शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

एसटीच्या चौकशी कक्षावर उडवाउडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:51 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या चौकशी कक्षावर ‘प्रवासी हेच आमचे दैवत’ असे ब्रिदवाक्य प्रवाशांना जरी नजरेस पडत असले तरी ते ज्यांच्याकडे चौकशी करतात त्यांना मात्र या वाक्याचा विसर पडल्याचा अनुभव दररोज शेकडो प्रवाशांना येतो. त्यामुळे चौकशी कक्ष असून, नसल्यासारखा झाला आहे. तसेच त्याच्या उपयोगिता शून्य ठरत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या चौकशी कक्षावर ‘प्रवासी हेच आमचे दैवत’ असे ब्रिदवाक्य प्रवाशांना जरी नजरेस पडत असले तरी ते ज्यांच्याकडे चौकशी करतात त्यांना मात्र या वाक्याचा विसर पडल्याचा अनुभव दररोज शेकडो प्रवाशांना येतो. त्यामुळे चौकशी कक्ष असून, नसल्यासारखा झाला आहे. तसेच त्याच्या उपयोगिता शून्य ठरत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.महामंडळाची बससेवा तोट्यात असल्याची ओरड केली जाते; मात्र ही बससेवा ज्यांच्या भरवश्यावर चालते त्याच प्रवाशांची दिशाभूल करीत त्यांनी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न चौकशी कक्षावरून होतो.प्रवासाच्या प्रारंभीच प्रवाशांना ‘कटकट’ अनुभवयास येते. याबाबत रविवारी (दि.२५) एका प्रवाशाला या बसस्थानकावर असाच काहीसा अनुभव आला. शिरपूरला जाणाऱ्या बसगाड्यांची चौकशी दूरध्वनीवरून केली असता दुपारी २, ३ व ४ वाजता थेट गाडी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तीनच्या बससाठी प्रवासी गेला असता त्याला साडेतीन वाजता बस असल्याचे सांगण्यात आले.तोपर्यंत बस फलाटावर आली नाही, म्हणून त्याने चौकशी केली असता थेट शिरपूरला जाणारी बस नसल्याचे सांगून धुळे बस पकडून तेथूनशिरपूर जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार प्रवासी फलाटावर उभ्या असलेल्या नाशिक-चोपडा शिवशाही बसमध्ये बसला असता शिरपूर बस निघत असल्याची उद्घोषणा करण्यात आली. तद्नंतर एम.एच २०.१३९० ही बस शिरपूरसाठी निघत होती. त्यामुळे सदर प्रवाशाची धावपळ उडाली.उद्घोषणेमधील त्रुटी दूर व्हाव्यातबसस्थानकावर फलाटांची संख्या कमी असल्यामुळे काही बसेस या फलाट सोडून उभ्या असतात. त्यामुळे चौकशी कक्षातून त्या बससेची दखल घेतली जात नाही व प्रवाशांच्या माहितीस्तव कुठलीही उद्घोषणा केली जात नाही. बस निघण्याच्या वेळी उद्घोषणा कानावर येते त्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला यांची धावपळ उडते.चौकशी कक्षातील ज्या कर्मचाºयाने प्रारंभी बस असल्याची माहिती दिली त्यानेच ती नंतर नसल्याचे सांगितले; मात्र पाच मिनिटांच्या अंतराने स्वत:च शिरपूर बसची उद्घोेषणाही केली. या अनागोंदी कारभारामुळे सदर चौकशी कक्षातील उद्घोषकांवर क ोणाचे नियंत्रण आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित व्हावा. कर्मचाºयाच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळNashikनाशिक