शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 01:07 IST

अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दिंडोरी : अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोºयात वळविण्याच्या बारा वळण योजना व मांजरपाडा प्रकल्पाची मुहूर्तमेढ तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यांच्यासह तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडे कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, तत्कालीन आमदार उत्तम भालेराव, दिलीप बनकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. काम बंद पडल्यावर ते पुन्हा सुरू व्हावे यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केलाहोता.अनेक वर्षे काम रखडलेल्या मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. सदर बोगद्यातून पाणी पश्चिमेकडून वळून ते पूर्वेला वळले असून, ते पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोगद्यातून प्रथमच पाणी वाहिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मांजरपाडा प्रकल्पाला भेट दिली. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात येऊ लागल्याने पूर्व भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी यांच्यासह बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, श्याम हिरे, राजेंद्र उफाडे, नीलेश गटकळ, पंढरीनाथ ढोकरे, अमोल गणोरे, भाऊसाहेब गणोरे, मधुकर फुगट, नारायण पालखेडे, डॉ. अनिल सातपुते, डॉ. विजय गटकळ आदी उपस्थित होते.मांजरपाडा तथा देवसाने प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात येत पाणी गोदावरी खोºयात येऊ लागल्याने या प्रकल्पासाठी प्रयत्न करणाºया आमदार नरहरी झिरवाळ यांनी आनंद व्यक्त केला आहे.जोरदार पावसाची प्रतीक्षामांजरपाडा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे व नुकत्याच झालेल्या पावसामुळे बोगद्यातून काहीसे पाणी प्रवाहित झाले मात्र अद्याप या भागात जोरदार पाऊस न झाल्याने पाणी जास्त वाहिलेले नाही मात्र या भागात जोरदार पाऊस होताच सदर बोगद्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू होणार आहे.च्या परिसरात जांभूळचे प्रसिद्ध झाड होते; मात्र प्रकल्प सुरू होताच ते पाडावे लागले. या प्रकल्पातून पाण्याचा प्रवाह सुरू होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार झिरवाळ यांनी जांभळाचे झाड लावून या परिसरात पुन्हा औषधी झाडे लावत वनराई फुलविण्याचा मनोदय व्यक्त केला.

टॅग्स :DamधरणWaterपाणीFarmerशेतकरी