शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टीतील झोपड्यांना आग; सात गोरगरीब कुटुंबांचा संसार जळून खाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 21:49 IST

संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून परिसरात अंधार पसरला. क्षणार्धात सात झोपड्यांना आगीने वेढा दिला.

ठळक मुद्दे अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.घरातील सर्व संसारपयोगी वस्तूंची राखरांगोळी युवकांनी जळत्या झोपड्यांमध्ये जाऊन सर्वप्रथम सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली

नाशिक : येथील गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टीत घासबाजाराला लागून असलेल्या झोपड्यांना अचानकपणे लागलेल्या आगीत सहा ते सात कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. सुदैवाने महिलांनी आपल्या लहान मुलांसह झोपड्यांमधून बाहेर धाव घेतल्यामुळे कुठल्याहीप्रकारे जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा सुमारे पंधरा ते वीस झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असत्या कारण आगीने भीषण रुप धारण केले होते.

जुने नाशिक भागातील भद्रकाली पोलीस ठाण्याला लागून असलेल्या गंजमाळ परिसरात भीमवाडी झोपडपट्टी आहे. या भागात गवतासह भंगार मालाच्या विक्रीची दुकाने आहेत. संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून परिसरात अंधार पसरला. क्षणार्धात सात झोपड्यांना आगीने वेढा दिला.

झोपड्यांवरील प्लॅस्टिक लाकूड मोठ्या प्रमाणात पेटल्याने घरातील सर्व संसारपयोगी वस्तूंची राखरांगोळी झाली. घरातील रोख रक्कम, दागिणे, भांडी सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भागात मोठ्या संख्येने युवक गॅस सिलिंडर पोहचविण्याचे काम विविध वितरकांकडे करत असल्यामुळे धाडसाने युवकांनी जळत्या झोपड्यांमध्ये जाऊन सर्वप्रथम सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली व अग्निशामक दलाला आगीवर त्वरित नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

घटनास्थळांपासून जवळच असलेल्या अग्निशामक दलाच्या शिंगाडा तलाव येथील वीर बापू गायधनी मुख्यालयाचे दोन बंब त्वरित दाखल झाले. दहा ते बारा जवानांनी त्वरित आग विझविण्यास सुरूवात केली. तोपर्यंत सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या भागातील उपकेंद्रावरुनही बंब घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी अरुं द गल्ली बोळ असल्यामुळे बंबांना पोहचण्यास अडथळा आला. त्यामुळे जवानांनी मोकळ्या जागेत मुख्य रस्त्यावर बंब उभे करुन तेथून पाण्याचे होज आणत मारा सुरू केला. सुमारे तीस जवानांनी शर्थीची प्रयत्न करुन अवघ्या अर्ध्या तासात आग संपूर्णपणे विझविली. त्यामुळे अनर्थ टळला. मुख्यालयाकडून त्वरित अग्निशामक दलाच्या उपकेंद्रांची मदत घेण्यात आल्यामुळे भीमवाडी भागात आगीचा होणारा तांडव शमला.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग