कसबे सुकेणेत शेतकऱ्यांची आत्महत्त्या
By Admin | Updated: September 30, 2016 02:34 IST2016-09-30T02:30:31+5:302016-09-30T02:34:12+5:30
कसबे सुकेणेत शेतकऱ्यांची आत्महत्त्या

कसबे सुकेणेत शेतकऱ्यांची आत्महत्त्या
कसबे सुकेणे : दारू पिण्यास पन्नास रु पये दिले नाही म्हणून रागाच्या भरात कसबे सुकेणे येथे एका शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचे निधन झाले. दरम्यान, निफाड तहसीलकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा इसम हा शेतकरी असल्याने त्यांच्यावर कर्ज आहे किंवा नाही याबाबत तहसील कार्यालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली असल्याचे समजते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कसबे सुकेणे शिवारातील रवींद्र अंबादास गांगुर्डे (३५) याने दारू पिण्यासाठी आईकडे पन्नास रुपये मागितले. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने रवींद्र गांगुर्डे याने रागाच्या भरात स्वत:स पेटवून घेतले. कसबे सुकेणेहून त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कसबे सुकेणे पोलीस दुरक्षेञ येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पोलिस निरीक्षक श्रीहरी बिहरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आय.जी.मोरे घटनेचा तपास करीत आहे.सदरच्या शेतक-यावर किती होते किंवा नव्हते याबाबत ञसिदस्यीय समतिी नेमली असुन तिचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल, तहसिलदार विनोद भामरे यांनी सांगीतले. (वातॉहर)