शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

येवल्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:26 IST

पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

येवला : पालखेड डाव्या कालव्याचे पुढील पाणी आवर्तन मिळेपर्यंत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.  २५ जानेवारीपर्यंत तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होता. सध्या ५० दलघफू साठवण क्षमतेच्या साठवण तलावात केवळ ७.५ दलघफू पाणी शिल्लक आहे. त्यात १ ते १.५ दलघफू मृत पाण्याचा साठा गृहीत धरला जातो. पालखेड पाण्याचे आवर्तन २० मार्चदरम्यान मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साठवण तलावात शिल्लक सुमारे साडेसहा दलघफू पाणी २० मार्चपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीसंकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी केले आहे. याबाबत शहरवासियांना ध्वनी क्षेपकावरून माहिती देण्यात आली आहे.शहर व तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक योजना असूनही शहर वासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शहर पाणीपुरवठा साठवण तलावातील पाणी संपुष्टात येण्यास नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न शहरवासीयांनी अनेकदा उपस्थित केला आहे. कोट्यावधी रु पयांच्या चार पाणीपुरवठा योजनाराबवूनही येवलेकरांचा घसा कोरडाच आहे.साठवण तलावातील शिल्लक पाण्याची पाहणी येथील प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार रोहीदास वारु ळे, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्यासह पाणीपुरवठा प्रमुख एस. एस. फागनेकर यांनी केली. यावेळी अमर्याद उपसा सुरु असलेल्या विहिरीवर कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना दिले.पालखेड पाणी आवर्तनानेशहर साठवण तलावात भरलेले ४० दलघफू पाणी मार्चअखेरपर्यंत पुरणार होते. शहराला दररोज ५० लाख लिटर पाणी लागते. बाष्पीभवन व पाण्याचा अन्य मार्गाने अपव्यय झाला तरीही पाणी पुरायालाच हवे. पण नेमके गणित बिघडले ते कुठे हे सर्वांना समजत असूनही त्यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. वर्षभरासाठी पाणीपट्टी आकारून शहराला घरटी चार दिवस आड पाणी मिळण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र श्रोत नसल्याने पालिकेच्या साठवण तलावाच्या उद्भावातून चालणाऱ्या विहिरीतील पाण्याचा वापर संपूर्ण तालुक्यातील टंचाईच्या गावांना केला जातो. शिवाय सभोवतालच्या सुमारे २०० विहिरीतून होणारा अमर्याद उपसा त्यामुळे शहरात अवेळीच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ वारंवार येते. हे नित्याचे पंचायत समितीने तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी . सारा भार येवला शहरवासियांच्या माथी पडतो. शहरवासीयांनी पाणीपट्टी १२ महीन्याची भरायची आणि वर्षातून सरासरी ४ ते ६ दिवसाआड पाणी घ्यायचे हा कुठला न्याय?शहर साठवण तलाव काही विहीर मालकांसाठी आहे का ? साठवण तलाव तालुक्यासाठी आहे का ? असा प्रश्न खुलेआम नागरीकानी उपस्थित केला आहे. या बाबत देखील पालिकेने गांभीर्याने विचार करण्याची गरज जाणकार व्यक्त करीत आहे.मोफत अथवा शासकीय पाणी पुरवठा या नावाखाली पाण्याचा धंदा होता कामा नये. अमर्याद केला जाणारा बेकायदेशीर पाणी उपसा यामुळे अवेळीच पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येवू नये अशी शहरवासियांची अपेक्षा आहे...अन्यथा सात दिवसाआड पाणीशहराला पिण्यासाठी रोज ५० लाख लिटर पाणी लागते. आता सुमारे ६ द.ल.घ.फुट पाणी शिल्लक आहे. जर काटेकोर नियोजन करून उपाय योजना केली तरच शहरवासियांना चार दिवसा आड पाणी पुरवठा करता येईल. अन्यथा ७ दिवसाआड करण्याची वेळ येईल.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईNashikनाशिक