शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : इ. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:31 IST

शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात तीस दिवस प्रशिक्षणकृषी कार्यकर्त्यांसाठी ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ शिबीर

नाशिक : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ या तीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, कृषी अभियंता राजाराम पाटील, डॉ. प्रकाश कदम आणि कृषी विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके होते. कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन , संशोधन केंद्रावरील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास लागणारा कालावधी कमी करणे आणि कृषी संशोधन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विभाग प्रयत्नशील असतात. परंतु कृषी विस्तार कार्यकर्ते आणि शेतकरी यांचे गुणोत्तर खूपच जास्त असल्याचे चित्र आढळते. त्यामुळे गावपातळीवर कृषी शास्रज्ञ आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी चांगले कृषी विस्तार कार्यकर्ते तयार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखून कार्यक्रमांची आखणी करणे आणि सुयोग्य विस्तारपद्धत वापरून ते राबविणे या प्रशिक्षणामुळे शक्य होईल अशी आशाही कुलगुरू वायुनंदन यांनी यावेळी व्यक्त केली. कृषी विस्तार सेवांची गरज, लोकसहभागातून ग्रामसर्वेक्षण, शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखणे, कार्यक्रमांची आखणी करणे, आद्यरेषा प्रात्याक्षिके, शेती व्यवसायाला पूरक घटक व त्यांचे व्यवस्थापन, शेतमाल विपणनातील अडचणी व उपाय, नैसर्गिक साधनस्रोत व्यवस्थापन यासंबंधी संपूर्ण कौशल्य या प्रशिक्षणादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी कृषि विज्ञान केंद्राचे विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीuniversityविद्यापीठeducationशैक्षणिकFarmerशेतकरी