शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

पेरूच्या पहिल्या तोड्यातच ७० हजारांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:23 IST

कांदा लागवडच परवडणारी असा समज असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरीही आता बदलू पाहात आहे. तालुक्यातील शेतकरी या पारंपरिक पीकाला फाटा देत वेगवेगळे नवीन प्रयोग करु पाहात आहेत. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येत आहे. तालुक्यातील पाटोदा येथील युवा शेतकरी शिवनाथ बागुल, भाऊसाहेब बागुल या बंधूंनीही असाच पीक बदल करून तालुक्यातील शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

कांदा लागवडच परवडणारी असा समज असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरीही आता बदलू पाहात आहे. तालुक्यातील शेतकरी या पारंपरिक पीकाला फाटा देत वेगवेगळे नवीन प्रयोग करु पाहात आहेत. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येत आहे. तालुक्यातील पाटोदा येथील युवा शेतकरी शिवनाथ बागुल, भाऊसाहेब बागुल या बंधूंनीही असाच पीक बदल करून तालुक्यातील शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. बागुल बंधूंनी योग्य नियोजन करून लखनौ जिविलास या जातीच्या पेरू बागेची लागवड केली. पहिल्याच तोड्याला सुमारे ६०० ते ७५० ग्रॅम वजनाचे फळ तयार झाले असून, त्यांना पहिल्याच तोड्यात सुमारे साठ ते सत्तर हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रत्येक हंगामानुसार उत्पन्न वाढत असून, वर्षाकाठी सुमारे पाच ते सहा लाखांचा नफा मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. बागुल यांनी पेरूबागेत हरभºयाचे आंतरपीक घेऊन त्यातूनही सुमारे ५ क्विंटल उत्पन्न घेतले. त्यांच्या पेरूबागेस तालुक्यातील शेतकरी भेट देऊन माहिती घेत आहेत.  बागुल यांची सुमारे दोन एकर द्राक्षबाग आहे. त्याचे योग्य नियोजन केल्याने ही बागही त्यांना भरघोस उत्पन्न देत आहे. त्यातूनच प्रेरणा घेत बागुल यांनी पेरूबाग फुलवण्याचा विचार केला. पेरूबाग लावण्या-संदर्भात त्यांनी माहिती घेऊन नियोजन केले. पेरूबाग लागवडीसाठी त्यांना सुमारे एक लाखाचा खर्च आला.  लखनौ येथून जिविलास जातीची सुमारे १०५० रोपे आणून जानेवारी २०१७ मध्ये लागवड केली. दोन ओळींमध्ये सुमारे साडेआठ फुटांचे, तर दोन झाडांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवून रोपांची लागवड केली. बागेची लागवड करण्यापूर्वी बागुल यांनी शेताची नांगरणी करून बेड तयार केले. त्या बेडवर सुमारे एक ते दीड फुटाचे खड्डे घेऊन त्यात शेणखत, १०-२६-२६, पोट्याश, सुपर फोस्फेट, थायमेट आदींचे योग्य प्रमाण करून खड्ड्यात टाकले. संपूर्ण बागेला ठिबक सिंचनाची सोय करून रोपांची लागवड केली. यासाठी त्यांना सुमारे एक  लाख रुपयांचा खर्च आला.  लागवड केल्यानंतर सुमारे सहा महिने झाडांवर फुलकळी ठेवली नाही. रोप कमरेबरोबर आल्यावर त्याचा शेंडा खुडून घेतला व नंतर  येणाºया कळ्यांमधून पेरूचे उत्पादन घेतले. यात पहिल्याच तोड्यातून सुमारे ७० ते ७५ क्रेट उत्पादन निघाले. त्यास सरासरी ६० ते ७० रु पये प्रतिकिलो भाव मिळाला. परिसरातील आठवडे बाजारात पेरुची विक्री केली. शेंडे ेखुडल्याने मोठ्या प्रमाणात फुलकळी येत असून, त्यामुळे वर्षभर बागेत पेरू उपलब्ध होणार आहे. आता दुसºयांदा झाडांची छाटणी केली असून, फळ सेट होत आहे. सध्या एका झाडास सरासरी ३० ते ५० पर्यंत फळे लागली आहेत. यातील काही फळांची छाटणी करून योग्य फळच झाडावर ठेवावे लागणार आहे. फळे लागल्यामुळे बागेला सुमारे तीनवेळा औषध फवारण्या कराव्या लागणार आहेत.  फळ वाढीसाठी प्रोफेक्स २५ मिली प्रत्येकी २०० लिटर पाण्याचे प्रमाण घेऊन फवारणी केली. इजिस्टीम २५० मिली प्रति २०० लिटर पाण्यातून दिले जाते. तसेच ०५२ .३४ २५ किलो जमिनीतून झिंक बोरॉन १०० ग्राम २०० लिटर पाण्यातून दिले जाते. झाडांवर मिलीबग व इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून न्युओन प्रोफेक्स बायोस्टीमची फवारणी केली जात आहे. निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडून पडते. त्यामुळे शेतकºयांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पीक बदल करीत त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पिके घेतल्यास निश्चितच फायदा होतो. पेरूबागेसाठी मनुष्यबळ तसेच खर्चही कमी येत असून, त्यातून नफा जास्त मिळत आहे. शेतकरी वर्गाने बाजारपेठेत मालाची गरज ओळखून पिके घेतल्यास निश्चितच फायदा होतो. फळबागांची लागवड करणे योग्य ठरणार आहे.- भाऊसाहेब बागुल, पेरू उत्पादक शेतकरी, पाटोदा

 

टॅग्स :Farmerशेतकरी