शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या हंगामासाठी शेतकरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 17:36 IST

सायखेडा : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली, शेतीचे अतोनात नुकसान झाले. माथी कर्ज वाढले. चार महिने कुटुंबाचे कष्ट वाया गेले. शेती धोक्यात आली. अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.

ठळक मुद्देखरीप गेला पाण्यात : चांगल्या पिकासाठी निसर्गाला साकडे

सायखेडा : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली, शेतीचे अतोनात नुकसान झाले. माथी कर्ज वाढले. चार महिने कुटुंबाचे कष्ट वाया गेले. शेती धोक्यात आली. अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.खरीप हंगाम पाण्यात गेला आता रब्बीतरी पिकू दे असे साकडे त्याने निसर्गाला घातले असून एका महिन्यातील सर्व दु:ख बाजूला सारत रब्बीच्या हंगामाला सुरवात केली आहे, सगळीकडेच या नवीन आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहे. रब्बीच्या हंगामातील पिके उभी करण्याच्या कामाला वेग आला आहे.जून महिन्यात सुरु होणारा खरीप हंगाम सुरवातीपासून दमदार पावसामुळे दमदार राहिला, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुंग यासह नगदी पिके टमाटे, कोबी, फ्लॉवर, वांगे, वेलवर्गीय पिके, पालेभाज्या हि सर्वच पिके सुरवातीपासून जोमात होती.मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीमुळे जमीन अनेक महिने पडून असल्याने मेहनत करून जमिनीचा पोत टिकवून असल्याने पिके बहरली होती. हंगाम अंतिम टप्प्यात आला होता, पिके परीपक्वतेकडे झुकली होती, आणि अचानक परतीच्या पावसाने मागील महिन्यात सरासरी चौदा दिवस मुक्काम ठोकला आणि अचानक आलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.सोंगलेली धान्य जमिनीत सडली, शेतात उभी असलेले धान्य सडून गेली. भाजीपाला आणि फळभाज्यावर विविध रोगांनी थैमान घातले त्यामळे लाखो रु पये भांडवल म्हणून खर्च केलेले पाण्यात गेले.खरीप हंगामातील जवळपास नव्वद टक्के नुकसान झाले असा कृषी विभागाकडून अधिकृतपणे सांगत असले तरी प्रत्यक्ष मात्र अनेक ठिकाणी १०० टक्के नुकसान झाले आहे. सर्व सहन करत शेतकरी पुन्हा एकदा रब्बीचे पिके शेतात उभी करण्यासाठी तयार झाला आहे. भरपूर पाणी असल्याने रब्बी हंगामातील पीके जोमदार होतील अशी अपेक्षा आहे. रब्बीचा हंगाम जोरात असल्याचे दिसून येत आहे.अनेक भागात भौगोलिक रचणे नुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही, यंदा प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरू झाला आहे.गहू, हरभरा, कांदे हि प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीत देखील भाजीपाला, फळभाज्या घेण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. सोयाबीन, मक्याच्या वावरात भाजीपाला पिकवून चार पैसे मिळतील, खरीपात खर्च झालेले भांडवल वसूल होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याने सर्व विसरून नवीन पिके घेण्यासाठी त्याने कंम्बर कसलीे आहे.सरासरी पेक्षा वाढदरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा हंगाम जोरदार असणार आहे. इथून मागे अनेक भागात कमी पाऊस पडत असल्याने उन्हाळ्यात येणारी पिके घेतली जात नाही. पाऊस जोरदार झाल्याने खरीप हंगामा इतकीच रब्बीतील पिके असणार आहे. निसर्गाचा प्रकोप झाला नाही तर खरीप हंगामातील पिके जोरदार असतील, अशी शक्यता आहे. थंडीचा जोर वाढत असल्याने तो पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.- बी. जी. पाटील, कृषी अधिकारी, निफाड.अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीपाची वाट लागली. आता रब्बी हंगामातील पिके तरी जोरदार येऊ दे असे निसर्गाला साकडे घालत सर्व दु:ख मनात साठवत पुन्हा एकदा परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहे. नजरे समोर दिसणारी आव्हाने शेतकºयाला शांत बसू देत नाही.- किरण सुरवाडे, शेतकरी, पिंपळस.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक