शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

भगूर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:19 IST

भगूर शहरातील विजयनगर चौफुलीपासून देवळाली छावणी नाका दोनपर्यंतच्या नवीन रेल्वे गेटपर्यंत होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलामुळे सिन्नर, नाशिक, इगतपुरी या तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावे व वाड्या-वस्तींच्या दळणवळणाची सोय होऊन संपर्कसाठी जवळ येणार आहे.

ठळक मुद्देपंचक्रोशीतील गावे जोडणार विकासाला चालना; वाहतुकीची कोंडी टळणार

विलास भालेराव । भगूर : शहरातील विजयनगर चौफुलीपासून देवळाली छावणी नाका दोनपर्यंतच्या नवीन रेल्वे गेटपर्यंत होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलामुळे सिन्नर, नाशिक, इगतपुरी या तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावे व वाड्या-वस्तींच्या दळणवळणाची सोय होऊन संपर्कसाठी जवळ येणार आहे.भगूरमधून इतर शहरांच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी जुने रेल्वेगेट व मोरीपूल होता यामुळे भगूर व परिसरात अनेक रस्ते अडचणीचे ठरत होते. दळणवळण यंत्रणा व लोकसंख्या वाढत गेली त्यानुसार जुने रेल्वेगेट बंद होऊन नूतन विद्यामंदिर शाळेच्या बाजूला नवीन रेल्वेगेट तयार करण्यात आले तेथूनच भगूरसह परिसरातील तीन तालुक्यांतील २५ ते ३० गावांतील दळणवळणाचा मार्ग काहिसा सुकर झाला. गेल्या १५ ते २० वर्षांत भगूरला लागून असलेला विजयनगर परिसर विकसित होवून या ठिकाणी घरकुले, सोसायट्या उभ्या राहिल्या, विजयनगरची लोकसंख्या वाढल्याने वाहनांच्या भगूरच्या नवीन रेल्वे गेटसमोर रांगा लागू लागल्या. रहदारीसाठी रस्ता अपुरा पडू लागल्याने या नवीन रेल्वे गेटवर उड्डाणपूल तयार करून दळणवळणाची समस्या सोडवावी, अशी मागणी होऊ लागली वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी विशेष प्रयत्न करून भगूर रेल्वे गेटवर उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आजमितीला पूल पूर्णत्वास येत आहे.सदर पुलाच्या कामाची निविदा १८ कोटी २७ लाख रुपयांची आहे, परंतु मुख्य पूल बांधणीसाठी केंद्रीयमार्ग विभागाकडून १५ कोटी मंजूर झाले असून, पुलाची लांबी ४५० मीटर असून, रुंदी १२ मीटर आहे. यामध्ये एक अंडरपास रस्ता असून एक रस्ता विजयनगर परिसरासाठी राहणार आहे. इतर रस्त्यासाठी बांधकाम विभागाकडून १५ कोटी ५१ लाख ५८ हजार ५३२ मंजूर करण्यात आले आहेत. त्याचेही काम सुरू झाले आहे. सध्या पुलाच्या कामाची मुदत संपून साधारण २० महिने झाले आहे आणि अजून पूर्णत्वास जाण्यास नऊ महिने लागणार आहे. शेवटच्या टप्प्यात सार्वजनिक बांधकाम, केंद्रीय महामार्ग आणि भारतीय रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अभियंता यांच्या संयुक्त देखरेखीखाली मुख्य पुलाचे अंतिम फाउंडेशन पूर्ण केले जाणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूल पूर्णत्वास येणार आहे.दळणवळणाची होणार सोयरेल्वे उड्डाणपूल तयार झाल्यानंतर खºया अर्थाने भगूर परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्त्याच्या अडचणीमुळे येथील व्यवसाय ओस पडले होते. परिणामी परिसरातील नागरिक देवळाली कॅम्प, नाशिकरोड, नाशिक शहर येथे खरेदी करण्यासाठी जात होते. भगूर परिसरातील अनेक व्यावसायिकांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड येथे राहण्यासाठी गेले त्यांनी तेथेच व्यवसाय थाटला आहे. आता नवीन पुलामुळे घोटी-सिन्नर रस्ता अतिशय जवळचा मार्ग होणार आहे. त्यामुळे भगूरच्या विकास, व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून, मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी नाशिककडे जाण्याची गरज भासणार नाही. उड्डाणपुलाच्या सोयीमुळे सिन्नरमार्गे जाणारा भाजीपाला भगूरच्या बाजारात येईल. नाशिक, नाशिकरोड येथील नागरिकांना सिन्नर, इगतपुरी तालुक्यांत जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे