जिल्ह्यात दोन अपघातात पाच ठार
By Admin | Updated: January 14, 2017 01:14 IST2017-01-14T01:14:12+5:302017-01-14T01:14:29+5:30
तीन युवकांच्या मृत्यूने कसबे सुकेणेवर शोककळा

जिल्ह्यात दोन अपघातात पाच ठार
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई - आग्रा महामार्गावर कोकणगाव फाटा येथे कसबे सुकेणे येथील रहिवासी असलेले तिघेजण पिंपळगाव बसवंत येथे एका खाजगी कंपनीत पहाटे ५.४५ वाजता मोटारसायकलने कामाला जात होते. महामार्ग ओलांडताना पिंपळगाव बसवंतहून नाशिककडे जाणाऱ्या लक्झरी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील सचिन वसंत मुंजे (२१), दत्ता अशोक सूर्यवंशी (२८), योगेश मंगळू पवार (२७) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, वाहनाचा शोध सुरू आहे.
दुसरा अपघात सटाणा - ताहाराबाद मार्गावर वनोली गावाजवळ शुक्रवारी सकाळी झाला. ट्रक व ट्रेलर यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील वनोली गावालगत असलेल्या यूटर्नवर सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ट्रक (क्र ं.एमडब्लूए ७४११) व ट्रेलर (क्र ं आरजे ५१ जी १०८)यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दोन्हीही वाहन चालकांचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून अधिक उपचारासाठी त्यांना मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे.दौलत रामचंद्र साबळे (५०, रा. देवगाव , ता.निफाड) व परमेश्वर जाट (४७, रा.भिलवाड राज्यस्थान) ही मृतांची नावे आहेत.नगर जिल्ह्यातील कारखान्यासाठी ताहाराबाद परिसरातून उस घेऊन जाणारा ट्रक व सटाणा शहराकडून राज्यस्थानकडे जाणारा ट्रेलर होता.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचायत समितीचे उपसभापती वसंत भामरे यांनी सटाणा पोलिस स्टेशनला घटनेची माहिती देवून जखमींना तात्काळ मदत उपलब्ध करु न दिली. तर मृतदेह ग्रामीण रु ग्णालयात पाठविण्यात आले. पोलिस प्रशासनाने अपघातग्रस्त वाहने बाजूला करु न महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करु न दिला. सटाणा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.