शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

शेतकऱ्यांनी मोर्चा वळवला मुळ्याकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:33 IST

नायगाव : अतिवृष्टी सारखा पाऊस व सतत बदलणाऱ्या हवामानामुळे खरीप व रब्बीतील कांद्याची पुरती वाट लागली आहे. अशातच कांदा बियाण्यांचा तुटवडा झाल्याने लागवड क्षेत्रात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांदा नक्कीच भाव खाणार अशी परिस्थीती निर्माण झाल्याने कांद्यावर उतारा म्हणून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सध्या मुळ्याकडे वळवला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यासह तालुक्यात मुळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरवातीला

ठळक मुद्देबदलणाऱ्या हवामानामुळे सध्या शेतकरी हैराण

नायगाव : अतिवृष्टी सारखा पाऊस व सतत बदलणाऱ्या हवामानामुळे खरीप व रब्बीतील कांद्याची पुरती वाट लागली आहे. अशातच कांदा बियाण्यांचा तुटवडा झाल्याने लागवड क्षेत्रात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कांदा नक्कीच भाव खाणार अशी परिस्थीती निर्माण झाल्याने कांद्यावर उतारा म्हणून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सध्या मुळ्याकडे वळवला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यासह तालुक्यात मुळ्यांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुरवातीला समाधानकारक पडलेल्या पावसाने ऐन सुगीच्या दिवसात अतिवृष्टी सारखा पडल्याने पिकांचे नुकसान केले. या पावसात खरीपातील कांदा रोपांचे व लागवड केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सतत पडणाऱ्या पावसामुळे वारंवार रोपे व लागवड केलेले कांदे खराब झाले. पर्यायाने कांदा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला. हजार रूपये किलोने मिळणारे कांदा बियाणे पाच हजारांपर्यत पोहचले. या भावातही अनेक शेतकऱ्यांनी रोपे तयार केली, तर काहींनी महागडी रोपे विकत घेऊन कांद्याची लागवड केली. मात्र उसंत दिलेल्या पावसाने पुन्हा परतीच्या रुपाने सतत हजेरी लावत कांद्याचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.सध्या बाजारात कांद्याला मिळत असलेला भाव व सध्याची अल्प लागवड लक्षात घेता आगामी काळात कांदा नक्कीच भाव खाणार असे चित्र लक्षात घेऊन नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी बीड, अहमदनगर, पुणे व जळगाव आदी ठिकाणाहून महागात रोपे विकत आणून कांद्याची लागवड केली. तर काहींनी चक्क चार हजार रूपये किलोने बियाणे खरेदी करून त्याची पेरणी केली. मात्र यातही सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सध्या शेतकरी हैराण झाले आहे. अशा परीस्थितीत शेतकऱ्यांनी कांद्याला पर्याय म्हणून मुळ्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी