शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:03 IST

मानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूही अद्याप येवला तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देमानोरी : तीन महिन्यानंतरही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूही अद्याप येवला तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकºयांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळत असून ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकºयांच्या हातात एक दमडी देखील मिळाली नसून संबंधित पीक विमा कंपनीच्या या कारभारावर शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पीक विमा न काढलेल्या शेतकºयांना मदत मिळत असताना पीक विमा धारक शेतकरी मात्र नाराजी व्यक्त करीत आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने लागडव केली होती. त्यात यंदा प्रथमच मक्यावर लष्करी अळीने आक्र मक केल्याने आधीच मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना वारंवार विविध प्रकारची औषध फवारणी करून काही प्रमाणात मका पीक शेतकरी वर्गाने वाचविले होते.सन २०१८ मध्ये खरीप हंगामातील मक्याचे आणि सोयाबीनचा पण अनेक शेतकºयांनी पीक विमा काढलेला असताना कोरडा दुष्काळ पडलेला असताना देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई पीक विमा धारक शेतकºयांना मिळालेली नाही. तसेच २०१९ मध्ये पण अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेले असताना देखील पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेत आहे.काही पीक विमा धारक शेतकरी दीड वर्षांपासून तर काही शेतकरी दोन महिन्यांपासून पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाने पीक विमा संबंधित कंपन्यांना याबाबत सखोल माहितीची चौकशी करून शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्याची नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.लष्करी अळीचे प्रमाण वाढतच गेल्याने अनेक शेतकºयांनी मका पीक हातातून जाते की काय या भीतीने प्रधानमंत्री पीक विमा काढला होता. अवकाळी पाऊस झाल्यानंतर एका रात्रीतून पिकांची अवस्था होत्याची नव्हती झाली होती. मका, सोयाबीन पेरणीसाठी घेतलेली बियाणे, रासायनिक खते, मशागतीचा खर्च, औषध फवारणीचा हजारो रु पये खर्च करून देखील अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने हा सर्व खर्च अवकाळी पावसाने वाहून नेला होता.येवला तालुक्यात सन २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडला असता मका पीक पाण्याच्या कमतरतेमुळे वाया गेले होते. तेव्हा पण मी पीक विमा काढलेला होता. तसेच २०१९ मध्ये अवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे नुकसान झालेले असताना तेव्हा पण मी पीक विमा काढलेला आहे. मात्र दोन्ही पण वर्षी एक रु पयांची देखील नुकसान भरपाई पीक विमा कंपनीकडून अद्याप मला मिळालेली नाही.- विठ्ठल वावधाने, पीक विमा धारक शेतकरी.(फोटो ०१ मानोरी, ०१ मानोरी २)आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेले पिकांचे नुकसान.

टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीFarmerशेतकरी