शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

By अझहर शेख | Updated: April 25, 2023 13:29 IST

राज्यात पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.

नाशिक : जिल्ह्यात मागील महिन्यापासून अवकाळी पावसाचे धुमशान सुरूच आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने बळीराजाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता; मात्र पुन्हा एकदा अवकाळीचे ढग दाटून येणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. पुढील चार दिवस नाशिक जिल्ह्यासाठी धोकादायक राहणार आहेत. बुधवारी (दि. २६) ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

राज्यात पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि. २५) ‘यलो अलर्ट’ तर बुधवारी ‘ऑरेंज’ आणि पुढे शुक्रवारपर्यंत पुन्हा यलो अलर्ट दर्शविण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व गडगडाटी पाऊस जिल्ह्यात होऊ शकतो. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना सोमवारी (दि.२४) तातडीने आदेशित करत उपाययोजना व विविध सूचना देण्याबाबत पत्र काढले आहे.

दरम्यान, गेल्या १ मार्चपासून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ५०.१ मिमी. इतका बेमोसमी पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली आहे. बेमोसमी पावसाने दीड महिन्यात अर्धशतक पूर्ण केले आहे. यंदा नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतपिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आर्थिक नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून आटोपले जात नाहीत; तोच पुन्हा दारावर संकट येऊन उभे राहिले आहे. ७ एप्रिल ते १६ एप्रिल या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून अलीकडेच पूर्ण केले गेले. अद्याप अंतिम प्रपत्रदेखील सादर झालेले नाही; मात्र पुन्हा चार दिवस पावसाचे दर्शविण्यात आल्याने प्रशासनानेही धसका घेतला आहे.

विजांचा अधिक तीव्र कडकडाट!

विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट सुरू होताच आपले पशुधन हे छप्परबंद निवारागृहात हलवावे, तसेच शेतकरी, शेतमजुरांनीही घरात आश्रय घ्यावा. उघड्यावर थांबू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून करण्यात आले आहे. वीज कोसळून यापूर्वीही मनुष्यहानी जिल्ह्यात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या चार दिवसांमध्ये वीजांचा लखलखाट जास्त तीव्रतेने होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक