शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

राज यांच्याकडून मनपाच्याच सत्तेसाठी पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:30 IST

शहरासाठी खूप कामे केली; परंतु नाशिककरांनी नाकारले आणि ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना मात्र भरभरून सत्ता दिली, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलेच; परंतु विधानसभा निवडणूक असताना महापालिकेतील कामांनाच उजाळा दिला आणि कितीही नाकारले तरी नाशिकवर माझे प्रेम आहे, असे सांगत पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीसाठी येईलच, असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देनिवडणूक विधानसभेची, मुद्दे मात्र मनसेच्या सत्ता काळातील

नाशिक : शहरासाठी खूप कामे केली; परंतु नाशिककरांनी नाकारले आणि ज्यांनी काहीच दिले नाही त्यांनामात्र भरभरून सत्ता दिली, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलेच; परंतु विधानसभा निवडणूक असताना महापालिकेतील कामांनाच उजाळा दिला आणि कितीही नाकारले तरी नाशिकवर माझे प्रेम आहे, असे सांगत पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीसाठी येईलच, असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला.२००९ मध्ये मनसेचे तीन आमदार निवडून आले आणि त्याहीपेक्षा मनसेची पहिली सत्ता २०१२ मध्ये नाशिक महापालिकेत आली. त्यावेळी न भूतो न भविष्यती अशी कामे केल्याचा राज यांचा दावा आहे. अनेक प्रकल्प सामाजिक दायित्व निधीतून करण्यात आले, असे अनेक दावे राज हे करतात.बुधवारी (दि.१६) नाशिकमधील सभेतदेखील त्यांनी तोच सूर आळवला. मात्र, इतकी कामे करून सत्ता मिळाली नाही. त्यामुळे नाशिककरांच्या मनात काय आहे तेच कळत नाही, असे सांगत त्यांनी अर्थात नाशिककरांवर माझे प्रेम आहे आणि मी पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी येईलच, असे सांगून त्यांचे लक्ष विधानसभेपेक्षा नाशिक महापालिकेवर अधिक असल्याचे दाखवून दिले किंबहुना राज यांनी या निवडणुकीसाठी आतापासूनच पायाभरणी केल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार असताना त्यांनी २००९ मध्ये निवडून आलेल्या मनसेच्या आमदारांनी काय कामे केली यापेक्षा महापालिकेच्या काळातील कामे सांगितल्याने त्यांचा कल महापालिकेकडेच अधिक असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणूक लढविली नाही. विधानसभा निवडणुकीत मोजक्याच जागा लढवत आहे; परंतु नाशिक महापालिकेत मात्र पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे त्यांनी दर्शवून दिले.ढिकले यांना अनुल्लेखाने मारले..राज ठाकरे यांनी अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्याकडे पक्षाची स्थानिक सूत्रे दिली होती. मात्र, त्यानंतर ते निवडणूक येताच भाजपत दाखल झाले; परंतु राज यांनी त्यांचा फारसा समाचार न घेता बुधवारी झालेल्या सभेत दुर्लक्ष केले. काही लोक सत्तेच्या मागे जातात, गुळामागे मुंगळे जातात तसे ते गेले एवढाच एक उल्लेख करून पुढे महत्त्व दिले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNashikनाशिक