शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

दुष्काळात आधार देणारे शेततळे झाले पोरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 15:29 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून पिके वाचविण्यासाठी यशस्वी प्रयोग केला होता. परंतु दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळात आधार देणारे शेततळे आता पोरके झाले आहे.

ठळक मुद्देपावसाचे प्रमाण वाढल्याने बळीराजांचा शेततळ्याकडे कानाडोळा

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून पिके वाचविण्यासाठी यशस्वी प्रयोग केला होता. परंतु दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळात आधार देणारे शेततळे आता पोरके झाले आहे.मागेल त्याला शेततळे ही योजना शासनाने शेतकरी वर्गाला दिली होती. त्याचा लाभ तालुक्यातील ब-याच शेतकरी वर्गाने घेतला. कारण तीन वर्षे अगोदर तालुक्यातील पाण्याची स्थिती ही दुष्काळजन्य होती.शेतातील पिकांना पाणी कमी पडु नये म्हणुन शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करण्यावर भर दिली होती. सन २०१५ ते २०१७ पर्यंत दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्ग आपल्या शेतामध्ये पिकविलेला शेती माल वाचविण्यासाठी पाणी कोठून मिळवावे या विवेचनेत पडला होता. त्यासाठी शेतकरी वर्गाने बोअरींग, धरणाच्या ठिकाणाहून पाईपलाईन, विहीर खोदणे इ.माध्यमाचा वापर केला. परंतु पावसाचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे विहीरीनां,बोअर वेल,पाणी लागत नव्हते.मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून ही पाणी मिळत नव्हते.जगाचा पोशिंदा शेतकरी वर्ग पाण्यासाठी जीवाचे रान करतो.पण त्याला यश मिळत नाही. याचा शासन दरबारी अहवाल गेला. याचा अभ्यास करून राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१६ ला शेतकरी वर्गासाठी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी" मागेल त्याला शेततळे " ही योजना उपलब्ध करून दिली. या योजनेसाठी शासनाने शेतकरी वर्गाला शेततळ्यासाठी अनुदान ही सुरू केले.या फायदा तालुक्यातील जवळ जवळ ४०ते ५० टक्के शेतकरी वर्गाने लाभ घेतला. व बघता बघता तालुक्यात २६० शेततळे शेतकरी वर्गाने आपल्या पिकांच्या सरासरी नुसार आखणी केली. व पिकांना शेततळ्याच्या माध्यमातून हक्काचे पाणी उपलब्ध केले. व शेततळे पिकांसाठी एक प्रकारे जलसंजीवनी मिळाल्याने बळीराजांच्या चेहर्यावर हसु निर्माण झाले . सन २०१५ ते २०१७ हा कालखंड शेतकरी वर्गाला पाणी उपलब्ध करण्यासाठी अतिशय खडतर गेला. परंतु मागेल त्याला शेततळे ही योजना उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी वर्गाने पाणी टंचाईवर मात केली. व शेततळ्यातील उपलब्ध पाणी साठ्यामध्ये द्राक्षे, भाजीपाला, व नगदी भांडवल मिळून देणारे पिके शेतकरी वर्ग जोमाने घेऊ लागला.परंतु सध्या दोन वर्षापासून दिंडोरी तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने व विहीरी, बोअरवेल यांना पाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे दुष्काळात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आधार देणारे शेततळ्याकडे बळीराजांने कानाडोळा केल्याने शेततळे आधाराविना पोरके झाले आहे.ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी शेततळे हे एक प्रकारे जलसंजीवनी देणारे ठरले आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण मुबलक झाल्याने शेतकरी वर्गाचा शेततळ्याकडे कानाडोळा निर्माण झाला असला तरी भाविष्यात त्याचा कधी ना कधी उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही शेततळ्याची विशेष काळजी घेत आहे. कारण दुष्काळ जन्य स्थिती त आमच्या पिकांना शेततळ्यानीच आधार दिला आहे- रामनाथ संतू पिंगळे, शेतकरी, अंबे जानोरी.शेततळे ही योजना शासनाने शेतकरी वर्गाला ठरवून दिलेली एक प्रकारे जलसंजीवनी योजना आहे. जरी यंदा पावसाचे प्रमाण मुबलक असले तरी शेतकरी वर्गाने पुढील हंगामासाठीचा वातावरणातील बदलावा कसा असेल हे सांगणे कठीण आहे. परंतु शेतकरी वर्गाने शेततळ्याची निगा राखावी.व पाणी साठा यांची काळजी घेऊन नियोजन करावे.- अभिजीत जमधडे, दिंडोरी तालुका कृषी अधिकारी. 

टॅग्स :Waterपाणीkalwaकळवा