शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

खरीपाचे दु:ख विसरून अखेर आता शेतकरी लागला रब्बीच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 20:42 IST

खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसाने झालेल्या खरीप पिकाचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. त्याचे शेतकऱ्याला मोठे दु:ख झाले आहे. परंतु आता पाऊस उघडल्याने आणि शेतातील पाणी कमी होऊन जमीन सुकल्याने हे दु:ख बाजूला ठेवून शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.

ठळक मुद्देआता रब्बीसाठी जमीन तयार करायची आहे.

खामखेडा : नुकताच झालेल्या अवकाळी पाऊसाने झालेल्या खरीप पिकाचे लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. त्याचे शेतकऱ्याला मोठे दु:ख झाले आहे. परंतु आता पाऊस उघडल्याने आणि शेतातील पाणी कमी होऊन जमीन सुकल्याने हे दु:ख बाजूला ठेवून शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.चालू वर्षी सुरवातीच्या अल्पशा पाऊसावर शेतकºयाने खरीप पिकाचे पेरणी केली होती. यात मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आदी पिकाची पेरणी केली होती. खरीप हंगामातील मका हे पीक शेतकºयाच्या दृष्टीने महत्वाचे पीक असते. कारण या पिकाच्या उत्पनातून तो रब्बी पिकासाठी उन्हाळी कांदाच्या लागवडीसाठी खर्च करतो.या पैशातून कांद्यासाठी जमीन तयार करणे, कांदा लागवडीच्या व काढणीचा खर्च मजुराची मजुरी, कांदा पिकासाठी खते, औषधे यासाठी करतो. चालू या पिकावर सुरवातीपासून लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. तेव्हा शेतकºयाने महागडी अशी औषधाची फवारणी करून मकाचे पीक जगविले होते.खरिपाची पिके तयार झाली होती. काही शेतकऱ्यांनी मका, बाजरी पिकाची कापणी केलेली होती. काही कापणी करण्याचा तयारीत होते. परंतु अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाला सुरु वात झाली.हा अवकाळी पाऊस एवढा प्रचंड प्रमाणात होता की तो सतत पंधरा ते वीस दिवस सतत झाल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले.हे पाणी एक मिहन्याभर शेतात साचत राहिल्याने शेतातील कापणी केलेल्या मका व बाजरीच्या कणसांना कोंब फुटले.कापणी केलेला कडबा साचलेल्या पाण्यात राहिल्याने सडून गेला.तर शेतात उभे असंलेल्या पिकाचे मुळेवे पाण्यामुळे कुजून गेल्याने ती शेतात तिची होती.खामखेडा परिसरात लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करतात. ज्या शेतकºयाचा विहिरींना लवकर पाणी उतरते ती शेतकरी लवकर लाल कांद्याची लागवड करतात. तेव्हा काही शेतकºयांनी लाल कांद्याची लागवड केलेली होती. तेव्हा लाल कांदा तयार झाला होता. आता कांद्याला चांगला बाजार असल्याने शेतकरी खुशीत होता. त्यामुळे त्याने कांदा पिकासाठी फार मोठी कसरत केली होती.एक महिन्याचा कालावधी कांदा काढणी साठी होता. कांद्याला चांगला भाव मिळेल. आणि हाती चार पैसे जास्त मिळतील या आशेने शेतकरी कांदा पिकाकडे पाहून खुश होता. परंतु या अवकाळी पावसाने शेतकºयाचा आशेवर पाणी फेरले. पंधरा दिवस सारखा पाऊस पडत राहिल्याने या अवकाळी पाऊसाचे पाणी वाफ्यात साचून राहिल्याने तयार असलेला कांदा सडून गेला. त्यामुळे कांद्याचे पीक तयार करून आणि चांगला भाव असूनही शेतकºयाचा पदरात काहीच मिळाले नाही.उन्हाळी कांद्याचे टाकलेली रोपे या पाऊसाने दाबून टाकल्याने तीही नशा झाली.तेव्हा शेतकर्याचा डोळ्यासोमोर त्याचे लाखो रु पयांचे नुकसान झाले.हे दु:ख शेतकरी एक मिहनाभर करत राहिला.शासन स्तरावरून काहीतरी भरीव मदत मिळेल.याची शेतकर्याला अपेक्षा होती.परंतु अगदी तूटपुंजी मिळाल्याने त्यातून काही होणार नाही .आता हे दु:ख करत राहण्यापेक्षा हे सर्व दु:ख बाजूला करीत शेतकरी रब्बी पिकाच्या तयारीला लागला आहे. शेतातील पाणी कमी झाले आहे. शेतातील ओलावा सुकला आहे. जास्त पाण्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. कडबा शेतात पाण्याने कुजून सडला आहे. अजून काहींच्या शेतात मका, बाजरीचे पिके उभी आहेत. तेव्हा आता रब्बीसाठी जमीन तयार करायची आहे.एक महिन्याभर शेतीची कामे बंद असल्याने आता सर्वत्र एकच दम कामे सुरू झाल्याने मजूर मिळत नाही. मजुरीचे दर वाढलेले आहेत. जवळ पैसा नाही. तेव्हा काही शेतकरी घरच्या घरी शेतीची कामे मुलांसह करतांना दिसून येत आहेत.आता उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतकºयाजवळ शिल्लक नाही. आता रब्बी हंगामात कोणते पीक घ्यावे याचा विचार शेतकरी करीत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणी