शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

औद्योगिक वसाहतीचे जनक : सूर्यभान गडाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 14:35 IST

सिन्नरचे माजी आमदार, औद्योगिक वसाहतीचे जनक सूर्यभान गडाख यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.....

शैलेश कर्पे।सिन्नरचे माजी आमदार, औद्योगिक वसाहतीचे जनक सूर्यभान गडाख यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.....११ जानेवारी १९३० मध्ये निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे जन्म झालेल्या सूर्यभान गडाख वयाच्या १६ व्या वर्षी सातवी उत्तीर्ण झाले. वर्गात हुशार व तेवढाच चंचल, निर्भीड व स्वछंदी वृत्तीचे असलेल्या एकत्रित कुटुंबात असल्यामुळे शेतीकामात कष्ट करावे लागत होते. त्यातच १९४७ मध्ये आई-वडिलांचा मृत्यू झाला. कुटुंबात मायेच्या पदराखाली घेवून गुपचूप भाकरी खावू घालणारी आई सोडून गेल्याने खूप दु:ख झाले. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांचे मन सैरावैर झाले. आपत्ती मागून आपत्ती सुरु झाल्या. शिक्षणाची इच्छा असूनही पुढे शिक्षण घेऊ शकले नाही.स्वाभिमानी, निर्भिड वृत्तीतून ते घराबाहेर पडले ते काहीतरी करण्याच्या जिद्दीतूनच. १९४९-५० च्या दरम्यान क्रांतीसिंह नानासाहेब पाटील, शाहीर अमर शेख यांच्यासारख्या ग्रामीण भागात जागृती करणाऱ्या महान व्यक्तींचा सहवास त्यांना लाभला. त्यातून त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. पुढे देवपूर गावातूनच त्यांच्या चळवळींना सुरुवात झाली.जमिन एकत्रिकरण कायदा सुधारण्यासाठी दिलेल्या शांततापूर्ण लढा, ५४-५५ च्या दुष्काळात निवारणासाठी प्रयत्न, १९५६ मध्ये संयुक्त महाराष्टÑाचा लढा, महाबळेश्वर येथे जनआंदोलनात सहभाग, पुन्हा तुरुंगवास त्यानंतर सिन्नर पूर्व मतदार संघातून लोकल बोर्डावर १९५७ मध्ये निवड झाली. अशा प्रकारे सार्वजनिक जीवनातून नानांचा राजकीय जीवनात प्रवेश झाला.राजकीय पाठबळ मिळाल्यानंतर लोकांचे प्रश्न सोडविण्याला अधिक वेग आला. शेतीच्या पाण्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, नोकऱ्यांचा प्रश्न अशा अनेक संकटांना सामोरे गेले. त्यांचे तालुक्याच्या प्रत्येक गावाचे शिवार अन् शिवार तोंडपाठ झाले. त्यातूनच पंचायत समिती उपसभापती, सभापती, आमदार अशी कारकीर्द चढत्या क्रमांकाने उंचावत गेली. लोकांचे प्रश्न सोडवत असतांना दुष्काळाचा प्रश्न हा सातत्याने सोबत होता. त्यातूनच १९७२ चा प्रचंड मोर्चा व गोळीबार, तुरुंगवास, मीटर हटाव आंदोलन, भोजापूर धरणाचा सत्याग्रह अशा ऐतिहासिक लढ्यांचे नेतृत्त्व त्यांनी केले.दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून तालुक्यात २०० च्या वर पाझर तलावांची निर्मिती करतांना राज्याला पाझर तलावांची ओळखच सिन्नरमधून करुन दिली. बोरखिंडचा लघुपाटबंधारे प्रकल्प, शेतीसाठी विजेचा पुरवठा, वडांगळीची सरस्वती जलसिंचन उपसा योजना, पाथरेची श्रीराम जलसिंचन योजना, बारागावपिंप्रीची गोदावरी उपसा योजना, शहा येथील भैरवनाथ उपसा प्रकल्प आदि प्रकल्प उभे करण्यासाठी परिश्रम घेतले.रस्ते, पाणी, वीज, रोजगार हे प्रश्न सोडवितांनाच शिक्षणाची निकड लक्षात घेऊन तालुक्याच्या ग्रामीण भागात चांगले शिक्षण मिळावे म्हणून १९६४ साली माध्यमिक लोकशिक्षण मंडळाची स्थापना केली. जनी ज्ञानदीप लावू हे ब्रिद घेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली. पुढे औद्योगिक वसाहतीतील कामगार व औद्योजकांच्या मागणीनुसार आधुनिक इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. प्रतिकूल परिस्थितीत संकटांवर मात करीत संघर्षमय प्रवासातून तालुक्याच्या विकासासाठी नानांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याचेच फळ म्हणून आज सिन्नरची विकासाकडे घोडदौड सुरु आहे.

टॅग्स :Nashikनाशिक