शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

पुरामुळे मूलभूत सुविधांची वासलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:47 IST

रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पूरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी पथदीप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलवाहिन्या फुटल्याने पाणीदेखील मिळू शकलेले नाही.

नाशिक : रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पूरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी पथदीप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलवाहिन्या फुटल्याने पाणीदेखील मिळू शकलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.रविवारी (दि.४) शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर गंगापूर धरणातून सुमारे ४४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदाकाठी असलेला भाग पाण्याखाली गेला. शहरातील नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी यांसह अन्य नद्यांनादेखील मोठ्या प्रमाणात पूर आल्याने संपर्क खंडित झाला होता. सोमवारी (दि.५) पावसाचे प्रमाण कमी झाले आणि पूरस्थितीदेखील कमी झाली. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेत खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते तसेच स्थायी समिती सभापती उद्धव निमसे सभागृह नेता सतीश सोनवणे, आरोग्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार, रिपाइंच्या गटनेत्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते.शहरात ज्या ठिकाणी चिखल, गाळ साचला आहे तो तातडीने काढण्यात यावा. तसेच त्यानंतर तत्काळ त्याठिकाणी डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अनेक पथदीप वेडेवाकडे झाले असून, त्याचा प्रवाह घरादारात शिरून दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने पथदीप दुरुस्त करावेत. ज्याठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत.त्या पूर्ववत कराव्यात अशाप्रकारच्या सूचना महापौर भानसी यांनी दिल्या. पूरग्रस्तांना चिखल हटविण्यासाठी साहित्य पुरवावे, तसेच चिखल, गाळ काढण्यासाठी मदत पुरावावी अशाप्रकारच्या विविध सूचना त्यांनी केल्या.अन्नधान्याची मदत करावीपुरामुळे तात्पुरत्या स्वरूपात अनेक नागरिकांना महापालिकेच्या शाळा किंवा धर्मशाळेत स्थलांतरित करावे लागले. याठिकाणी नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी मदत केली. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तरतूद असून त्यांच्याकडून मदत पुरवली गेली नसल्याची तक्रार यावेळी गजानन शेलार यांनी केली. पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच धान्य द्यावे अशा अनेक सूचना यावेळी त्यांनी केल्या.पदाधिकाऱ्यांकडून सूचनापूर ओसरू लागल्यानंतर आता रोगराई विशेषत: डेंग्यसदृश स्थिती निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहेत. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने चिखल हटविल्यानंतर त्याठिकाणी डास निर्मूलन औषधाची फवारणी करावी असे पदाधिकाºयांनी दिले आहेत.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी