शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

पहिलीच्या विद्यार्थ्यांना अजूनही पुस्तकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 1:43 AM

नाशिक : शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी झालेला असतानाही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनही पुरेशी पुस्तके मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. काही शाळांना अपुरा पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, काही शाळांना मात्र एकही पुस्तक मिळाले नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देबालभारतीकडून पुरवठा महापालिकेच्या केंद्रात मात्र पुस्तके पडून

नाशिक : शाळा सुरू होऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी झालेला असतानाही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजूनही पुरेशी पुस्तके मिळाली नसल्याची माहिती शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. काही शाळांना अपुरा पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, काही शाळांना मात्र एकही पुस्तक मिळाले नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अद्यापही पाठ्यपुस्तकांपासून वंचित आहेत.इयत्ता पहिलीच्या बदलेल्या अभ्यासक्रमामुळे शाळांना १५ जूनपूर्वी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होऊ शकला नसल्याने पहिलीच्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळालीच नाही. मात्र शाळा सुरू झाल्यानंतरही पहिलीचे विद्यार्थी अजूनही पुस्तकांपासून वंचित आहेत. पहिलीच्या अभ्यासक्रमाची तीन पुस्तके असून, काही शाळांना एक, तर काही शाळांना दोन पुस्तके मिळाली आहेत. सिडकोतील काही शाळांना तीनही पुस्तकांचा पुरवठा झाल्याचे सांगितले जाते. मात्र शहरातील अन्य भागातील शाळांना अजूनही पुरेसा पुरवठा झाला नसल्याने पहिलीचे विद्यार्थी अजूनही वंचित राहिले आहेत.बालभारतीकडून होणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुरवठा महापालिकेच्या भालेकर शाळेतील केंद्रात होतो. येथून मनपा हद्दीतील शाळांना पुस्तकांचा पुरवठा केला जातो. बालभारतीकडून महापालिका हद्दीतील शाळांनी मागणी केल्यानुसार सुमारे ६ लाख ३७ हजार ८ पाठ्यपुस्तकांचा शंभर टक्के पुरवठा करण्यात आलेला आहे. तर जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते आठवीच्या वर्गांना सुमारे २८ लाख ६५ हजार ४२२ याप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आलेला आहे.पाठ्यपुस्तकांप्रमाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या केंद्रामध्ये तर जिल्हा परिषदेत पंचायत समितीमध्ये पाठ्यपुस्तके जमा होऊन तेथून ती शाळांना मागणीपत्राप्रमाणे वितरित केली जातात. बालभारतीने दिलेल्या आकडेवारीवरून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. असे असतानाही पहिलीच्या मुलांना मात्र अजूनही पुस्तके मिळाली नसल्याचे मुख्याध्यापकांकडूनच सांगितले जात आहे.