शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फौजिया खान : सरकारची धोरणे अराजकता पोसणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:11 IST

चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.

ठळक मुद्दे ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानसरकारने संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका

नाशिक : देशाचे सध्याचे सरकार व त्यांची धोरणे ही अराजकता पोसणारी आहेत. त्यामुळे लोकशाहीचा केवळ श्वास गुदमरतोय असे नाही तर ती मृतावस्थेत पोहचली आहे. सरकारने संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून अस्थिरतेचे वातावरण निर्माण केल्याची टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्ष फौजिया खान यांनी केली.‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत उत्तर महाराष्ट्रच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी भवन येथे बुधवारी (दि.८) पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार विजया चव्हाण, सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, महिला आघाडीच्या प्रेरणा बलकवडे, समीना मेमन, सुषमा पगारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खान म्हणाल्या, माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती सुधारल्यानंतर संपुर्ण उत्तर महाराष्ट्रचे मिळून नाशिकमध्ये महिला आघाडीच्या वतीने ‘संविधान बचाओ देश बचाओ’ या अभियानांतर्गत ‘इव्हीएम’ यंत्र व मनुस्मृतीची होळी करुन सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. या सत्ताधारी भाजपा सरकारने लोकशाहीची हत्त्या केली असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष विरोधक म्हणून ही हत्त्या कदापी सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ’ असा आमचा नारा आहे. गुन्हे यापुर्वीदेखीलही घडत होते, मात्र सध्या गुन्हे करणा-या गुन्हेगारांना हे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या सरकारने लोकशाहीचे सर्व स्तंभ असुरक्षित केले आहे. चौथा स्तंभ असलेले प्रसारमाध्यमेही या सरकारने गिळंकृत के ली. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाची नारीशक्ती एकवटली आहे.निवडणुकांचे निकाल फिरतात कसे?देशातील व राज्यामधील प्रत्येक समाज व बसचालक-वाहकांपासून शेतकºयांपर्यंत आणि शासकिय कर्मचाºयांपासून शिक्षकांपर्यंत सर्वच घटक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत असताना हे सरकार निवडणुकांमध्ये कसे जींकून येते? निवडणुकांचे निकाल कसे फिरतात? लोकशाहीमध्ये असे कधीही घडत नाही, सरकार ईव्हीएम हॅकींगद्वारे हे घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप खान यांनी यावेळी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकारdemocracyलोकशाहीNarendra Modiनरेंद्र मोदी