शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे मूलभूत सुविधांची वासलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:47 IST

रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पूरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी पथदीप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलवाहिन्या फुटल्याने पाणीदेखील मिळू शकलेले नाही.

नाशिक : रविवारी (दि. ५) अतिवृष्टीनंतर सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आणि त्यामुळे पूरस्थिती कमी झाली. तथापि, त्यानंतर शहरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी पथदीप वाकल्याने अंधार असून काही ठिकाणी तर जलवाहिन्या फुटल्याने पाणीदेखील मिळू शकलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.रविवारी (दि.४) शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर गंगापूर धरणातून सुमारे ४४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदाकाठी असलेला भाग पाण्याखाली गेला. शहरातील नासर्डी, वालदेवी आणि वाघाडी यांसह अन्य नद्यांनादेखील मोठ्या प्रमाणात पूर आल्याने संपर्क खंडित झाला होता. सोमवारी (दि.५) पावसाचे प्रमाण कमी झाले आणि पूरस्थितीदेखील कमी झाली. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेत खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते तसेच स्थायी समिती सभापती उद्धव निमसे सभागृह नेता सतीश सोनवणे, आरोग्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, राष्टÑवादीचे गटनेते गजानन शेलार, रिपाइंच्या गटनेत्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते.शहरात ज्या ठिकाणी चिखल, गाळ साचला आहे तो तातडीने काढण्यात यावा. तसेच त्यानंतर तत्काळ त्याठिकाणी डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अनेक पथदीप वेडेवाकडे झाले असून, त्याचा प्रवाह घरादारात शिरून दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने पथदीप दुरुस्त करावेत. ज्याठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत.त्या पूर्ववत कराव्यात अशाप्रकारच्या सूचना महापौर भानसी यांनी दिल्या. पूरग्रस्तांना चिखल हटविण्यासाठी साहित्य पुरवावे, तसेच चिखल, गाळ काढण्यासाठी मदत पुरावावी अशाप्रकारच्या विविध सूचना त्यांनी केल्या.अन्नधान्याची मदत करावीपुरामुळे तात्पुरत्या स्वरूपात अनेक नागरिकांना महापालिकेच्या शाळा किंवा धर्मशाळेत स्थलांतरित करावे लागले. याठिकाणी नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी मदत केली. परंतु आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तरतूद असून त्यांच्याकडून मदत पुरवली गेली नसल्याची तक्रार यावेळी गजानन शेलार यांनी केली. पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच धान्य द्यावे अशा अनेक सूचना यावेळी त्यांनी केल्या.पदाधिकाऱ्यांकडून सूचनापूर ओसरू लागल्यानंतर आता रोगराई विशेषत: डेंग्यसदृश स्थिती निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहेत. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने चिखल हटविल्यानंतर त्याठिकाणी डास निर्मूलन औषधाची फवारणी करावी असे पदाधिकाºयांनी दिले आहेत.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी