शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

पाण्याबरोबर चारा टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:47 IST

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर चारा टंचाईच्या झळा शेतकऱ्याला जाणवू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देभूगर्भातील पाण्याची पातळीत वाढ झाली नाही.

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर चारा टंचाईच्या झळा शेतकऱ्याला जाणवू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.गेल्या पाच-सहा वर्षांपासून पाऊसाचे प्रमाण घटत चालले आहे. प्रत्येक वर्षाला पावसाळा कमी कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेदिवस दुष्काळात वाढ आहे. यापूर्वी सन १९७२ मघ्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाला होती. परंतु त्यावेळची परिस्थिती या वेळच्या परिस्थिती पेक्षा वेगळी होती. त्यावेळेस ओला दुष्काळ होता. पाणी भरपूर होते. जनावरांसाठी चारा होता.फक्त अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. गेल्या वीस वर्षांपूर्वी जिरायती शेती मोठ्या प्रमाणात होती. अगदी बोटावर मोजण्या एवढया गावातील पाच दहा शेतकऱ्यांकडे बागायती शेती होती. त्यामुळे १९७२ च्या वेळेस पावसाळा एवढा प्रचंड प्रमाणात झाला होता की शेतातील पिके आली नव्हती. त्यामुळे अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. पाणी व जनावरांसाठी चारा मोबलक प्रमाणात उपलब्ध होता. फक्त लोकांना खाण्यासाठी अन्न धान्य नव्हते तेव्हा शासनाने लोकांसाठी रोजगारासाठी धरणे, नालाबांध आदी कामे उपलब्ध करून दिली होती. यामुळे लोकांना काही प्रमाणात धान्य व पैसा मिळत असे. परंतु यावर्षाच्या दुष्काळ त्यावेळेच्या दुष्काळापेक्षा भायनक आहे. असे जुन्या जाणकार माणसाकडून ऐकावयास मिळते.पूर्वी शेतात मोठे-मोठे बांध, नाला बांध होते. त्यामुळे पावसाळ्यात पाऊसाचे पडणारे पाणी या बांध, नालाबांध मघ्ये साचून राहत असे. ते पाणी जमिनीत मुरत असे. त्यामुळे विहिरींना पाणी मोबलक होते. तसेच शिवारात विहिरीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे विहिरींना हि पाणी मोठ्या प्रमाणात होते.परंतु आता परिस्थिती अगदी उलट झालेली दिसून येत आहे. विज्ञान युगा मघ्ये शेती सपाट करण्यासाठी ट्रकटर, जेसीबी आदी यंत्र विकसीत झाल्याने जिरायती शेती बागायती केली. त्यामुळे विहिरींची संख्येत वाढ झाली. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा कमी झाला. तसेच ही जिरायती शेती बागायती करतांना जी जिरायती शेतीतील झाडी होती ती काढली गेली. परंतु त्या जागेवर नवीन झाडी लावली गेली नाहीत. शेतात जे मोठेमोठे नालाबांध होते ते ते जमीन सपाट झाल्याने पावसाळ्यात डोगरावर पडण्यार्या पावसाचे पाणी कोठेही न अडवता ते नदीला वाहुन जाते. त्यामुळे ते जमिनीत मुरत नसल्याने जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होत नाही. झाडे कमी झाल्यामुळे पाऊसाचे प्रमाण कमी कमी होते आहे. चालू वर्षी सुरवातीपासून पाऊसाची वक्र दृटी होती. या अल्पशा पाऊसावर खिरपाची पिके आली. परंतु परतीचा व बेमोसमी पाऊस आला नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीत वाढ झाली नाही.दर वर्षी साधारण मे महिन्यापासून उन्हाळा जाणवत असे. परंतु या वर्षी मार्च मिहन्यापासून भीषण उन्हाळा जाणवू लागला आहे. आतापासून अनेक ठिकाणी पिण्याचा पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक गावामघ्ये आठ-दिवसांनी पिण्याचा पाण्याचा मिळत आहे. तर काही ठिकानी महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावे लागत आहे. तसेच पिण्याचा पिण्याबरोबर जनावरांचा चाºयाचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरवर्षी शेतकरी जानेवारी महिन्यात जनावरांसाठी मका किंवा ज्वारीची पेरणी चार्यासाठी करत असे.त्यामुळे हा चारा मे माहिन्यामघ्ये जनावरांना चाºयासाठी कापणीस येत असे. परंतु परतीचा पाऊस न पडल्यामुळे विहिरींना पाणी उतरले नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यातचे विहिरींना तळ गाठण्यास सुरवात केल्याने जनावरांसाठी चारा करता आला नाही. तेव्हा शेतकºयाला आपली महागडी जनावरे कशी जतन कारावी हा प्रश्न आसापासून पडला आहे.