शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:07 IST

अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दिंडोरी : अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोºयात वळविण्याच्या बारा वळण योजना व मांजरपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेढ तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यांच्यासह तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, तत्कालीन आमदार उत्तम भालेराव, दिलीप बनकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. काम बंद पडल्यावर ते पुन्हा सुरू व्हावे यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केलाहोता.अनेक वर्षे काम रखडलेल्या मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. सदर बोगद्यातून पाणी पश्चिमेकडून वळून ते पूर्वेला वळले असून, ते पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोगद्यातून प्रथमच पाणी वाहिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मांजरपाडा प्रकल्पाला भेट दिली. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात येऊ लागल्याने पूर्व भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी यांच्यासह बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, श्याम हिरे, राजेंद्र उफाडे, नीलेश गटकळ, पंढरीनाथ ढोकरे, अमोल गणोरे, भाऊसाहेब गणोरे, मधुकर फुगट, नारायण पालखेडे, डॉ. अनिल सातपुते, डॉ. विजय गटकळ आदी उपस्थित होते.मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात येत पाणी गोदावरी खोºयात येऊ लागल्याने या प्रकल्पासाठी प्रयत्न करणाºया आमदार नरहरी झिरवाळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.जोरदार पावसाची प्रतीक्षामांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे व नुकत्याच झालेल्या पावसामुळे बोगद्यातून काहीसे पाणी प्रवाहित झाले मात्र अद्याप या भागात जोरदार पाऊस न झाल्याने पाणी जास्त वाहिलेले नाही मात्र या भागात जोरदार पाऊस होताच सदर बोगद्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू होणार आहे.च्या परिसरात जांभूळचे प्रसिद्ध झाड होते; मात्र प्रकल्प सुरू होताच ते पाडावे लागले. या प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह सुरू होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार झिरवाळ यांनी जांभळाचे झाड लावून या परिसरात पुन्हा औषधी झाडे लावत वनराई फुलविण्याचा मनोदय व्यक्त केला.

टॅग्स :DamधरणWaterपाणीFarmerशेतकरी