शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:51 IST

तालुक्यातील सुकड नाला लाभक्षेत्रातील शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पामधील पूरपाणी सुकड नाल्यात टाकावे या मागणीसाठी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारपासून (दि.२७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

सटाणा : तालुक्यातील सुकड नाला लाभक्षेत्रातील शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पामधील पूरपाणी सुकड नाल्यात टाकावे या मागणीसाठी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारपासून (दि.२७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.  दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी उपोषणकर्त्यांना सकाळी कार्यालयाच्या आवारात मंडप टाकण्यास मज्जाव करून उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तणाव निर्माण झाल्याने अधिकाºयांना माघार घ्यावी लागली.  पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने वनोली, औंदाणे, तरसाळी, सटाणा परिसरातील शेती पाण्याअभावी संकटात सापडली आहे. शेतीबरोबरच शेतशिवारात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पतून वाहून जाणारे पूरपाणी सुकडनाल्यात टाकावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उदासीन दिसून येत आहेत. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारपासून (दि. २७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर प्रहारचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे.  उपोषणकर्त्यांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तुषार खैरनार, पंचायत समितीचे माजी सभापती चिला निकम, सुधाकर पाटील, महेंद्र खैरनार, दीपक रौंदळ, हेमंत निकम, नीलेश निकम, महेश निकम, शरद चव्हाण, भालचंद्र अहिरे, मयूर निकम, कपिल सोनवणे, दौलत निकम, प्रवीण पवार, कैलास निकम यांचा समावेश आहे. वीरगाव लाभक्षेत्रातील शेतकरी राकेश देवरे, उद्धव देवरे, शिवाजी देवरे आदी शेतकºयांनी पूरपाणी टाकण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. उपोषणकर्त्या शेतकºयांची मागणी दसाणे लघुप्रकल्प अंतर्गत असलेल्या वीरगाव फड कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेरील असल्याने हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे जलसंपदा विभागच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले .शाब्दिक चकमकसकाळी उपोषणकर्ते खैरनार यांनी आवारात मंडप टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी मंडप टाकण्यास विरोध केला. यावेळी उपोषणकर्ते व अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अधिकाºयांना अखेर नमते घ्यावे लागले.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणी