शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

सटाण्यात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:51 IST

तालुक्यातील सुकड नाला लाभक्षेत्रातील शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पामधील पूरपाणी सुकड नाल्यात टाकावे या मागणीसाठी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारपासून (दि.२७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

सटाणा : तालुक्यातील सुकड नाला लाभक्षेत्रातील शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पामधील पूरपाणी सुकड नाल्यात टाकावे या मागणीसाठी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारपासून (दि.२७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.  दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी उपोषणकर्त्यांना सकाळी कार्यालयाच्या आवारात मंडप टाकण्यास मज्जाव करून उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तणाव निर्माण झाल्याने अधिकाºयांना माघार घ्यावी लागली.  पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने वनोली, औंदाणे, तरसाळी, सटाणा परिसरातील शेती पाण्याअभावी संकटात सापडली आहे. शेतीबरोबरच शेतशिवारात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पतून वाहून जाणारे पूरपाणी सुकडनाल्यात टाकावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उदासीन दिसून येत आहेत. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारपासून (दि. २७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर प्रहारचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे.  उपोषणकर्त्यांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तुषार खैरनार, पंचायत समितीचे माजी सभापती चिला निकम, सुधाकर पाटील, महेंद्र खैरनार, दीपक रौंदळ, हेमंत निकम, नीलेश निकम, महेश निकम, शरद चव्हाण, भालचंद्र अहिरे, मयूर निकम, कपिल सोनवणे, दौलत निकम, प्रवीण पवार, कैलास निकम यांचा समावेश आहे. वीरगाव लाभक्षेत्रातील शेतकरी राकेश देवरे, उद्धव देवरे, शिवाजी देवरे आदी शेतकºयांनी पूरपाणी टाकण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. उपोषणकर्त्या शेतकºयांची मागणी दसाणे लघुप्रकल्प अंतर्गत असलेल्या वीरगाव फड कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेरील असल्याने हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे जलसंपदा विभागच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले .शाब्दिक चकमकसकाळी उपोषणकर्ते खैरनार यांनी आवारात मंडप टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी मंडप टाकण्यास विरोध केला. यावेळी उपोषणकर्ते व अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अधिकाºयांना अखेर नमते घ्यावे लागले.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणी