शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

अंतिम मंजुरी : ओझर परिसरातील वाहतूककोंडी सुटणार महामार्गावर तीन उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:47 PM

ओझर : नाशिकहून पिंपळगावकडे जाताना तीन नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.ओझर येथील गडाख कॉर्नर, सायखेडा चौफुली, के. के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल, चिंचखेड चौफुली असे तीनही उड्डाणपुलांना अंतिम मंजुरी मिळाली असून, येत्या महिन्यात बांधकामास सुरुवात होणार आहे. यासाठी चिंचखेड चौफुलीसाठी २३ कोटी ९७ लाख, गडाख चौफुलीसाठी २२.९२ लाख, तर ...

ओझर : नाशिकहून पिंपळगावकडे जाताना तीन नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.ओझर येथील गडाख कॉर्नर, सायखेडा चौफुली, के. के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल, चिंचखेड चौफुली असे तीनही उड्डाणपुलांना अंतिम मंजुरी मिळाली असून, येत्या महिन्यात बांधकामास सुरुवात होणार आहे. यासाठी चिंचखेड चौफुलीसाठी २३ कोटी ९७ लाख, गडाख चौफुलीसाठी २२.९२ लाख, तर सायखेडा चौफुलीजवळील उड्डाणपुलासाठी २०.५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येथील महामार्गालगत असलेल्या अपूर्ण सर्व्हिस रोडच्या कामास गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. पुढील दोन महिन्यात उड्डाणपुलाच्या कामास सुुरुवात होणार असल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ओझर परिसरातील सर्व्हिस रोड तसेच उड्डाणपुलाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे ओझरकरांसाठी येणारे नववर्ष सुखद असेल अशीच भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ओझर येथील गडाख कॉर्नर येथे, सायखेडा चौफुली, के. के. वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल व चिंचखेड चौफुली येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या कामाचे टेंडर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मंत्रालयाकडे मंजुरीसाठी गेले असून, तेही मंजूर झाल्याने अपूर्ण उड्डाणपुलांच्या कामांची सुरुवात येत्या काळात होणार आहे. ईपीसी १ अंतर्गत अपूर्ण असलेल्या एकूण १६ कामांना सुरुवात झाली आहे. दुसºया टप्प्यातील कामे कंत्राटदार बी. पी. सांगळे यांनी घेतली आहेत. यात दहावा मैल येथे हायमास्ट लॅम्प, मराठा विद्या प्रसारक महाविद्यालयाच्या समोर भुयारी मार्ग असणार आहे. तसेच रिलायन्स पेट्रोलपंपासमोरील सध्या अपूर्णावस्थेतील दोन्ही बाजूंकडील सर्व्हिसरोडचे काम आदींचा समावे श असून, या कामांना सुरुवात झाली आहे. याव्यतिरिक्त ६६ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे ओझर येथील सायखेडा चौफुली ते नवीन इंग्रजी शाळा या ठिकाणी अपूर्णावस्थेत असलेली कामेही पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे सायखेडाकडून येणाºया वाहतुकीला लगाम बसणार आहे. येत्या काळात होणाºया उड्डाणपुलामध्ये खंडेराव मंदिरासमोर पुलाखालून ये-जा करण्यासाठी मार्ग होणार आहे. जेजुरीनंतर सर्वात मोठी पाच दिवसीय यात्रा ओझर गावचे ग्रामदैवत खंडेराव महाराज मंदिर येथे भरते. याच ठिकाणी असलेल्या मोकळ्या पटांगणात मोठमोेठे पाळणे, मनोरंजानाचे खेळाचे स्टॉल लागतात. या परिसरात शाळा व कृषी समिती असल्याने येथे नेहमी वाहतूककोंडी होते. मात्र येत्या काळात वाहतुकीचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच नाशिक शहराची कनेक्टिव्हिटीदेखील वाढणार आहे. मुख्य म्हणजे अपघातांना लगाम बसणार आहे. त्यामुळे येणारे नववर्ष उड्डाणपुलाच्या रुपात ‘अच्छे दिन’ घेऊन येण्यार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पिंपळगाव येथील अपूर्ण असलेला उड्डाणपूलदेखील पूर्ण करण्यात येणार आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल या ठिकाणी ईपीसी २ अंतर्गत २.३ किमीचा उड्डाणपूल होणार आहे. यामुळे सध्याच्या स्थितीत बळ्यादेव मंदिर, जत्रा हॉटेल, अमृतधाम या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.