शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:03 IST

मानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूही अद्याप येवला तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देमानोरी : तीन महिन्यानंतरही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूही अद्याप येवला तालुक्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकºयांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळत असून ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकºयांच्या हातात एक दमडी देखील मिळाली नसून संबंधित पीक विमा कंपनीच्या या कारभारावर शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पीक विमा न काढलेल्या शेतकºयांना मदत मिळत असताना पीक विमा धारक शेतकरी मात्र नाराजी व्यक्त करीत आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने लागडव केली होती. त्यात यंदा प्रथमच मक्यावर लष्करी अळीने आक्र मक केल्याने आधीच मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना वारंवार विविध प्रकारची औषध फवारणी करून काही प्रमाणात मका पीक शेतकरी वर्गाने वाचविले होते.सन २०१८ मध्ये खरीप हंगामातील मक्याचे आणि सोयाबीनचा पण अनेक शेतकºयांनी पीक विमा काढलेला असताना कोरडा दुष्काळ पडलेला असताना देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई पीक विमा धारक शेतकºयांना मिळालेली नाही. तसेच २०१९ मध्ये पण अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेले असताना देखील पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेत आहे.काही पीक विमा धारक शेतकरी दीड वर्षांपासून तर काही शेतकरी दोन महिन्यांपासून पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाने पीक विमा संबंधित कंपन्यांना याबाबत सखोल माहितीची चौकशी करून शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्याची नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.लष्करी अळीचे प्रमाण वाढतच गेल्याने अनेक शेतकºयांनी मका पीक हातातून जाते की काय या भीतीने प्रधानमंत्री पीक विमा काढला होता. अवकाळी पाऊस झाल्यानंतर एका रात्रीतून पिकांची अवस्था होत्याची नव्हती झाली होती. मका, सोयाबीन पेरणीसाठी घेतलेली बियाणे, रासायनिक खते, मशागतीचा खर्च, औषध फवारणीचा हजारो रु पये खर्च करून देखील अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने हा सर्व खर्च अवकाळी पावसाने वाहून नेला होता.येवला तालुक्यात सन २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडला असता मका पीक पाण्याच्या कमतरतेमुळे वाया गेले होते. तेव्हा पण मी पीक विमा काढलेला होता. तसेच २०१९ मध्ये अवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे नुकसान झालेले असताना तेव्हा पण मी पीक विमा काढलेला आहे. मात्र दोन्ही पण वर्षी एक रु पयांची देखील नुकसान भरपाई पीक विमा कंपनीकडून अद्याप मला मिळालेली नाही.- विठ्ठल वावधाने, पीक विमा धारक शेतकरी.(फोटो ०१ मानोरी, ०१ मानोरी २)आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेले पिकांचे नुकसान.

टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीFarmerशेतकरी