टॉवर लाइन वळविण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By Admin | Updated: September 13, 2016 01:08 IST2016-09-13T01:07:24+5:302016-09-13T01:08:55+5:30

दिंडोरी : शेतातून गेलेला पावर ग्रीड कंपनीच्या मनोरा कोसळल्याने भीती

Farmers' fasting to turn the tower line | टॉवर लाइन वळविण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

टॉवर लाइन वळविण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

दिंडोरी : शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या पॉवर ग्रिड कंपनीचा टॉवर अवनखेड शिवारात कोसळल्याने टॉवर लाइन प्रभावित क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर प्रकल्प बंद करून टॉवर लाइन अन्य भागात वळवावी या मागणीसाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी अवनखेड येथील पडलेल्या टॉवर येथे उपोषण सुरू केले आहे.
२५ आॅगस्ट रोजी निफाड व दिंडोरीच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी शिरवाडे वणी येथे सरण रचत आत्मदहन आंदोलन केले होते त्यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांनी १५ दिवसात कपाती रद्द करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पंधरा दिवस उलटूनही आश्वासन पाळले गेले नाही. त्यातच १० तारखेला अवनखेड येथे टॉवर कोसळला. त्यामुळे सर्व शेतकरी भयभीत झाले असून, द्राक्षाबागांवरून, घराशेजारून जाणारी लाइन कधीही कोसळून अपघात होणाची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थिती टॉवर लाइन नकोच अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. सरकारने वेळीच हा प्रकल्प थांबवला नाही तर शेतकरी आत्मदहन करतील व त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सदर लाइन वसाहती-शेतीक्षेत्रातून वळवून अन्य भागातून न्यावी, या मागणीसाठी सोमवार, दि. १२ रोजी सकाळी १० वाजता निफाड व दिंडोरी तालुक्यातील सर्व टॉवर लाइन बाधित शेतकऱ्यांनी सहकुटुंब अवनखेड येथील पडलेल्या टॉवरजवळ उपोषण सुरु केले आहे.
सदर टॉवरच्या परिघात येणारे क्षेत्राची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे आमदार नरहरी झरिवाळ अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे यांनी सदर टॉवरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. तरी शासनाने त्विरत सर्व टॉवरचे कामाची तपासणी करावी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत न्यायिक तोडगा काढत शेतकऱ्यांना न्याय द्यावा असी मागणी केली.
प्रांताधिकारी उदय किसवे यांनी आंदोलकांच्या भावना जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचिवल्या असून १४ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे तरी आंदोलन मागे घ्यावे हि विनंती केली मात्र आंदोलकांनी विभागीय आयुक्त यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती बघावी व आम्हाला न्याय द्यावा असी मागणी केली.
उपोषण सुरूच ठेवले यावेळी सदाशिव शेळके, रघुनाथ पाटिल, निलेश कतोरे, संतोष पुरकर, संजय निफाडे, दीपक देखमुख, अमोल दवंगे, रामभाऊ जाधव, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पाटील आदी शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Farmers' fasting to turn the tower line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.