शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:07 IST

अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दिंडोरी : अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोºयात वळविण्याच्या बारा वळण योजना व मांजरपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेढ तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यांच्यासह तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, तत्कालीन आमदार उत्तम भालेराव, दिलीप बनकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. काम बंद पडल्यावर ते पुन्हा सुरू व्हावे यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केलाहोता.अनेक वर्षे काम रखडलेल्या मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. सदर बोगद्यातून पाणी पश्चिमेकडून वळून ते पूर्वेला वळले असून, ते पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोगद्यातून प्रथमच पाणी वाहिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मांजरपाडा प्रकल्पाला भेट दिली. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात येऊ लागल्याने पूर्व भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी यांच्यासह बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, श्याम हिरे, राजेंद्र उफाडे, नीलेश गटकळ, पंढरीनाथ ढोकरे, अमोल गणोरे, भाऊसाहेब गणोरे, मधुकर फुगट, नारायण पालखेडे, डॉ. अनिल सातपुते, डॉ. विजय गटकळ आदी उपस्थित होते.मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात येत पाणी गोदावरी खोºयात येऊ लागल्याने या प्रकल्पासाठी प्रयत्न करणाºया आमदार नरहरी झिरवाळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.जोरदार पावसाची प्रतीक्षामांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे व नुकत्याच झालेल्या पावसामुळे बोगद्यातून काहीसे पाणी प्रवाहित झाले मात्र अद्याप या भागात जोरदार पाऊस न झाल्याने पाणी जास्त वाहिलेले नाही मात्र या भागात जोरदार पाऊस होताच सदर बोगद्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू होणार आहे.च्या परिसरात जांभूळचे प्रसिद्ध झाड होते; मात्र प्रकल्प सुरू होताच ते पाडावे लागले. या प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह सुरू होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार झिरवाळ यांनी जांभळाचे झाड लावून या परिसरात पुन्हा औषधी झाडे लावत वनराई फुलविण्याचा मनोदय व्यक्त केला.

टॅग्स :DamधरणWaterपाणीFarmerशेतकरी