शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

येवल्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:26 IST

पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

येवला : पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.  २५ जानेवारीपर्यंत तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. सध्या ५० दलघफू साठवण क्षमतेच्या साठवण तलावात केवळ ७.५ दलघफू पाणी शिल्लक आहे. त्यात १ ते १.५ दलघफू मृत पाण्याचा साठा गृहीत धरला जातो. पालखेड पाण्याचे आवर्तन २० मार्चदरम्यान मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साठवण तलावात शिल्लक सुमारे साडेसहा दलघफू पाणी २० मार्चपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीसंकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले आहे. याबाबत शहरवासियांना ध्वनी क्षेपकावरून माहिती देण्यात आली आहे.शहर व तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक योजना असूनही शहर वासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शहर पाणीपुरवठा साठवण तलावातील पाणी संपुष्टात येण्यास नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न शहरवासीयांनी अनेकदा उपस्थित केला आहे. कोट्यावधी रु पयांच्या चार पाणीपुरवठा योजनाराबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.साठवण तलावातील शिल्लक पाण्याची पाहणी येथील प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार रोहीदास वारु ळे, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्यासह पाणीपुरवठा प्रमुख एस. एस. फागनेकर यांनी केली. यावेळी अमर्याद उपसा सुरु असलेल्या विहिरीवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना दिले.पालखेड पाणी आवर्तनानेशहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफू पाणी मार्चअखेरपर्यंत पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायालाच हवे. पण नेमके गणित बिघडले ते कुठे हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी चार दिवस आड पाणी मिळण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र श्रोत नसल्याने पालिकेच्या साठवण तलावाच्या उद्भावातून चालणाऱ्या विहिरीतील पाण्याचा वापर संपूर्ण तालुक्यातील टंचाईच्या गावांना केला जातो. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा त्यामुळे शहरात अवेळीच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ वारंवार येते. हे नित्याचे पंचायत समितीने तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी . सारा भार येवला शहरवासियांच्या माथी पडतो. शहरवासीयांनी पाणीपट्टी १२ महीन्याची भरायची आणि वर्षातून सरासरी ४ ते ६ दिवसाआड पाणी घ्यायचे हा कुठला न्याय?शहर साठवण तलाव काही विहीर मालकांसाठी आहे का ? साठवण तलाव तालुक्यासाठी आहे का ? असा प्रश्न खुलेआम नागरीकानी उपस्थित केला आहे. या बाबत देखील पालिकेने गांभीर्याने विचार करण्याची गरज जाणकार व्यक्त करीत आहे.मोफत अथवा शासकीय पाणी पुरवठा या नावाखाली पाण्याचा धंदा होता कामा नये. अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर पाणी उपसा यामुळे अवेळीच पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये अशी शहरवासियांची अपेक्षा आहे...अन्यथा सात दिवसाआड पाणीशहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. आता सुमारे ६ द.ल.घ.फुट पाणी शिल्लक आहे. जर काटेकोर नियोजन करून उपाय योजना केली तरच शहरवासियांना चार दिवसा आड पाणी पुरवठा करता येईल. अन्यथा ७ दिवसाआड करण्याची वेळ येईल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashikनाशिक