शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

भगूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:19 IST

भगूर शहरातील विजयनगर चौफुलीपासून देवळाली छावणी नाका दोनपर्यंतच्या नवीन रेल्वे गेटपर्यंत होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलामुळे सिन्नर, नाशिक, इगतपुरी या तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावे व वाड्या-वस्तींच्या दळणवळणाची सोय होऊन संपर्कसाठी जवळ येणार आहे.

ठळक मुद्देपंचक्रोशीतील गावे जोडणार विकासाला चालना; वाहतुकीची कोंडी टळणार

विलास भालेराव । भगूर : शहरातील विजयनगर चौफुलीपासून देवळाली छावणी नाका दोनपर्यंतच्या नवीन रेल्वे गेटपर्यंत होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलामुळे सिन्नर, नाशिक, इगतपुरी या तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावे व वाड्या-वस्तींच्या दळणवळणाची सोय होऊन संपर्कसाठी जवळ येणार आहे.भगूरमधून इतर शहरांच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी जुने रेल्वेगेट व मोरीपूल होता यामुळे भगूर व परिसरात अनेक रस्ते अडचणीचे ठरत होते. दळणवळण यंत्रणा व लोकसंख्या वाढत गेली त्यानुसार जुने रेल्वेगेट बंद होऊन नूतन विद्यामंदिर शाळेच्या बाजूला नवीन रेल्वेगेट तयार करण्यात आले तेथूनच भगूरसह परिसरातील तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावांतील दळणवळणाचा मार्ग काहिसा सुकर झाला. गेल्या १५ ते २० वर्षांत भगूरला लागून असलेला विजयनगर परिसर विकसित होवून या ठिकाणी घरकुले, सोसायट्या उभ्या राहिल्या, विजयनगरची लोकसंख्या वाढल्याने वाहनांच्या भगूरच्या नवीन रेल्वे गेटसमोर रांगा लागू लागल्या. रहदारीसाठी रस्ता अपुरा पडू लागल्याने या नवीन रेल्वे गेटवर उड्डाणपूल तयार करून दळणवळणाची समस्या सोडवावी, अशी मागणी होऊ लागली वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी विशेष प्रयत्न करून भगूर रेल्वे गेटवर उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आजमितीला पूल पूर्णत्वास येत आहे.सदर पुलाच्या कामाची निविदा १८ कोटी २७ लाख रुपयांची आहे, परंतु मुख्य पूल बांधणीसाठी केंद्रीयमार्ग विभागाकडून १५ कोटी मंजूर झाले असून, पुलाची लांबी ४५० मीटर असून, रुंदी १२ मीटर आहे. यामध्ये एक अंडरपास रस्ता असून एक रस्ता विजयनगर परिसरासाठी राहणार आहे. इतर रस्त्यासाठी बांधकाम विभागाकडून १५ कोटी ५१ लाख ५८ हजार ५३२ मंजूर करण्यात आले आहेत. त्याचेही काम सुरू झाले आहे. सध्या पुलाच्या कामाची मुदत संपून साधारण २० महिने झाले आहे आणि अजून पूर्णत्वास जाण्यास नऊ महिने लागणार आहे. शेवटच्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम, केंद्रीय महामार्ग आणि भारतीय रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अभियंता यांच्या संयुक्त देखरेखीखाली मुख्य पुलाचे अंतिम फाउंडेशन पूर्ण केले जाणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूल पूर्णत्वास येणार आहे.दळणवळणाची होणार सोयरेल्वे उड्डाणपूल तयार झाल्यानंतर खºया अर्थाने भगूर परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्त्याच्या अडचणीमुळे येथील व्यवसाय ओस पडले होते. परिणामी परिसरातील नागरिक देवळाली कॅम्प, नाशिकरोड, नाशिक शहर येथे खरेदी करण्यासाठी जात होते. भगूर परिसरातील अनेक व्यावसायिकांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड येथे राहण्यासाठी गेले त्यांनी तेथेच व्यवसाय थाटला आहे. आता नवीन पुलामुळे घोटी-सिन्नर रस्ता अतिशय जवळचा मार्ग होणार आहे. त्यामुळे भगूरच्या विकास, व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून, मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी नाशिककडे जाण्याची गरज भासणार नाही. उड्डाणपुलाच्या सोयीमुळे सिन्नरमार्गे जाणारा भाजीपाला भगूरच्या बाजारात येईल. नाशिक, नाशिकरोड येथील नागरिकांना सिन्नर, इगतपुरी तालुक्यांत जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे