शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर

By admin | Updated: May 1, 2017 01:57 IST

केवळ शिक्षणामुळेच व्यक्तीचा, समाजाचा, राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे गरिबातील गरीब आणि

पुणे : केवळ शिक्षणामुळेच व्यक्तीचा, समाजाचा, राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे गरिबातील गरीब आणि मागासवर्गीय समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर केंद्र शासनाकडून भर दिला जात आहे. परंतु, सर्व काही सरकार करू शकत नाही. त्यामुळे गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या वतीने आयोजित ‘तालीम-ओ-तर्बियत’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी जावडेकर बोलत होते. कार्यक्रमास मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हार्सिटीचे कुलपती जफर सरेशवाला, अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, शिक्षणतज्ज्ञ व कुलपती अमरीश पटेल, अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया, सेबीचे सदस्य एस. रमण, छत्तीसगढ वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सालीन अश्रफी, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजित गुलाबचंद आदी उपस्थित होते.सच्चर समितीने दिलेल्या अहवालातून मुस्लिम समाजाचे शिक्षणाचे वास्तव समोर आले. मात्र, सर्वच राज्यात मुस्लिम समाजात मागे नाही. त्यामुळे काही राज्यांमधील मुस्लिम समाजाच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मुस्लिम समाजातील सुशिक्षित व दानशूर व्यक्तींनी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी व वसतिगृहांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही जावडेकर म्हणाले.अमरीश पटेल म्हणाले, की देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून २०३० पर्यंत ही लोकसंख्या १६२ कोटींच्या पुढे जाईल. त्यामुळे केवळ शहरी भागातच गरिबांच्या मुलांंच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागात अधिक काम करण्याची आवश्यकता आहे.डॉ. झहीर काझी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच संस्थेच्या विकासाचा आलेख सांगितला. कार्यक्रमात हॅकेथॉन स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.