शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

अर्जासाठी आज उडणार झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:56 IST

नाशिक : पितृपक्ष समाप्तीनंतर अर्ज दाखल होण्यास गती येऊ शकेल, असे वाटत असताना राजकीय समीकरणांच्या गणितात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यामुळे गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअवघे दोन दिवस शिल्लक : राजकीय पक्षांचे होणार शक्तिप्रदर्शन

 

 

नाशिक : पितृपक्ष समाप्तीनंतर अर्ज दाखल होण्यास गती येऊ शकेल, असे वाटत असताना राजकीय समीकरणांच्या गणितात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र, आता सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यामुळे गुरुवारी (दि. ३) अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने साहजिकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत्या दोन दिवसांत गर्दी होणार आहे. पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी तालुकानिहाय अर्ज दाखल करण्याची व्यवस्था असून, जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य या शहरातील तीन मतदारसंघांबरोबरच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे गुरुवारी या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारासोबत चारच जणांना कक्षात येण्याची परवानगी आहे.गेल्या २७ तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असला तरी पितृपक्षामुळे अनेकांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल होऊ शकतील, असे वाटत असताना सोमवारी जिल्ह्यात अवघ्या ९ जणांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी जवळपास सर्वज राजकीय पक्षाचे प्रमुख उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. यातील अनेकांनी यापूर्वीच डमी अर्ज नेले आहेत. आता ते अधिकृत पक्षाचा एबी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज दाखल करतील.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २७ तारखेपासून ४ आॅक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी केवळ एका इच्छुकाने अर्ज सादर केला होता तर शनिवार आणि रविवार शासकीय सुटी असल्याने हे दोन्ही दिवस निरंक राहिले. दि. २ रोजी गांधी जयंतीनिमित्तानेदेखील अर्ज दाखल होऊ शकले नाहीत. जिल्हा प्रशासन सज्जगुरुवारी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता निवडणूक शाखेने संपूर्ण यंत्रणेला सज्जतेचे आदेश दिले आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ अशी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. अर्ज दाखल करण्याच्या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. गुरुवारी राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उमेदवारासोबत चारच प्रतिनिधी पाठविले जाणार आहेत. मात्र कार्यालयाबाहेरील गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान असणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक