शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:12 IST

येवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाºया २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देयेवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाºया २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार असल्याचे चित्र आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नवीन प्रशासकीय तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात व्यवस्था केली आहे. १२ मार्चला संकष्टी चतुर्थी आणि १३ मार्चला रंगपंचमी असल्याने अर्ज भरण्यास उमेदवारांची गर्दी होणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन विक्र ी व अर्ज दि. ६ ते १३ मार्च दरम्यान सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ वाजेपासून ३ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून होणार आहे.नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारांना चिन्ह देण्यात येणार आहे व त्याच दिवशी अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.ग्रामपंचायतींसाठी दि. २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपावेतो मतदान घेण्यात येणार असून, ३० मार्च रोजी मतमोजणी केली जाणार आहे. ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. असा भरावा लागेल उमेदवारी अर्ज हस्तलिखित अर्ज कोणत्याही प्रकारे स्वीकारले जाणार नसून निवडणूक आयोगाने संकेतस्थळ विकसित केले आहे. निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांना या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून नामनिर्देशनपत्रे भरावी लागणार आहेत. त्यानंतर आॅनलाइन नामनिर्देशनपत्राची छापील प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित मुदतीत सादर करावी लागणार आहे. सदस्यपदासाठी नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवारांना आॅनलाइन फॉर्म, आॅनलाइन मालमत्ता दायित्व, गुन्हेगार नसल्याचे घोषणापत्र द्यायचे आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वय २१ वर्ष असावे. राखीव जागेसाठी शंभर, तर सर्वसाधारण जागेसाठी ५०० रुपये अनामत असून, १०० रुपयांच्या मुद्रांकावर २००१ नंतर तिसरे अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहून द्यावे लागणार आहे. या ग्रामपंचायतींचावाजला बिगूल देवळाणे, अंगुलगाव, तळवाडे-कौटखेडे, भुलेगाव, पारेगाव, नागडे, आडसुरेगाव, मातुलठाण, बल्हेगाव, वडगावबल्हे, बोकटे, आहेरवाडी-लहित-हाडपसवरगाव-जायदरे, खरवंडी-देवदरी, रहाडी, भारम, रेंडाळे, न्याहरखेडे खुर्द, न्याहरखेडे बुद्रुक, कोळगाव-वाईबोथी, अनकुटे-सावखेडे, डोंगरगाव-पिंपळखुटे खुर्द, पिंपळखुटे बुद्रुक, खामगाव, ममदापूर, खिर्डीसाठे, पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे, धामोडे, कुसमाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत