शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुरामुळे मूलभूत सुविधांची वासलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:47 IST

रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पूरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी पथदीप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलवाहिन्या फुटल्याने पाणीदेखील मिळू शकलेले नाही.

नाशिक : रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पूरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी पथदीप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलवाहिन्या फुटल्याने पाणीदेखील मिळू शकलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.रविवारी (दि.४) शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर गंगापूर धरणातून सुमारे ४४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदाकाठी असलेला भाग पाण्याखाली गेला. शहरातील नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी यांसह अन्य नद्यांनादेखील मोठ्या प्रमाणात पूर आल्याने संपर्क खंडित झाला होता. सोमवारी (दि.५) पावसाचे प्रमाण कमी झाले आणि पूरस्थितीदेखील कमी झाली. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेत खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते तसेच स्थायी समिती सभापती उद्धव निमसे सभागृह नेता सतीश सोनवणे, आरोग्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार, रिपाइंच्या गटनेत्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते.शहरात ज्या ठिकाणी चिखल, गाळ साचला आहे तो तातडीने काढण्यात यावा. तसेच त्यानंतर तत्काळ त्याठिकाणी डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अनेक पथदीप वेडेवाकडे झाले असून, त्याचा प्रवाह घरादारात शिरून दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने पथदीप दुरुस्त करावेत. ज्याठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत.त्या पूर्ववत कराव्यात अशाप्रकारच्या सूचना महापौर भानसी यांनी दिल्या. पूरग्रस्तांना चिखल हटविण्यासाठी साहित्य पुरवावे, तसेच चिखल, गाळ काढण्यासाठी मदत पुरावावी अशाप्रकारच्या विविध सूचना त्यांनी केल्या.अन्नधान्याची मदत करावीपुरामुळे तात्पुरत्या स्वरूपात अनेक नागरिकांना महापालिकेच्या शाळा किंवा धर्मशाळेत स्थलांतरित करावे लागले. याठिकाणी नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी मदत केली. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तरतूद असून त्यांच्याकडून मदत पुरवली गेली नसल्याची तक्रार यावेळी गजानन शेलार यांनी केली. पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच धान्य द्यावे अशा अनेक सूचना यावेळी त्यांनी केल्या.पदाधिकाऱ्यांकडून सूचनापूर ओसरू लागल्यानंतर आता रोगराई विशेषत: डेंग्यसदृश स्थिती निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहेत. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने चिखल हटविल्यानंतर त्याठिकाणी डास निर्मूलन औषधाची फवारणी करावी असे पदाधिकाºयांनी दिले आहेत.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी