शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

By अझहर शेख | Updated: April 25, 2023 13:29 IST

राज्यात पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.

नाशिक : जिल्ह्यात मागील महिन्यापासून अवकाळी पावसाचे धुमशान सुरूच आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने बळीराजाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता; मात्र पुन्हा एकदा अवकाळीचे ढग दाटून येणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. पुढील चार दिवस नाशिक जिल्ह्यासाठी धोकादायक राहणार आहेत. बुधवारी (दि. २६) ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

राज्यात पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि. २५) ‘यलो अलर्ट’ तर बुधवारी ‘ऑरेंज’ आणि पुढे शुक्रवारपर्यंत पुन्हा यलो अलर्ट दर्शविण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व गडगडाटी पाऊस जिल्ह्यात होऊ शकतो. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना सोमवारी (दि.२४) तातडीने आदेशित करत उपाययोजना व विविध सूचना देण्याबाबत पत्र काढले आहे.

दरम्यान, गेल्या १ मार्चपासून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ५०.१ मिमी. इतका बेमोसमी पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली आहे. बेमोसमी पावसाने दीड महिन्यात अर्धशतक पूर्ण केले आहे. यंदा नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतपिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आर्थिक नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून आटोपले जात नाहीत; तोच पुन्हा दारावर संकट येऊन उभे राहिले आहे. ७ एप्रिल ते १६ एप्रिल या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून अलीकडेच पूर्ण केले गेले. अद्याप अंतिम प्रपत्रदेखील सादर झालेले नाही; मात्र पुन्हा चार दिवस पावसाचे दर्शविण्यात आल्याने प्रशासनानेही धसका घेतला आहे.

विजांचा अधिक तीव्र कडकडाट!

विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट सुरू होताच आपले पशुधन हे छप्परबंद निवारागृहात हलवावे, तसेच शेतकरी, शेतमजुरांनीही घरात आश्रय घ्यावा. उघड्यावर थांबू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून करण्यात आले आहे. वीज कोसळून यापूर्वीही मनुष्यहानी जिल्ह्यात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या चार दिवसांमध्ये वीजांचा लखलखाट जास्त तीव्रतेने होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक