शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

..अखेर मखमलाबाद ग्रीन फिल्डला संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:15 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद येथील साडेसातशे एकर क्षेत्रात ग्रीन फिल्ड म्हणजेच हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेने अखेर इरादा स्पष्ट केला आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद येथील साडेसातशे एकर क्षेत्रात ग्रीन फिल्ड म्हणजेच हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेने अखेर इरादा स्पष्ट केला आहे. ही योजना राबविण्याच्या प्रस्तावासाठी महासभेने संमती दिल्याने आता राजपत्रात उद्देश स्पष्ट केला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष टीपी स्कीम राबविण्यासाठी कार्यवाही करण्यास प्रारंभ होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योजना राबवतानाच त्यांच्या अटी-शर्ती मान्य कराव्यात आणि या योजनेसंदर्भात अनभिज्ञ असलेल्या शेतकऱ्यांच्या माहिती तसेच प्रबोधनासाठी चावडी वाचनदेखील करावे, असा ठराव करण्यात येणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सोमवारी (दि.९) झालेल्या महासभेत स्पष्ट केले.महापालिकेची महासभा सोमवारी (दि.९) महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नगररचना परीयोजना तयार करण्यासाठी उद्देश घोषित करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता. सुमारे पाच तास झालेल्या चर्चेनंतर काही नगरसेवकांचा विरोध डावलून महापौरांनी हा निर्णय घोषित केला.महासभेत प्रस्ताव सादर करण्याचा अधिकार प्रशासनाला असताना स्मार्ट सिटी कंपनीने प्रस्ताव सादर कसा काय सादर केला. असा प्रश्न करताना शेतकºयांनी संमती दिली असे प्रशासन सांगत असले तरी त्यांनी अटी-शर्तीवर परवानगी दिली आहे त्याचा उल्लेख का केला नाही. महासभेतील प्रस्ताव आणि शेतकºयांना दिलेला प्रस्ताव यात तफावत असल्याचे गुरुमित बग्गा, सुधाकर बडगुजर आणि शाहू खैरे यांनी सांगितले. तर अपूर्ण प्रस्ताव असल्याने फेर प्रस्ताव सादर करावा तोपर्यंत हा प्रस्ताव तहकूब ठेवावा, अशी मागणी डॉ. हेमलता पाटील यांच्यासह काही नगरसेवकांनी केली. उद्धव निमसे आणि दिनकर आढाव यांनी योजनेचे समर्थन करताना सर्वांना विश्वासात घेऊनच योजना राबवावी, अशी मागणी केली. तर बागायती क्षेत्र असतानाही जमिनी घेतल्या जात असताना त्यावर शेतकºयांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आक्षेप अशोक मुर्तडक यांनी घेतला. यापूर्वी ४०० एकर क्षेत्रातील शेतकºयांनी योजनेला समर्थन दिले असले तरी त्यांनी २३ अटी घातल्या आहेत. त्यांचा महासभेच्या ठरावात समावेश करावा, त्याचप्रमाणे सर्व शेतकºयांची संमती असेल तरच योजना राबबावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. तर नियोजित क्षेत्रातील दुकाने, घर, फार्म हाउस, पोल्ट्री हाउस ‘जैसे थे’ ठेवावे, अशी मागणी भिकुबाई बागुल आणि सुनीता पिंगळे यांनी उपसूचना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत नंदिनी बोडके, श्यामला दीक्षित, संगीता जाधव यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सूचना मांडल्या.आयुक्तांची कमिटमेंट, विरोध असल्यास प्रकल्प रद्दमखमलाबाद येथील ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी नगररचना योजना राबवण्यासाठी सोमवारी (दि.९) झालेल्या महासभेत केवळ इरादा स्पष्ट झाला आहे. यानंतर नगररचना योजना राबविली जाईल. योजनेत जे प्रस्ताव शेतकरी हिताचे मांडण्यात आले तेच प्रत्यक्षातही असतील अशी कमिटमेंट आयुक्तांनी दिली. शेतकºयांच्या हितासाठी राबविली जाणारी एकूण योजना १६०० कोटी रुपयांची आहे. शेतकºयांना ५५:४५ या सूत्रानुसार होणारे फायदे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर चारशे एकरवरील शेतकरी तयार झाल्यानंतरच हा विषय पुढे नेण्यात आला. तसेच बेटरमेंट चार्जेस असणार नाहीत किंवा अडीच मूळ एफएसआय आणि त्यात ०.५ अतिरिक्त एफएसआय तेही वापरता न आल्यास हस्तांरणीय असतील. या सर्व प्रकारच्या कमिटमेंट पाळल्या जातील आणि शेतकºयांची कोणत्याही टप्प्यावर फसवणूक झाली किंवा त्यांचा विरोध झाला तर योजना तेथेच स्थगित करेल, अशी हमी आयुक्तांनी दिली.शेतकºयांना प्रवेश बंदमखमलाबाद येथील प्रस्तावास समर्थन किंवा विरोध करणारे अनेक शेतकरी सभागृहाचा निर्णय ऐकण्यासाठी आतुर होते. त्यामुळे त्यांनी महापालिकेत धाव घेतली मात्र त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. विरोधकांनी त्यावर महापौर आणि प्रशासनाला शेतकºयांना प्रवेश न देण्याचा निर्णय कोणी घेतला, ते जाहीर करण्याची मागणी केल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी