मुख्यमंत्र्यांना पाठविणार पाच हजार पत्रं

By Admin | Updated: February 17, 2016 22:44 IST2016-02-17T22:44:18+5:302016-02-17T22:44:47+5:30

संकल्प : मांजरपाडा प्रकल्प

Five thousand letters to be sent to the Chief Minister | मुख्यमंत्र्यांना पाठविणार पाच हजार पत्रं

मुख्यमंत्र्यांना पाठविणार पाच हजार पत्रं

येवला : गेल्या ४० वर्षांपासून तालुक्याच्या अवर्षणप्रवण डोंगरगावपर्यंत पाणी पोहचवण्याबाबत भिजत पडलेला मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लोकप्रबोधानातून चळवळ उभी व्हावी व सत्ता बदलो अथवा स्थिर राहो पाणीप्रश्न सुटून मांजरपाडा प्रकल्प पूर्ण व्हावा या हेतूने शेतकऱ्यांत जागृती करण्याच्या उद्देशाने येवला तालुका भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसच्या वतीने गावोगावी जाऊन बैठका घेऊन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील ३५ गावात प्रबोधन करून सुमारे पाच हजार शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार असून, या संकल्पाची सुरु वात झाली.
धामोडे आणि कुसमाडी या दोन गावातून बुधवारी १६० पत्र थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली आहेत. कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीता पाटील-पालवे यांनी हे अभियान हाती घेतले आहे.
या मोहिमेत डॉ. भास्कर पालवे, कांचन पालवे, कॉंग्रेस प्रांतिक सदस्य तात्यासाहेब लहरे, एकनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर शेलार, उस्मान शेख, शिवाजी धनगे आदि या मोहिमेत सहभागी झाले होते. कुसमडीचे सरपंच रामदास महाले, भीमा पवार, साईनाथ येवला, नवनाथ महाले, भाऊसाहेब शेजवळ, प्रकाश साठे, एकनाथ पवार, सोपान बारहाते यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Five thousand letters to be sent to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.