शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : इ. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:31 IST

शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात तीस दिवस प्रशिक्षणकृषी कार्यकर्त्यांसाठी ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ शिबीर

नाशिक : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ या तीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, कृषी अभियंता राजाराम पाटील, डॉ. प्रकाश कदम आणि कृषी विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके होते. कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन , संशोधन केंद्रावरील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास लागणारा कालावधी कमी करणे आणि कृषी संशोधन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विभाग प्रयत्नशील असतात. परंतु कृषी विस्तार कार्यकर्ते आणि शेतकरी यांचे गुणोत्तर खूपच जास्त असल्याचे चित्र आढळते. त्यामुळे गावपातळीवर कृषी शास्रज्ञ आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी चांगले कृषी विस्तार कार्यकर्ते तयार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखून कार्यक्रमांची आखणी करणे आणि सुयोग्य विस्तारपद्धत वापरून ते राबविणे या प्रशिक्षणामुळे शक्य होईल अशी आशाही कुलगुरू वायुनंदन यांनी यावेळी व्यक्त केली. कृषी विस्तार सेवांची गरज, लोकसहभागातून ग्रामसर्वेक्षण, शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखणे, कार्यक्रमांची आखणी करणे, आद्यरेषा प्रात्याक्षिके, शेती व्यवसायाला पूरक घटक व त्यांचे व्यवस्थापन, शेतमाल विपणनातील अडचणी व उपाय, नैसर्गिक साधनस्रोत व्यवस्थापन यासंबंधी संपूर्ण कौशल्य या प्रशिक्षणादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी कृषि विज्ञान केंद्राचे विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीuniversityविद्यापीठeducationशैक्षणिकFarmerशेतकरी