा शासकीय पाणी पुरवठा या नावाखाली पाण्याचा धंदा होता कामा नये. अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर पाणी उपसा यामुळे अवेळीच पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये अशी शहरवासियांची अपेक्षा आहे...अन्यथा सात दिवसाआड पाणीशहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. आता सुमारे ६ द.ल.घ.फुट पाणी शिल्लक आहे. जर काटेकोर नियोजन करून उपाय योजना केली तरच शहरवासियांना चार दिवसा आड पाणी पुरवठा करता येईल. अन्यथा ७ दिवसाआड करण्याची वेळ येईल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashikनाशिक