शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : इ. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:31 IST

शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात तीस दिवस प्रशिक्षणकृषी कार्यकर्त्यांसाठी ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ शिबीर

नाशिक : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ या तीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, कृषी अभियंता राजाराम पाटील, डॉ. प्रकाश कदम आणि कृषी विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके होते. कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन , संशोधन केंद्रावरील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास लागणारा कालावधी कमी करणे आणि कृषी संशोधन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विभाग प्रयत्नशील असतात. परंतु कृषी विस्तार कार्यकर्ते आणि शेतकरी यांचे गुणोत्तर खूपच जास्त असल्याचे चित्र आढळते. त्यामुळे गावपातळीवर कृषी शास्रज्ञ आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी चांगले कृषी विस्तार कार्यकर्ते तयार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखून कार्यक्रमांची आखणी करणे आणि सुयोग्य विस्तारपद्धत वापरून ते राबविणे या प्रशिक्षणामुळे शक्य होईल अशी आशाही कुलगुरू वायुनंदन यांनी यावेळी व्यक्त केली. कृषी विस्तार सेवांची गरज, लोकसहभागातून ग्रामसर्वेक्षण, शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्या ओळखणे, कार्यक्रमांची आखणी करणे, आद्यरेषा प्रात्याक्षिके, शेती व्यवसायाला पूरक घटक व त्यांचे व्यवस्थापन, शेतमाल विपणनातील अडचणी व उपाय, नैसर्गिक साधनस्रोत व्यवस्थापन यासंबंधी संपूर्ण कौशल्य या प्रशिक्षणादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी कृषि विज्ञान केंद्राचे विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीuniversityविद्यापीठeducationशैक्षणिकFarmerशेतकरी