शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पेरूच्या पहिल्या तोड्यातच ७० हजारांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:23 IST

कांदा लागवडच परवडणारी असा समज असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरीही आता बदलू पाहात आहे. तालुक्यातील शेतकरी या पारंपरिक पीकाला फाटा देत वेगवेगळे नवीन प्रयोग करु पाहात आहेत. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येत आहे. तालुक्यातील पाटोदा येथील युवा शेतकरी शिवनाथ बागुल, भाऊसाहेब बागुल या बंधूंनीही असाच पीक बदल करून तालुक्यातील शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

कांदा लागवडच परवडणारी असा समज असलेल्या येवला तालुक्यातील शेतकरीही आता बदलू पाहात आहे. तालुक्यातील शेतकरी या पारंपरिक पीकाला फाटा देत वेगवेगळे नवीन प्रयोग करु पाहात आहेत. त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही येत आहे. तालुक्यातील पाटोदा येथील युवा शेतकरी शिवनाथ बागुल, भाऊसाहेब बागुल या बंधूंनीही असाच पीक बदल करून तालुक्यातील शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. बागुल बंधूंनी योग्य नियोजन करून लखनौ जिविलास या जातीच्या पेरू बागेची लागवड केली. पहिल्याच तोड्याला सुमारे ६०० ते ७५० ग्रॅम वजनाचे फळ तयार झाले असून, त्यांना पहिल्याच तोड्यात सुमारे साठ ते सत्तर हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रत्येक हंगामानुसार उत्पन्न वाढत असून, वर्षाकाठी सुमारे पाच ते सहा लाखांचा नफा मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. बागुल यांनी पेरूबागेत हरभºयाचे आंतरपीक घेऊन त्यातूनही सुमारे ५ क्विंटल उत्पन्न घेतले. त्यांच्या पेरूबागेस तालुक्यातील शेतकरी भेट देऊन माहिती घेत आहेत.  बागुल यांची सुमारे दोन एकर द्राक्षबाग आहे. त्याचे योग्य नियोजन केल्याने ही बागही त्यांना भरघोस उत्पन्न देत आहे. त्यातूनच प्रेरणा घेत बागुल यांनी पेरूबाग फुलवण्याचा विचार केला. पेरूबाग लावण्या-संदर्भात त्यांनी माहिती घेऊन नियोजन केले. पेरूबाग लागवडीसाठी त्यांना सुमारे एक लाखाचा खर्च आला.  लखनौ येथून जिविलास जातीची सुमारे १०५० रोपे आणून जानेवारी २०१७ मध्ये लागवड केली. दोन ओळींमध्ये सुमारे साडेआठ फुटांचे, तर दोन झाडांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवून रोपांची लागवड केली. बागेची लागवड करण्यापूर्वी बागुल यांनी शेताची नांगरणी करून बेड तयार केले. त्या बेडवर सुमारे एक ते दीड फुटाचे खड्डे घेऊन त्यात शेणखत, १०-२६-२६, पोट्याश, सुपर फोस्फेट, थायमेट आदींचे योग्य प्रमाण करून खड्ड्यात टाकले. संपूर्ण बागेला ठिबक सिंचनाची सोय करून रोपांची लागवड केली. यासाठी त्यांना सुमारे एक  लाख रुपयांचा खर्च आला.  लागवड केल्यानंतर सुमारे सहा महिने झाडांवर फुलकळी ठेवली नाही. रोप कमरेबरोबर आल्यावर त्याचा शेंडा खुडून घेतला व नंतर  येणाºया कळ्यांमधून पेरूचे उत्पादन घेतले. यात पहिल्याच तोड्यातून सुमारे ७० ते ७५ क्रेट उत्पादन निघाले. त्यास सरासरी ६० ते ७० रु पये प्रतिकिलो भाव मिळाला. परिसरातील आठवडे बाजारात पेरुची विक्री केली. शेंडे ेखुडल्याने मोठ्या प्रमाणात फुलकळी येत असून, त्यामुळे वर्षभर बागेत पेरू उपलब्ध होणार आहे. आता दुसºयांदा झाडांची छाटणी केली असून, फळ सेट होत आहे. सध्या एका झाडास सरासरी ३० ते ५० पर्यंत फळे लागली आहेत. यातील काही फळांची छाटणी करून योग्य फळच झाडावर ठेवावे लागणार आहे. फळे लागल्यामुळे बागेला सुमारे तीनवेळा औषध फवारण्या कराव्या लागणार आहेत.  फळ वाढीसाठी प्रोफेक्स २५ मिली प्रत्येकी २०० लिटर पाण्याचे प्रमाण घेऊन फवारणी केली. इजिस्टीम २५० मिली प्रति २०० लिटर पाण्यातून दिले जाते. तसेच ०५२ .३४ २५ किलो जमिनीतून झिंक बोरॉन १०० ग्राम २०० लिटर पाण्यातून दिले जाते. झाडांवर मिलीबग व इतर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून न्युओन प्रोफेक्स बायोस्टीमची फवारणी केली जात आहे. निसर्गाच्या अनियमित बदलामुळे शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडून पडते. त्यामुळे शेतकºयांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता पीक बदल करीत त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पिके घेतल्यास निश्चितच फायदा होतो. पेरूबागेसाठी मनुष्यबळ तसेच खर्चही कमी येत असून, त्यातून नफा जास्त मिळत आहे. शेतकरी वर्गाने बाजारपेठेत मालाची गरज ओळखून पिके घेतल्यास निश्चितच फायदा होतो. फळबागांची लागवड करणे योग्य ठरणार आहे.- भाऊसाहेब बागुल, पेरू उत्पादक शेतकरी, पाटोदा

 

टॅग्स :Farmerशेतकरी