शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मनपाकडून शेतकऱ्यांना अहमदाबाद वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:40 IST

स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड म्हणजे नियोजनपूर्वक नगर वसविण्यासाठी शेतकºयांचा विरोध असला तरी त्यातील दोन ते तीन मिळकतदारांनी आपल्या जमिनी देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. ग्रीन फिल्डसाठी शेतकºयांना अहमदाबादला लोकप्रतिनिधींनी नेण्यासाठी आता डेडलाइन ठरविण्यात आली असून, लोकप्रतिनिधींनी दाद न दिल्यास प्रशासनच संबंधितांना अहमदाबाद वारीला नेणार आहे.

नाशिक : स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड म्हणजे नियोजनपूर्वक नगर वसविण्यासाठी शेतकºयांचा विरोध असला तरी त्यातील दोन ते तीन मिळकतदारांनी आपल्या जमिनी देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. ग्रीन फिल्डसाठी शेतकºयांना अहमदाबादला लोकप्रतिनिधींनी नेण्यासाठी आता डेडलाइन ठरविण्यात आली असून, लोकप्रतिनिधींनी दाद न दिल्यास प्रशासनच संबंधितांना अहमदाबाद वारीला नेणार आहे.स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद शिवारात सातशे एकर शिवारात नगरविकास योजना राबविली जाणार आहे. या नियोजनपूर्वक शहरनिर्मितीच्या प्रकल्पासाठी जागा देण्यास स्थानिक शेतकºयांचा विरोध आहे. तसे निवेदन संबंधित शेतकºयांनी अगोदरच महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहे. शेतकºयांच्या विरोधामुळे महापालिकेतील सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाला विरोध करण्याचे ठरविले आहे. प्रशासनाने यासंदर्भात महासभेवर प्रस्ताव मांडल्यानंतर शेतकºयांचा या विषयाला विरोध असल्याने तो बाजूला ठेवून स्वतंत्र महासभेत त्याचे सादरीकरण करावे त्यानंतर निर्णय घेऊ असे ठरविण्यात आले.दरम्यान, गेल्या महिन्यात नाशिक दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या महापालिकेच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली, तेव्हा त्यांनी शेतकºयांना अहमदाबाद येथील अशाच प्रकाराचा प्रकल्प पाहण्यासाठी नेण्याची सूचना केली होती. दरम्यान, त्यानंतर अहमदाबाद दौºयाच्या चर्चा झाल्या असल्या तरी त्याला मुहूर्त लागला नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या पदाधिकाºयांना शेतकºयांना दौºयावर घेऊन जाण्यासाठी ठरावीक मुदत देण्यात येणार असून, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यास शेतकºयांचे प्रतिनिधी घेऊन प्रशासनच त्यांना वारी घडविणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आयुक्त मुंढे यांच्या दाव्यानुसार त्यांना दोन ते तीन शेतकºयांनी ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंटसाठी जागा देण्याची तयारी केली आहे. तसे झाल्यास काही प्रमाणात कोंडी फुटेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तथापि, मखमलाबाद येथील शेतकरी संघटित करणारे माजी नगरसेवक शरद कोशिरे यांनी मात्र त्याचा इन्कार केला असून, कोणत्याही प्रकारे शेतकरी जमीन देण्यास तयार नसल्याचे कोशिरे यांनी सांगितले.विलंब झाल्यास प्रकल्प रखडेलग्रीन फिल्ड डेव्हलमेंटचे काम अत्यंत किचकट आहे. शेतकºयांनी जमिनी दिल्यानंतरही लगेचच हा निर्णय होणार नाही. नगररचना योजना राबविण्यासाठी अधिसूचना जारी करणे त्यावर हरकती आणि सूचना देणे तसेच शेतकºयांना जमिनीच्या बदल्यात फायनल प्लॉट देणे यासह अन्य अनेक प्रकारची कामे होण्यास खूप कालावधी लागणार आहे. त्यामुळेच प्रशासनाची घाई सुरू आहे.महापालिकेच्या ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी कोणीही शेतकरी जागा देण्यास तयार नसून तरीही अशा प्रकारची माहिती प्रशासन देत असेल तर तो शेतकºयांच्या एकीत फूट पाडण्याचा डाव आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार अहमदाबाद येथील ग्रीन फिल्ड प्रकल्प पाहण्यास जाण्यासाठी १७ शेतकºयांची नावे तयार करून ती प्रशासनाला देण्यात आली आहेत. मात्र त्यानंतर प्रशासनाने काहीच कळविलेले नाही. अर्थात, दौºयात सहभागी होण्यास शेतकरी तयार झाले म्हणजे शेतजमिनी देण्यास तयार आहोत असा अर्थ घेऊ नये.- शरद कोशिरे, शेतकरी नेता

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी