शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 15:10 IST

पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज आहे. सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे वणी येथील रतन हरी निफाडे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी शेट्टी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज आहे. सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे वणी येथील रतन हरी निफाडे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी शेट्टी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांतिक सदस्य साहेबराव मोरे, उत्तर महाराष्ट्र सचिव सोमनाथ बोराडे, प्रवक्ते संदीप जगताप, जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, जिल्हा कार्याध्यक्ष निवृत्ती घारे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब तास्कर, दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन कड आदी उपस्थित होते.परतीच्या पावसामुळे शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. कारण नुकसान लाखोंच्या पटीने आहेत जर या शेतकºयांना दिलासा द्यायचा असेल तर ज्या पद्धतीने महापुराच्या वेळी जो निर्णय सरकारने घेतला होता. त्याच पद्धतीने आता परतीच्या मान्सूनमूळे ज्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीक कर्ज माफ केले पाहिजे व ज्या शेतकºयांनी पीक कर्ज काढलेले नाही. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापकाच्या तिप्पट रक्कम दिली पाहिजे .ज्या शेतकºयांनी पिकविम्यासाठी पैसे भरले आहे.त्या शेतकºयांना विम्याचा क्लेम देण्याच्या संदर्भात ताबडतोब सांगितले पाहिजे असे झाले तर शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो. अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल सरकार कोणाचेही पक्षाचे येवो हे करावाच लागणार आहे नाहीतर पुढच्या काही काळात संपूर्ण महाराष्ट्रभर आत्महत्यांचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी शेट्टी म्हणाले. यावेळी शेतकरी शरद काळे , संजय निफाडे ,शिवराम रसाळ ,शरद निफाडे , अरूण निफाडे, रामदास काळे, किरण निफाडे ,नंदू निफाडे ,महेश काळे, नितीन निखाडे ,नामदेव वाटपाडे ,उत्तमराव निफाडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक