शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:26 IST

पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

येवला : पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.  २५ जानेवारीपर्यंत तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. सध्या ५० दलघफू साठवण क्षमतेच्या साठवण तलावात केवळ ७.५ दलघफू पाणी शिल्लक आहे. त्यात १ ते १.५ दलघफू मृत पाण्याचा साठा गृहीत धरला जातो. पालखेड पाण्याचे आवर्तन २० मार्चदरम्यान मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साठवण तलावात शिल्लक सुमारे साडेसहा दलघफू पाणी २० मार्चपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीसंकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले आहे. याबाबत शहरवासियांना ध्वनी क्षेपकावरून माहिती देण्यात आली आहे.शहर व तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक योजना असूनही शहर वासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शहर पाणीपुरवठा साठवण तलावातील पाणी संपुष्टात येण्यास नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न शहरवासीयांनी अनेकदा उपस्थित केला आहे. कोट्यावधी रु पयांच्या चार पाणीपुरवठा योजनाराबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.साठवण तलावातील शिल्लक पाण्याची पाहणी येथील प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार रोहीदास वारु ळे, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्यासह पाणीपुरवठा प्रमुख एस. एस. फागनेकर यांनी केली. यावेळी अमर्याद उपसा सुरु असलेल्या विहिरीवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना दिले.पालखेड पाणी आवर्तनानेशहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफू पाणी मार्चअखेरपर्यंत पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायालाच हवे. पण नेमके गणित बिघडले ते कुठे हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी चार दिवस आड पाणी मिळण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र श्रोत नसल्याने पालिकेच्या साठवण तलावाच्या उद्भावातून चालणाऱ्या विहिरीतील पाण्याचा वापर संपूर्ण तालुक्यातील टंचाईच्या गावांना केला जातो. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा त्यामुळे शहरात अवेळीच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ वारंवार येते. हे नित्याचे पंचायत समितीने तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी . सारा भार येवला शहरवासियांच्या माथी पडतो. शहरवासीयांनी पाणीपट्टी १२ महीन्याची भरायची आणि वर्षातून सरासरी ४ ते ६ दिवसाआड पाणी घ्यायचे हा कुठला न्याय?शहर साठवण तलाव काही विहीर मालकांसाठी आहे का ? साठवण तलाव तालुक्यासाठी आहे का ? असा प्रश्न खुलेआम नागरीकानी उपस्थित केला आहे. या बाबत देखील पालिकेने गांभीर्याने विचार करण्याची गरज जाणकार व्यक्त करीत आहे.मोफत अथवा शासकीय पाणी पुरवठा या नावाखाली पाण्याचा धंदा होता कामा नये. अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर पाणी उपसा यामुळे अवेळीच पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये अशी शहरवासियांची अपेक्षा आहे...अन्यथा सात दिवसाआड पाणीशहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. आता सुमारे ६ द.ल.घ.फुट पाणी शिल्लक आहे. जर काटेकोर नियोजन करून उपाय योजना केली तरच शहरवासियांना चार दिवसा आड पाणी पुरवठा करता येईल. अन्यथा ७ दिवसाआड करण्याची वेळ येईल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashikनाशिक