शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

फौजिया खान : सरकारची धोरणे अराजकता पोसणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:11 IST

चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.

ठळक मुद्दे ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानसरकारने संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका

नाशिक : देशाचे सध्याचे सरकार व त्यांची धोरणे ही अराजकता पोसणारी आहेत. त्यामुळे लोकशाहीचा केवळ श्वास गुदमरतोय असे नाही तर ती मृतावस्थेत पोहचली आहे. सरकारने संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष फौजिया खान यांनी केली.‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत उत्तर महाराष्ट्रच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी भवन येथे बुधवारी (दि.८) पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार विजया चव्हाण, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, महिला आघाडीच्या प्रेरणा बलकवडे, समीना मेमन, सुषमा पगारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खान म्हणाल्या, माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती सुधारल्यानंतर संपुर्ण उत्तर महाराष्ट्रचे मिळून नाशिकमध्ये महिला आघाडीच्या वतीने ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत ‘इव्हीएम’ यंत्र व मनुस्मृतीची होळी करुन सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. या सत्ताधारी भाजपा सरकारने लोकशाहीची हत्त्या केली असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष विरोधक म्हणून ही हत्त्या कदापी सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ’ असा आमचा नारा आहे. गुन्हे यापुर्वीदेखीलही घडत होते, मात्र सध्या गुन्हे करणा-या गुन्हेगारांना हे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या सरकारने लोकशाहीचे सर्व स्तंभ असुरक्षित केले आहे. चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.निवडणुकांचे निकाल फिरतात कसे?देशातील व राज्यामधील प्रत्येक समाज व बसचालक-वाहकांपासून शेतकºयांपर्यंत आणि शासकिय कर्मचाºयांपासून शिक्षकांपर्यंत सर्वच घटक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत असताना हे सरकार निवडणुकांमध्ये कसे जींकून येते? निवडणुकांचे निकाल कसे फिरतात? लोकशाहीमध्ये असे कधीही घडत नाही, सरकार ईव्हीएम हॅकींगद्वारे हे घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप खान यांनी यावेळी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकारdemocracyलोकशाहीNarendra Modiनरेंद्र मोदी