...अखेर ‘त्या’ रोहित्राची पाहणी
By Admin | Updated: August 20, 2014 00:41 IST2014-08-20T00:35:18+5:302014-08-20T00:41:54+5:30
तीन दिवसांनंतर जाग : ‘महावितरण’ची उदासीनता

...अखेर ‘त्या’ रोहित्राची पाहणी
नाशिक : गेल्या रविवारी रात्री बडी दर्गा शरीफच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या विद्युत रोहित्राच्या झटक्याने एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर आज दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऊर्जा व सम विभागाचे सहायक विद्युत निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
बडी दर्गाच्या प्रांगणात असलेले रोहित्र सुरक्षित करण्याच्या सूचना शासकीय सहायक विद्युत निरीक्षक संदीप महाजन यांनी महावितरण कंपनीला दिल्या आहेत. पोलिसांकडून पंचनामा अहवाल, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर निरीक्षण अहवाल महावितरणकडे सोपविला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. किमान पंधरा दिवसांचा कालावधी अंतिम अहवालासाठी लागणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सदर रोहित्र सुरक्षित करण्याबाबतच्या सूचना महावितरणला त्यांनी दिल्या असून, त्यादृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता रतन सोनुले यांनी सांगितले. तातडीने येथील विद्युत रोहित्र सुरक्षित जागेत स्थलांतरित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)