शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

फौजिया खान : सरकारची धोरणे अराजकता पोसणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:11 IST

चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.

ठळक मुद्दे ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानसरकारने संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका

नाशिक : देशाचे सध्याचे सरकार व त्यांची धोरणे ही अराजकता पोसणारी आहेत. त्यामुळे लोकशाहीचा केवळ श्वास गुदमरतोय असे नाही तर ती मृतावस्थेत पोहचली आहे. सरकारने संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष फौजिया खान यांनी केली.‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत उत्तर महाराष्ट्रच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी भवन येथे बुधवारी (दि.८) पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार विजया चव्हाण, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, महिला आघाडीच्या प्रेरणा बलकवडे, समीना मेमन, सुषमा पगारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खान म्हणाल्या, माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती सुधारल्यानंतर संपुर्ण उत्तर महाराष्ट्रचे मिळून नाशिकमध्ये महिला आघाडीच्या वतीने ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत ‘इव्हीएम’ यंत्र व मनुस्मृतीची होळी करुन सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. या सत्ताधारी भाजपा सरकारने लोकशाहीची हत्त्या केली असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष विरोधक म्हणून ही हत्त्या कदापी सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ’ असा आमचा नारा आहे. गुन्हे यापुर्वीदेखीलही घडत होते, मात्र सध्या गुन्हे करणा-या गुन्हेगारांना हे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या सरकारने लोकशाहीचे सर्व स्तंभ असुरक्षित केले आहे. चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.निवडणुकांचे निकाल फिरतात कसे?देशातील व राज्यामधील प्रत्येक समाज व बसचालक-वाहकांपासून शेतकºयांपर्यंत आणि शासकिय कर्मचाºयांपासून शिक्षकांपर्यंत सर्वच घटक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत असताना हे सरकार निवडणुकांमध्ये कसे जींकून येते? निवडणुकांचे निकाल कसे फिरतात? लोकशाहीमध्ये असे कधीही घडत नाही, सरकार ईव्हीएम हॅकींगद्वारे हे घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप खान यांनी यावेळी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकारdemocracyलोकशाहीNarendra Modiनरेंद्र मोदी